शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

शिवारं तयार ! शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

By admin | Updated: June 1, 2016 00:54 IST

पेरण्या खोळंबल्या : मान्सूनचाही अंदाज येत नसल्याने बळिराजा चिंतेत; ५४८ हेक्टरवर भाताची धूळवाफ पेरणी

कोल्हापूर : यंदाच्या उन्हाळ्यात अपवाद वगळता एकही मोठा वळवाचा पाऊस झालेला नाही. आजही भाजून काढणारे ऊन आहे. पावसाची चाहूल लागली नसल्याने शेतकरी पेरणीसाठी थांबला आहे. पावसाचे वातावरण झाल्यावर पेरणीसाठी लगीनघाई सुरू होते; परंतु ते चित्र अजून पाहायला मिळत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ५४८ हेक्टर क्षेत्रात भाताची धूळवाफ पेरणी झाली आहे.यंदाच्या हंगामात पाऊसमान भरपूर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. सोशल मीडियावरही त्याचेच चित्र रंगविले जात आहे; परंतु शेतकऱ्यांना त्याचे काही खरे वाटत नाही. जेव्हा हवामान खाते पाऊस जास्त आहे म्हणून सांगते तेव्हा त्याच्या उलटाच अनुभव येत असल्याचे त्यांचे म्हणणे असते. गेल्या वर्षीही पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे जमिनीची तहान भागली नाही. यंदाच्या उन्हाळ्यात प्रचंड उष्मा होता. त्यामुळे एक-दोन तर चांगले वळीव होतील, अशी अपेक्षा होती; परंतु काही तालुके वगळता असा पाऊस झालेला नाही. चांगले वळीव झाले की शेती मशागतीसाठी सहज तयार होते. नांगरटीनंतर निघणारी ढेकळे नुसत्या मशागतीने फुटत नाहीत. त्यासाठी पावसाची गरज असते. मातीलाही फूल येते. शेतकऱ्याचे कष्ट थोडे कमी होतात; परंतु यंदा त्यातले काहीच घडलेले नाही.बुधवारी मे संपून जून सुरू होत आहे. जून म्हटले की पावसाळा सुरू झाला असे म्हटले जाई; परंतु पावसाळा सोडाच, त्याची चाहूलही अद्याप लागलेली नाही. सायंकाळनंतर थोडे गार वारे सुटते; परंतु त्यालाही जोर नाही. यंदा ७ जूनला मृग नक्षत्र सुरू होते. त्याचे वाहन बेडूक आहे. पाऊस पडून गेल्यावर एकतर हवेतील उष्मा कमी होतो. लोकांनाही थोडे सुसह्य वाटते. पिण्याच्या पाण्याची काही प्रमाणात चिंता मिटते. जनावरांच्या पाण्याची सोय होते; परंतु यंदा यातले काहीच घडलेले नाही. त्यामुळे बहुतेक गावांतील माळामुरुडाची पिके वाळून गेली आहेत. जी नदी व विहिरीच्या पाण्यावर तगून आहेत, त्यांच्याही वाढीवर परिणाम झाला आहे. वळवाचा पत्ता नाही आणि मोसमी पावसाचेही ढग अजून जमा होईना झाले आहेत. आता कुठे अंदमानात पाऊस आल्याच्या बातम्या आहेत. केरळमध्ये १ जूनला पाऊस आल्यावर तो आपल्याकडे यायला आठवडा लागतो. त्यामुळे सध्याचे स्वच्छ वातावरण पाहून पाऊस यायला दहा जून उजाडेल की काय, अशी भीती शेतकऱ्याच्या मनात आहे. त्यामुळेच शेतजमीन तयार करून तो थांबला आहे. याचा परिणाम म्हणून अद्याप पेरणीला जोर लागलेला नाही.शेतकऱ्यांनी बी-बियाणे आणले आहे; परंतु पाऊस नसल्याने तो आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस नाही. नदीत पाणी आहे; परंतु वीज नाही. त्यामुळे रोपलागणीसाठी तरवे टाकता आलेले नाहीत. शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. - विठ्ठल पाटील, शेतकरी, पाटपन्हाळा, ता. पन्हाळापावसाचा काहीच मागमूस नाही. त्यामुळे पेरणी करून धोका पत्करायला शेतकरी तयार नाहीत. साधारणत: मृग सुरू झाल्यानंतर त्याचा रागरंग पाहून पेरणीस गती येईल. - सुरेश मगदूम, कृषी उपसंचालक