शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

शाहू मार्केट टेंबलाईवाडीला जोडणार

By admin | Updated: January 19, 2016 00:36 IST

बाजार समिती : माजी संचालकांकडून लवकरात लवकर पैसे वसूल करा : चंद्रकांतदादा

कोल्हापूर : शाहू मार्केट यार्ड व टेंबलाईवाडी येथील नियोजित धान्य मार्केट जोडण्यासाठी रेल्वेरुळावर फाटक अथवा उड्डाणपूल करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही सहकार व पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. पाटील यांनी रविवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत आढावा बैठक घेतली. माजी संचालकांवरील जबाबदारी निश्चितीचे काय झाले, असा सवाल करत लवकरात लवकर त्यांच्याकडून पैसे वसूल करा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. टेंबलाईवाडी मार्केटमध्ये सुविधा नसल्याने धान्य व्यापारी लक्ष्मीपुरी सोडण्यास तयार नसल्याचे नंदकुमार वळंजू व सदानंद कोरगावकर यांनी निदर्शनास आणून दिले. शाहू मार्केटमधून टेंबलाईवाडी मार्केटमध्ये जाण्यासाठी सहा किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. वाहतुकीचा खर्च अंगावर बसत असल्याने व्यापारीही तिथे जाण्यास नाखूश आहेत. यासाठी शाहू मार्केट ते टेंबलाईवाडी मार्केट जोडावे, अशी मागणी वळंजू व कोरगावकर यांनी केली. या दोन मार्केटमध्ये रेल्वे रूळ आहे, तेथून वाहतूक करण्यासाठी एक तर रेल्वे फाटक करायला हवे अन्यथा उड्डाणपूल उभारावे लागेल. उड्डाणपुलाबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलू, पण त्या ऐवजी रेल्वे फाटक केले तर ते अधिक सोयीचे होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. याबाबत रेल्वेमंत्र्यांशी बोलून मार्ग काढू, असे आश्वासन त्यांनी दिले. २२ माजी संचालकांवर जबाबदारी नोटिसा लागू केल्या असून जानेवारीअखेर पैसे भरण्याचे आदेश दिल्याचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी सांगितले. वेळेत पैसे भरले नाही, तर पुढील कारवाई काय करणार, अशी विचारणा मंत्री पाटील यांनी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी महसुली कारवाई करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले. अस्थापनावर ४५ टक्केपेक्षा जास्त खर्च होत असल्याचे निदर्शनास आणून देत सुरक्षारक्षक समितीचे आहेत की खासगी कंपनीचे अशी विचारणा मंत्री पाटील यांनी केली. इतर समित्यांमध्ये खासगी सुरक्षारक्षक नेमले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. गूळ क्लस्टरसाठी शासन पातळीवर प्रयत्न करणार असून, शेतकऱ्यांच्या हिताचे प्रस्ताव पाठवा, निधी कमी पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्णातील उर्वरित बाजार समित्यांसह सांगली व सातारा जिल्ह्यांतील समित्यांचा आढावा घेतला. बैठकीला विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे, समितीचे सभापती परशराम खुडे, विलास साठे, विजय नायकल, पणन मंडळाचे अधिकारी, समितीचे संचालक उपस्थित होते.