शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

शिरोळला पाणी नियोजनाची गरज

By admin | Updated: June 11, 2015 00:54 IST

दिवसाआड पुरवठा : दैनंदिन मुबलक पाणी पुरवठ्याचे ग्रामपंचायतीसमोर आव्हान

संदीप बावचे - शिरोळ--अनेक अडथळे पार करून पूर्णत्वास आलेल्या शिरोळच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे योग्य नियोजन ग्रामपंचायतीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाण्याचा होणारा अपव्यव तसेच दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे. वाढती लोकसंख्या, भविष्यातील पाण्याचे नियोजन आतापासूनच केले तरच शिरोळकरांना पाणी-पाणी म्हणण्याची वेळ येणार नाही.तालुक्याचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळची लोकसंख्या ४० हजारांच्या घरात पोहोचली आहे. वाढीव उपनगरांमुळे शहराचा विस्तारही वाढला आहे. पूर्वी पंचगंगा नदीवरून शिरोळची नळ पाणीपुरवठा योजना सुरू होती. पंचगंगेच्या दूषित पाण्यापासून सुटका होण्यासाठी कृष्णा नदीवरून पाणीपुरवठा योजना करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. श्रेयवादामुळे योजना पूर्णत्वास येणार की नाही, अशी परिस्थिती नव्या पाणीपुरवठा योजनेची बनली होती. अखेर अनेक वर्षांनंतर कृष्णेचे पाणी शिरोळकरांना मिळाले. सध्या घालवाड येथील कृष्णा नदीवरून ही योजना अखंडपणे सुरू आहे. मात्र, सध्या एक दिवसाआडच ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाकडे पाण्याच्या तीन टाक्या आहेत. मात्र, गावचा विस्तार मोठा असल्यामुळे दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असला, तरी काही नळधारक पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात करीत आहेत. एकीकडे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी कसरत होत असताना दुसरीकडे पाणी विनाकारण वाया जात असल्याचे प्रकारही काही ठिकाणी घडत आहेत. यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. नागरिकांना पाण्याचे महत्त्व कळण्यासाठी नळाला मिटर बसविण्याची गरज आता बनू लागली आहे. भविष्यकाळात वाढलेला विस्तार व पाण्याची मागणी ही बाब गंभीर बनण्यापूर्वीच आणि दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत कसा ठेवता येईल, याचे नियोजन आतापासूनच करण्याची गरज आहे. पेरी अर्बन योजना राबविणारशिरोळचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भविष्यातील पाण्याची गरज ओळखून पेरी अर्बन योजनेतून माणसी सत्तर लिटर पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव लवकरच मंजूर होऊन पेरी अर्बन योजना राबविण्यासाठी आमचा प्रयत्न राहिल, अशी माहिती उपसरपंच पृथ्वीराज यादव यांनी दिली.अकराशे रूपये पाणी २करशिरोळमध्ये नळधारकाला वार्षिक अकराशे रूपये पाणी पुरवठा कर आकारला जातो. शुद्ध व मुबलक पाणी देण्यासाठी नळ पाणीपुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरू असले, तरी या विभागला मर्यादा येत आहेत. यामुळे सध्या एक दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे. पाणी करातून कर्मचाऱ्यांचा पगार आणि वीज बील याचे नियोजन चांगले झाले आहे.