शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

शाहूवाडीत वीज वितरण कंपनीचा कारभार चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:18 IST

राजाराम कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील महावितरण कंपनीकडून ग्राहकांना दर्जेदार, वेळेवर सेवा मिळत ...

राजाराम कांबळे

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील महावितरण कंपनीकडून ग्राहकांना दर्जेदार, वेळेवर सेवा मिळत नाही. ग्राहकांकडे पैशाची मागणी करून पिळवणूक केली जात आहे. वारूळ विभागाचे कनिष्ठ अभियंता मनोज भोरगे हे तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्यामुळे शाहूवाडीतील महावितरण कंपनीच्या उपविभागाचा कारभार उजेडात आला आहे.

महावितरण कंपनीच्या जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून ग्राहकांची होणारी आर्थिक लुटमार थांबवावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

शाहूवाडी तालुका डोंगर, कड्या कपारीत वसला आहे. तालुक्याचे क्षेत्रफळ जास्त आहे. पावणेदोन लाखांवर लोकसंख्या असून ती वाडी वस्तीवर वसली आहे. महावितरण कंपनीचे तालुकाभर घरगुती, कमर्शिअल ग्राहक आहेत. शाहूवाडी, मलकापूर, सरुड, वारूळ, बांबवडे, या ठिकाणी कनिष्ठ दर्जाचे अधिकारी काम करीत असतात. मीटर बदलणे, घरगुती तक्रार, नवीन विद्युत खांब बसवणे, डीपी किंवा ट्रान्सफाॅर्मर बसवणे, नवीन वीज कनेक्शन देणे, आदी कामे महावितरण कंपनी स्वत: किंवा ठेकेदाराकडून करून घेते. मात्र, महावितरण कंपनीचे काही कनिष्ठ दर्जाचे अधिकारी, कर्मचारी ग्राहकांची कामे वेळेवर करून देत नाहीत. ग्राहकांना हेलपाटे मारायला लावले जातात. अधिकारी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्याकरवी पैशांची मागणी केली जाते. मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत काम केले जात नाही. तालुक्याच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करून देखील ग्राहकांची दखल घेतली जात नाही. मुख्य कार्यालयात ग्राहकांच्या प्रश्नांना उद्धट उत्तरे दिली जातात. कार्यालयात कामासाठी येणाऱ्या ग्राहकाला आपण येथे येऊन चूक केली, असे वाटते. ग्राहकांनी बिल थकविल्यास नोटीस न देता ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडले जाते. वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता काही अधिकाऱ्यांनी लाखो रुपये घेऊन ट्रान्सफाॅर्मर बसवले आहेत. शाहूवाडीत जमिनीला मोठा भाव आल्यामुळे येथे अनेक गर्भश्रीमंतांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. रिसॉर्ट, हॉटेल, बंगले, प्लॉट पाडण्यासाठी महावितरण कंपनीची लाइटची गरज असते. लाखो रुपये लाच घेऊन पंधरा दिवसांत ट्रान्सफाॅर्मर बसवून लाइट जोडली जाते. सर्वसामान्य मात्र पैसे नसल्यामुळे वर्षभर हेलपाटे मारत असतो. आर्थिक व्यवहार करणाऱ्याचे काम अगोदर केले जाते. कुंपणच शेत खात असेल तर ग्राहकांनी न्याय कुणाकडे मागायचा, अशी परिस्थिती आहे.

ठेकेदाराकडून ग्राहकांची लूट

महावितरण कंपनीकडून नेमलेले ठेकेदारदेखील अधिकाऱ्यांशी संगनमत करून ग्राहकांना वेठीस धरून आर्थिक व्यवहार केला जातो. वेळेवर ग्राहकांची कामे केली जात नाहीत. अशा ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.