शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
4
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
5
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
6
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
7
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
8
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
9
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
10
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
11
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
12
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
13
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
14
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
15
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
16
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
17
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
18
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
19
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
20
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही कॉँग्रेससह भाजपकडून शेट्टींची कोंडी

By admin | Updated: February 20, 2017 00:47 IST

ंजिल्हा परिषद निवडणुका : ‘स्वाभिमान’ जिवंत ठेवण्यासाठी कार्यकर्ते कामाला

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस या पारंपरिक विरोधकांबरोबरच भाजप, शिवसेना या मित्रपक्षांनी कोंडी केली आहे. खासदार राजू शेट्टी यांना शिरोळ, हातकणंगले या बालेकिल्ल्यांतच रोखण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी प्रचार यंत्रणा आक्रमकपणे राबवून कोंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेचा जन्म झाला. गेली पंधरा-वीस वर्षे शेतीमालाच्या दरांसाठी रस्त्यांवर उतरून सरकारशी संघर्ष करण्याचे काम संघटनेने केले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. ऊसदरासाठी टोकाचा संघर्ष करीत शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पाडून देण्यामध्ये संघटनेचे योगदान फार मोठे आहे. राज्य व केंद्रातील आघाडी सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करीत सत्तांतर करण्यात संघटनेची भूमिका निर्णायक राहिली, हे नाकारता येणार नाही. खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह संघटनेच्या राज्यातील कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात प्रचाराचे रान उठविले. भाजप-शिवसेना सरकारकडून संघटनेने ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या, त्यांपैकी काहींची पूर्तताही झाली. त्यामुळे उसाचे दोन हंगाम विनाकोंडीचे सुरू झाले; पण त्यानंतर सरकारची भूमिका काहीशी बदलत गेल्याने खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले. शेतकरीविरोधी भूमिका असेल त्या ठिकाणी त्यांनी सरकारला रोखण्याचे काम केले आणि तेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खटकत गेले. राजू शेट्टी व सदाभाऊ खोत हे दोन नेते संघटनेची ताकद आहेत, हे ओळखून भाजपने खोत यांना शेट्टी यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर एकीकडे मित्रपक्ष म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद, पंचायत समितीत जागावाटपात जाणीवपूर्वक डावलण्याची खेळीही भाजप नेत्यांनी केली. शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा ‘स्वाभिमान’ जिवंत ठेवत, ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे २२ हून अधिक उमेदवार उभे केले. भाजपने कुरघोडी करीत ‘स्वाभिमानी’च्या काही कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री पाटील यांनी सभांच्या माध्यमातून ‘स्वाभिमानी’च्या उमेदवारांसमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला; पण शेट्टी यांनी आक्रमकपणे प्रचार यंत्रणा राबविल्याचे चित्र शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत दिसते.