शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

शाहू स्मारकाचे काम कागदाच्या भेंडोळ्यातच..!

By admin | Updated: June 7, 2014 01:04 IST

क्लेशदायक अनुभव : सहा महिन्यांत बैठकही नाही

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरयेथील शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठीचा प्राथमिक आराखडा जानेवारीत निश्चित झाला; परंतु त्यानंतर गेल्या सहा महिन्यांत स्मारकाचे काम कागदाच्या भेंडोळ््यातच आहे. आता ज्या संथगतीने या स्मारकाचे काम सुरू आहे, ते पाहता हे स्मारक पूर्ण होण्यासाठी दशक लागेल, अशी स्थिती आहे. राज्य शासनाने कालच अर्थसंकल्पात या स्मारकासाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्य शासन, महापालिका व स्मारक समितीच्या सवडीने जसे जमेल तसे हे काम सध्या सुरू असून ते अधिक संतापजनक आहे. ही जागा वस्त्रोद्योग महामंडळाकडून ताब्यात घेण्याची प्रक्रियाच अद्याप सुरू झालेली नाही. ती तातडीने सुरू होण्याची आवश्यकता आहे.ऐतिहासिक शाहू मिल परिसरातील सत्तावीस एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू स्मारकाचा आराखडा कोथरूड (पुणे) येथील डिझाईन कन्सल्टंट आर्किटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा निश्चित करण्यात आला. त्याचे सादरीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ७ जानेवारीस मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आले. त्यावेळी शासनाने या कामासाठी एक कोटी रुपये मंजूर केले. स्मारकासाठी शासनाने नियुक्त केलेल्या पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या सर्व सदस्यांना बैठकीस बोलावण्यात आले होते. त्यावेळी आराखड्यात काही बदल सुचविण्यात आले. त्याच संस्थेला या आराखड्याचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; परंतु या संस्थेलाच हे काम द्यावे, असा ठराव स्थायी समितीत मंजूर होण्याची आवश्यकता आहे. ती प्रक्रिया अजून झालेली नाही. गेल्या सहा महिन्यांत शाहू मिल स्मारक समितीची एकही बैठकच झालेली नाही. त्यामुळे कामही ठप्पच आहे. ही जागा आता महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात आहे. मुंबईच्या मंत्री रिअ‍ॅलिटीचा दावा २२ जानेवारी २०१३ जिल्हा न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर जागेची मालकी महामंडळाकडे निर्विवादपणे आली. आता ही जागा महामंडळाकडे असल्याने ती ताब्यात घेण्यास फारशी अडचण नाही; परंतु त्याची प्रक्रिया तरी करावीच लागेल. जागा ताब्यात द्यावी, असा प्रस्ताव महसूल विभागाकडून महामंडळाकडे पाठवावा लागेल. महामंडळाच्या सभेत त्यास मंजुरी देऊन मग ही जागा महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्यात येईल. त्यानंतरही जागा स्मारक विकसित करण्यासाठी उपलब्ध होऊ शकेल. हे सगळे होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो म्हणून जागा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव तातडीने पाठविणे आवश्यक आहे. मुंबईतील बैठकीत त्यासंबंधी कोणतीच अडचण येणार नाही, असे स्वत: मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे हे खरे असले तरी त्यासाठीची प्रक्रिया तरी सुरू व्हायला हवी.