शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळला पाणी नियोजनाची गरज

By admin | Updated: June 11, 2015 00:54 IST

दिवसाआड पुरवठा : दैनंदिन मुबलक पाणी पुरवठ्याचे ग्रामपंचायतीसमोर आव्हान

संदीप बावचे - शिरोळ--अनेक अडथळे पार करून पूर्णत्वास आलेल्या शिरोळच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे योग्य नियोजन ग्रामपंचायतीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाण्याचा होणारा अपव्यव तसेच दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे. वाढती लोकसंख्या, भविष्यातील पाण्याचे नियोजन आतापासूनच केले तरच शिरोळकरांना पाणी-पाणी म्हणण्याची वेळ येणार नाही.तालुक्याचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळची लोकसंख्या ४० हजारांच्या घरात पोहोचली आहे. वाढीव उपनगरांमुळे शहराचा विस्तारही वाढला आहे. पूर्वी पंचगंगा नदीवरून शिरोळची नळ पाणीपुरवठा योजना सुरू होती. पंचगंगेच्या दूषित पाण्यापासून सुटका होण्यासाठी कृष्णा नदीवरून पाणीपुरवठा योजना करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. श्रेयवादामुळे योजना पूर्णत्वास येणार की नाही, अशी परिस्थिती नव्या पाणीपुरवठा योजनेची बनली होती. अखेर अनेक वर्षांनंतर कृष्णेचे पाणी शिरोळकरांना मिळाले. सध्या घालवाड येथील कृष्णा नदीवरून ही योजना अखंडपणे सुरू आहे. मात्र, सध्या एक दिवसाआडच ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाकडे पाण्याच्या तीन टाक्या आहेत. मात्र, गावचा विस्तार मोठा असल्यामुळे दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असला, तरी काही नळधारक पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात करीत आहेत. एकीकडे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी कसरत होत असताना दुसरीकडे पाणी विनाकारण वाया जात असल्याचे प्रकारही काही ठिकाणी घडत आहेत. यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. नागरिकांना पाण्याचे महत्त्व कळण्यासाठी नळाला मिटर बसविण्याची गरज आता बनू लागली आहे. भविष्यकाळात वाढलेला विस्तार व पाण्याची मागणी ही बाब गंभीर बनण्यापूर्वीच आणि दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत कसा ठेवता येईल, याचे नियोजन आतापासूनच करण्याची गरज आहे. पेरी अर्बन योजना राबविणारशिरोळचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भविष्यातील पाण्याची गरज ओळखून पेरी अर्बन योजनेतून माणसी सत्तर लिटर पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव लवकरच मंजूर होऊन पेरी अर्बन योजना राबविण्यासाठी आमचा प्रयत्न राहिल, अशी माहिती उपसरपंच पृथ्वीराज यादव यांनी दिली.अकराशे रूपये पाणी २करशिरोळमध्ये नळधारकाला वार्षिक अकराशे रूपये पाणी पुरवठा कर आकारला जातो. शुद्ध व मुबलक पाणी देण्यासाठी नळ पाणीपुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरू असले, तरी या विभागला मर्यादा येत आहेत. यामुळे सध्या एक दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे. पाणी करातून कर्मचाऱ्यांचा पगार आणि वीज बील याचे नियोजन चांगले झाले आहे.