शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

नूतन वर्षात बदलणार सातवी, नववीचा अभ्यासक्रम

By admin | Updated: April 5, 2017 23:35 IST

पाठ्यपुस्तक मंडळ : शाळा, शैक्षणिक वस्तू भांडार तसेच शिक्षण विभागाला पत्र पाठवून सूचना

मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता सातवी व आठवीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळातर्फे शाळा, शैक्षणिक वस्तू भांडार तसेच शिक्षण विभागाला पत्र पाठवून सूचना केली आहे. शैक्षणिक वर्ष २०१८ - १९मध्ये आठवीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ सुधारित बदलाच्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता तिसरीचा परिसर अभ्यास (जिल्हा भूगोल) व इयत्ता चौथी व पाचवीचा परिसर अभ्यास भाग १ व २ ही पाठ्यपुस्तके पुढील वर्षी (२०१८- १९) मध्ये बदलणे अपेक्षित आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये जुन्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष आहे.शैक्षणिक वर्ष २०१८ - १९ मध्ये ेइयत्ता आठवी व दहावीची पाठ्यपुस्तके बदलणार आहेत. त्यामुळे २०१७ - १८ हे इयत्ता आठवी व दहावीच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष आहे. आठवीचा अभ्यासक्रम पुढीलवर्षी बदलणार असला तरी येत्या शैक्षणिक वर्षात संस्कृत प्रवेश व प्रवेशिका ही पुस्तके बदलण्यात येणार आहेत. पुढीलवर्षी अभ्यासक्रम बदलणार असला तरी यावर्षी संस्कृतची पुस्तके बदलण्याचा घाट घातला जात आहे. गेली काही वर्षे विद्यार्थ्यांना थेट शाळेतून पुस्तके देण्यात येत आहेत. शासनमान्य शाळांतून पुस्तके देण्यात येत आहेत. केवळ खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना बाजारातून पुस्तके विकत घ्यावी लागतात. त्यामुळे दुकानातून पुस्तकांची संख्या मर्यादित असली तरी स्वाध्याय पुस्तिका, मार्गदर्शक मात्र विक्रीस उपलब्ध आहेत.चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या मराठी माध्यमाची विद्यार्थीसंख्या १ लाख ३९ हजार २३७, तर उर्दू माध्यमाची संख्या १० हजार २५६ इतकी आहे. एकूण १ लाख ४९ हजार ४९३ विद्यार्थी अध्यापन करीत आहेत. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ८ लाख ४ हजार ५४७ पाठ्यपुस्तके व २ लाख ३४ हजार ५२९ स्वाध्याय पुस्तिकांची आवश्यकता आहे. उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ७३ हजार ३३९ पाठ्यपुस्तके व १३ हजार ४८३ स्वाध्याय पुस्तिका आवश्यक आहेत. स्वाध्याय पुस्तिका केवळ इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना दिली जाते. मात्र, सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येत असल्यामुळे पाठ्यपुस्तक महामंडळाकडून शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा, तालुका पातळीवर पुस्तकांचे वितरण केले जाते. परंतु यावर्षीपासून पाठ्यपुस्तके, स्वाध्यायपुस्तिकांऐवजी त्याचे पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे पैसे त्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. मोफत पाठ्यपुस्तके योजनेच्या रकमा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी राष्ट्रीयीकृत, शेड्युल, ग्रामीण बँक या बँकांमध्ये शून्य रकमेचे लाभार्थी खाते काढून या खात्याला संबंधित विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक निगडित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. लाभार्थी विद्यार्थ्यांचे बँकेत शून्य रकमेचे लाभार्थी खाते न काढल्यास विद्यार्थ्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार नसल्याची स्पष्ट सूचना प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांनी काढली आहे. लवकरच पुस्तके बाजारातपुढील वर्षी चाथी आणि पाचवीचा परिसर अभ्यास तसेच तिसरीचा परिसर अभ्यास ही पुस्तके बदलण्यात येण्याची शक्यता आहे. यावर्षी सातवी आणि नववीची पुस्तके बदलण्यात येणार असून नवीन पुस्तके छपाईची प्रक्रियाही सुरु झाली आहे. लवकरच ही पुस्तके बाजारात उपलब्ध होणार आहेत.