शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साखर मूल्यांकनात सातव्यांदा घट

By admin | Updated: June 18, 2015 00:10 IST

७० रुपयांची घट : कारखान्यांना २१०० रुपये साखर पोत्यावर उचल देण्याचा राज्य बँकेचा निर्णय

कोपार्डे : साखरेच्या दरात २००० प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाल्याने अवघ्या १५ दिवसांत कारखानदारांना प्रतिक्विंटल देण्यात येणाऱ्या उचलीत पुन्हा घट करण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असणाऱ्या २२७५ साखर मूल्यांकनात अवघ्या सव्वा महिन्यात तीनवेळा घट करीत २१०० रुपये प्रतिक्विंटलवर आणल्याने साखर उद्योगावर आस्मानी आर्थिक संकटच आल्याची प्रतिक्रिया साखर उद्योगातून व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी साखर हंगामाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऊसदराच्या संघर्षाशिवाय सुरुवात झाली. हंगाम सुरुवातीला शेतकरी संघटनांनी संघर्षापेक्षा कायद्याच्या लढाईला महत्त्व देत एफआरपीप्रमाणे कारखानदारांनी उसाचे दर जाहीर करावेत व कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू करावेत, असे जाहीर केले. तसा शासनदरबारीही तगादा लावला. त्यामुळे शासनानेही जे कारखाने एफआरपीप्रमाणे ऊसदर जाहीर करणार नाहीत, अशा कारखान्यांना नोटिसा बजावल्या. याचा परिणाम जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊसदर जाहीर केले. यावेळी साखरेचे दर ३००० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल होते. मात्र, यानंतर साखरेच्या दरात सुरू झालेल्या घसरणीला ब्रेक लागेना झाल्याने आताच्या एफआरपीप्रमाणे ऊसदर देण्याची रक्कम कशी उभा करायची, हा प्रश्न कारखानदारांपुढे आहे. कारखान्यांना पतपुरवठा करणाऱ्या राज्य सहकारी बँकेनेही आपले धोरण बदलले आहे. प्रत्येक तिमाहीला राज्य बँक साखरेच्या बाजारातील दराप्रमाणे कारखान्यांना प्रतिक्विंटल कर्जरूपात उचल देत होती. मात्र, सातत्याने साखरेच्या दरातील घसरण पाहून राज्य बँकेने गेल्या सव्वा महिन्यात तीनदा साखर मूल्यांकनात घट केली आहे. ५ मे रोजी प्रतिक्विंटल २२७५ रुपये देण्याचे राज्य बँकेने जाहीर केले, तर केवळ पंधरा दिवसांत यात बदल करीत २२ मे २०१५ रोजी प्रतिक्विंटल १०५ रुपये मूल्यांकनात घट करून ते २१७० रुपये केले, तर यानंतर अवघ्या दहा दिवसांत यात बदल करीत ७० रुपये प्रतिक्विंटल मूल्यांकन घटवून ५ जून २०१५ला ते २१०० रुपये केल्याने साखर कारखानदारांचे आभाळच फाटले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेले दोन हजार कोटी पॅकेज व आता केंद्राने जाहीर केलेले सहा हजार कोटींचे पॅकेज याबाबत कोणतेच नोटिफिकेशन काढले नसल्याने ते कधी व कसे मिळणार याकडे कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे, तर ज्या शेतकऱ्यांची एफआरपीप्रमाणे ऊस बिले कारखानदारांकडे थकीत आहेत त्यांचे लक्ष कधी बिले अदा होणार याकडे लागून राहिले आहे. (वार्ताहर)कारखानदारांसमोर यक्ष प्रश्न राज्य बँकेने प्रतिक्विंटल २१०० रुपये मूल्यांकन जाहीर केले असले तरी याच्या केवळ ८५ टक्केच म्हणजे १७८५ रुपये बँक कारखान्यांना देते. या १७८५ मधूनही राज्य बँकेने पूर्वी दिलेल्या कर्जाचे हप्ते, प्रक्रिया खर्च, व्याज, पगार असे ५०० ते ७४० रुपये कपात करते. याचा विचार केल्यास उसाची एफआरपी देण्यासाठी कारखान्यांच्या हातात केवळ १०३५ रुपयेच शिल्लक राहणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची एफआरपी २४०० ने २६५० आह. याचा अर्थ अजून १४५० ते १६०० रुपये रक्कम प्रतिटन ऊसदर देण्यास कोठून उभी करायची, हा यक्ष प्रश्न कारखानदारांसमोर उभा ठाकला आहे. साखरेच्या दरात घसरणनोव्हेंबर, डिसेंबर २०१४ मध्ये २९०० ते ३००० प्रतिक्विंटल असणारे साखरेचे दर गेल्या सहा महिन्यांत ८०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल घसरले आज एक्स फॅक्टरी साखरेचे दर २००० ते २१०० रुपये आहे. उत्पादन खर्चापेक्षा ७०० ते ८०० रुपये हा दर कमी आहे.