शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसू : आठवले

By admin | Updated: June 7, 2016 07:39 IST

केंद्रात मंत्रिपद हवे : मुंबई महापालिकेत आघाडीसाठी प्रयत्नशील

कोल्हापूर : केंद्रात एक मंत्रिपद व राज्यात विधान परिषदेच्या दोन जागा न मिळाल्यास पुढील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसू, असा गर्भित इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. ‘वैचारिक संवाद’ परिषदेसाठी ते येथे आले होते. मुंबई पालिकेत सेना, भाजपसह रिपब्लिकन पक्षाने आघाडी करून निवडणूक लढवावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पक्षाला केंद्रात एक मंत्रिपद, दोन विधान परिषदेच्या जागा देण्याचे मान्य केले होते. परंतु, अद्यापही त्यांनी ही मागणी पूर्ण केलेली नाही. केंद सरकारने दलितांचे काही प्रश्न सोडविले. परंतु, विधान परिषदेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला जागा मिळाली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत हे काही दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून एका कार्यक्रमात बसले होते. त्याची दखल घेऊन भाजपने खोत यांना विधान परिषदेचे आमदार केले; पण रिपब्लिकन पक्षाला आमदारकी दिली नाही. खोत जर अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसणार असतील, तर माझी ताकद शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची आहे. त्यामुळे भाजपने आमची दखल न घेतल्यास तो ही मार्ग आम्हाला खुला आहे, असे आठवले यांनी ठणकावून सांगितले. (प्रतिनिधी) अयोध्येतील राम मंदिरास विरोधअयोध्येत राम मंदिर बांधण्यास आपल्या पक्षाचा तीव्र विरोध असल्याचे सांगून आठवले म्हणाले, ‘मंदिर बांधणार असाल तर तिथे बुद्ध मंदिर व मशीदही बांधावी, असा आमचा आग्रह आहे. शालेय अभ्यासक्रमात भाजप सरकारकडून जे भगवेकरण सुरू आहे, त्यालाही आमचा विरोध आहे. कोल्हापुरात शाहू मिलच्या जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक व्हावे, यासाठी पाठपुरावा करणार आहे.’खडसे यांची पाठराखण...महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ नये, असे माझे मत होते; पण त्यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला. उलट, माहिती अधिकाराचा वापर करणारे कार्यकर्ते हेच भ्रष्टाचारी असतात, असे आठवले यांनी सांगितले. प्रभाग निश्चितीला विरोध...नगरपालिका, महापालिका निवडणुकीत चार प्रभागांचा मिळून एक प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आपला विरोध आहे. शिवसेना-भाजपची मतदारांची संख्या महानगरांत जास्त आहे. त्यामुळे त्यांनाच याचा फायदा होईल. छोट्या पक्षांना त्यांचा कोणता फायदा नसून, छोट्या पक्षांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, असे आठवले म्हणाले.