शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

शिरोळलाच फक्त उमेदवारीचा गुंता

By admin | Updated: September 4, 2014 00:16 IST

सहा विधानसभा मतदारसंघांचे चित्र स्पष्ट : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी घेतली माहिती

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या सातपैकी पाच मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. शिरोळ मतदारसंघांतच उमेदवारी कुणाला द्यायची, हा गुंता तयार झाला आहे. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याकडून आज, बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी उमेदवारीबाबत प्राथमिक माहिती घेतली. परंतु नावे निश्चित होऊन चित्र स्पष्ट व्हायला आणखी काही दिवस जातील, असे पाटील यांनी सांगितले. सध्या ते मुंबईतच तळ ठोकून आहेत.गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची उमेदवारी निश्चित आहे. कोल्हापूर उत्तरमधून सत्यजित कदम, सागर चव्हाण यांनी उमेदवारी मागितली आहे. माजी आमदार सुरेश साळोखे यांनीही उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यामार्फत काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. परंतु सद्य:स्थितीत सत्यजित कदम यांनाच काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची संधी अधिक आहे. काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेला नगरसेवक, पक्षाशी प्रामाणिक असलेला उमेदवार व दोन वर्षांपासूनची निवडणुकीची तयारी या निकषांवर त्यांच्या उमेदवारीचा विचार केला जात आहे. आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांनीही त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आग्रह धरला आहे. माजी आमदार मालोजीराजे यांनीही आपण रिंगणात राहणार नसून सत्यजित कदम यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी, असे पत्रच दिले असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.शिरोळमध्ये स्वत: सा. रे. पाटील हेच उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यांना उमेदवारी मिळणार की नाही हे दिल्लीत निश्चित होणार आहे. वयामुळे गेल्यावेळेसच त्यांच्या उमेदवारीस दिल्लीतून विरोध झाला होता. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी वजन वापरून ही उमेदवारी आणली होती. त्यामुळे आता त्यांच्या वयाचीच अडचण महत्त्वाची आहे. त्यांचा मुलगा गणपतराव पाटील यांनी थेट उमेदवारी मागितलेली नाही, परंतु मला नसेल तर मुलास उमेदवारी द्या, असा आमदार पाटील यांचा आग्रह आहे. त्यानुसार गणपतराव पाटील यांनी गाठीभेटीही सुरू केल्या आहेत. तालुक्याच्या राजकारणात त्यांची राष्ट्रवादीच्या राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाशी युती आहे. विधानसभा वगळता अन्य निवडणुकीत ते एकमेकांना सोयीची भूमिका घेत असल्याचा अनुभव लोकांनाही आहे. या मतदारसंघातून ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील व अनिल यादव यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.शाहूवाडी मतदारसंघात कर्णसिंह गायकवाड यांनीच फक्त काँग्रेसकडे उमेदवारी मागितली असल्याने तीदेखील नक्की समजली जाते. तिथे गायकवाड यांच्यापेक्षा काँग्रेसलाच त्यांच्या उमेदवारीची जास्त गरज आहे. या मतदारसंघातून सलग दोन निवडणुकीमध्ये काँग्रेस पराभूत झाली आहे. आताही ती लढतीत तीन नंबरवर आहे. परंतु निवडणूक लढवली नाही तर गट टिकत नाही आणि पक्षाची प्रतिष्ठा म्हणून कर्णसिंह गायकवाड यांना हातात झेंडा घ्यावा लागेल, असे आजचे चित्र आहे. (प्रतिनिधी)