शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

दारू, जेवणावळींशिवाय शेट्टी यांचा विजय

By admin | Updated: May 18, 2014 00:45 IST

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर दारू नाही की मांसाहारी सोडाच, शाकाहारी जेवणाचे एक ताटही कुठल्या कार्यकर्त्याला दिले नाही. मतांसाठी पैसे द्यायची तर बातच नाही.

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर दारू नाही की मांसाहारी सोडाच, शाकाहारी जेवणाचे एक ताटही कुठल्या कार्यकर्त्याला दिले नाही. मतांसाठी पैसे द्यायची तर बातच नाही. तरीही हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जनतेने खासदार राजू शेट्टी यांना तब्बल एक लाख ७७ हजार मतांनी दुसर्‍यांदा विजयी केले. उमेदवार चांगला असेल तर अन्य कोणतीही आमिषे दाखविली तरी लोक त्याच्याच पदरात आपल्या मताचे दान कसे टाकतात, याचे हे महाराष्ट्रातील अत्यंत दुर्मीळ उदाहरण... आणि ते एकदाच घडलेले नाही. सलग चौथ्यांदा हा अनुभव त्यांच्या वाट्याला आला आहे. किंबहुना हीच त्यांची निवडणुकीची पात्रता ठरली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक असलेले खासदार शेट्टी लोकसभा निवडणुकीसाठी दुसर्‍यांदा उभे होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे हे मातब्बर उमेदवार रिंगणात होते. पैशापासून यंत्रणेपर्यंत कोणत्याही टप्प्यावर वरचढ ठरणारा उमेदवार विरोधात असूनही शेट्टी यांना लोकांनी ऊस आंदोलनाच्या चळवळीबद्दलची कृतज्ञता म्हणून निवडून दिले, हे शंभर टक्के खरे असले तरी त्यामध्ये शेट्टी यांचे स्वच्छ चारित्र्य, घरदार सोडून ते शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी करीत असलेला संघर्ष व सामान्य जनतेशी असलेले त्यांचे अकृत्रिम नाते या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या ठरल्या आहेत. दारू व जेवणावळी न घालता या निवडणुकीत मेधा पाटकर, सुभाष वारे, सदाभाऊ खोत, बी. जी. कोळसे-पाटील यांसारखे आणखीही काही चांगले उमेदवार रिंगणात जरुर होते परंतु त्यांना विजयापर्यंत जाता आले नाही. शेट्टी यांनी गेल्या पंधरा वर्षांत चार निवडणुका लढवल्या व त्या सर्वही स्पष्ट बहुमताने जिंकल्या. पहिली निवडणूक ते जिल्हा परिषदेच्या उदगाव मतदारसंघातून लढले. त्यानंतर २००४ची विधानसभा निवडणूक शिरोळ मतदारसंघातून ते विजयी झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन खासदार निवेदिता माने यांचा तब्बल ९५ हजार मतांनी पराभव केला. या सगळ्या निवडणुकीत त्यांना जनतेने ‘एक व्होट... एक नोट’ दिली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्याकडे ३५ हजार शिल्लक राहिले. विधानसभेला दोन-अडीच लाख, गत लोकसभा निवडणुकीत पाच, तर यंदाच्या निवडणुकीत दहा लाखांहून अधिक रक्कम शिल्लक राहिली आहे. शेट्टी यांच्या कामाची आता राज्यभर ओळख निर्माण झाल्याने यंदा सगळीकडून निधी आला. त्यातून शेट्टी व संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या निवडणुकीचा खर्च लोकवर्गणीतून करण्यात आला. तुम्ही किती कार्यकर्त्यांना हॉटेलात जेवण दिले असे विचारल्यावर शेट्टी गमतीने म्हणाले, ‘अहो, त्यांना जेवण द्यायचे सोडा; उलट मीच लोकांचे खाल्ले. निवडणुकीच्या काळात फार क्वचितच मी घरी जेवायला गेलो. ज्या गावात सभा असेल तिथेच कार्यकर्त्यांच्या घरी जेवत असे. मी शाकाहारी असल्याने कार्यकर्ते हौसेने गोडधोड करून आग्रहाने खाऊ घालतात; त्यामुळे माझे शारीरिक वजन वाढले आहेच; परंतु त्यांच्यामुळेच माझे राजकीय वजनही वाढले, याची जाणीव मला आहे. त्यांनी जेऊ घातलेल्या अन्नाच्या घासाशी व दिलेल्या एक रुपयाशी प्रतारणा होईल असे वर्तन माझ्याकडून कधीच होणार नाही. हा विश्वास हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे.’