शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

शिरोळला पाणी नियोजनाची गरज

By admin | Updated: June 11, 2015 00:54 IST

दिवसाआड पुरवठा : दैनंदिन मुबलक पाणी पुरवठ्याचे ग्रामपंचायतीसमोर आव्हान

संदीप बावचे - शिरोळ--अनेक अडथळे पार करून पूर्णत्वास आलेल्या शिरोळच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे योग्य नियोजन ग्रामपंचायतीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाण्याचा होणारा अपव्यव तसेच दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे. वाढती लोकसंख्या, भविष्यातील पाण्याचे नियोजन आतापासूनच केले तरच शिरोळकरांना पाणी-पाणी म्हणण्याची वेळ येणार नाही.तालुक्याचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळची लोकसंख्या ४० हजारांच्या घरात पोहोचली आहे. वाढीव उपनगरांमुळे शहराचा विस्तारही वाढला आहे. पूर्वी पंचगंगा नदीवरून शिरोळची नळ पाणीपुरवठा योजना सुरू होती. पंचगंगेच्या दूषित पाण्यापासून सुटका होण्यासाठी कृष्णा नदीवरून पाणीपुरवठा योजना करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. श्रेयवादामुळे योजना पूर्णत्वास येणार की नाही, अशी परिस्थिती नव्या पाणीपुरवठा योजनेची बनली होती. अखेर अनेक वर्षांनंतर कृष्णेचे पाणी शिरोळकरांना मिळाले. सध्या घालवाड येथील कृष्णा नदीवरून ही योजना अखंडपणे सुरू आहे. मात्र, सध्या एक दिवसाआडच ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाकडे पाण्याच्या तीन टाक्या आहेत. मात्र, गावचा विस्तार मोठा असल्यामुळे दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असला, तरी काही नळधारक पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात करीत आहेत. एकीकडे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी कसरत होत असताना दुसरीकडे पाणी विनाकारण वाया जात असल्याचे प्रकारही काही ठिकाणी घडत आहेत. यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. नागरिकांना पाण्याचे महत्त्व कळण्यासाठी नळाला मिटर बसविण्याची गरज आता बनू लागली आहे. भविष्यकाळात वाढलेला विस्तार व पाण्याची मागणी ही बाब गंभीर बनण्यापूर्वीच आणि दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत कसा ठेवता येईल, याचे नियोजन आतापासूनच करण्याची गरज आहे. पेरी अर्बन योजना राबविणारशिरोळचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भविष्यातील पाण्याची गरज ओळखून पेरी अर्बन योजनेतून माणसी सत्तर लिटर पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव लवकरच मंजूर होऊन पेरी अर्बन योजना राबविण्यासाठी आमचा प्रयत्न राहिल, अशी माहिती उपसरपंच पृथ्वीराज यादव यांनी दिली.अकराशे रूपये पाणी २करशिरोळमध्ये नळधारकाला वार्षिक अकराशे रूपये पाणी पुरवठा कर आकारला जातो. शुद्ध व मुबलक पाणी देण्यासाठी नळ पाणीपुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरू असले, तरी या विभागला मर्यादा येत आहेत. यामुळे सध्या एक दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे. पाणी करातून कर्मचाऱ्यांचा पगार आणि वीज बील याचे नियोजन चांगले झाले आहे.