शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांपूर्वी गीतांजली...आता पल्लवी!

By admin | Updated: June 22, 2016 01:30 IST

दुसरा बळी : छेडछाडीने धगधगतोय धनगरवाडा; गुंडांचा कायमचा बंदोबस्त गरजेचा

तानाजी पोवार --कोल्हापूर --दारात सुया टोचलेले लिंबू टाकणे, देव घालणे, कौल लावणे अशा अंधश्रद्धेच्या फेऱ्यात आज बोंदे्रनगरातील धनगरवाड्यातील लोकांचा प्रवास सुरू आहे. मोलमजुरीसाठी त्यांचे हात नेहमीच कामात लागले, शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले अन् अशिक्षितपणाची झूल पांघरून हा धनगरवाडा अंधश्रद्धेकडे आपोआप झुकला. गेल्या काही वर्षांत पहाटे, सकाळी काम करून दिवसभर वसाहतीत टिंगल-टवाळी करणाऱ्या युवकांच्या टोळक्याने येथील युवती, महिलांना लक्ष्य करून आपले गुंडगिरीचे बस्तान बसविले. गेल्या सात महिन्यांत गीतांजलीपाठोपाठ पल्लवीचाही या टोळक्याने बळी घेतला.राधानगरी, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यांतील दुर्गम भागातील हा धनगर समाज गेल्या पंचवीस वर्षांत हातांना काम मिळविण्यासाठी हळूहळू कोल्हापूरकडे आला, बोंद्रेनगरानजीक त्यांचा ठिय्या पडला. तीच बनली धनगर वसाहत. फुलेवाडी रिंग रोडवर बोंद्रेनगरनजीक हा सुमारे हजार-बाराशे लोकवस्तीचा धनगरवाडा. सोयी-सुविधांच्या गर्तेत अडकलेला हा परिसर आजही पल्लवीच्या मृत्यूने धगधगत आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हा धनगरवाडा नेहमीच वादावादीच्या निमित्ताने जागाच असतो. गुंडगिरीच्या दहशतीमुळे सात महिन्यांपूर्वी याच परिसरातील गीतांजली पंडित बोडके या महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली होती. त्यानंतर आता पल्लवी बोडकेचा बळी गेला. दोन्हीही घटना परिसरातील गुंडगिरीच्या टोळक्याच्या छेडछाडीला कंटाळून घडल्या आहेत. गुंड टोळक्यांकडून रोजच येथे नवनवे प्रकार घडतात. या गुंडांच्या आज पोलिसांनी मुसक्या आवळल्या असल्या तरीही त्यांच्या दहशतीखाली महिला, युवा पिढी, वयोवृद्ध आहेत.दुर्गम भागातील काही मोजकीच सात-आठ कुटुंबे गेल्या २५ ते ३० वर्षांपूर्वी रोजगार व कामाच्या शोधासाठी बोंद्रेनगर येथे आली. कामे मिळाल्याने त्यांनी येथेच ठिय्या मारला. हळूहळू वस्ती वाढत आज सुमारे हजार-बाराशेंची वसाहत झाली. पुरुष मंडळी फिरून झाडे तोडणे, हमाली करणे, मार्केट यार्डमधून कांदा-लसूण आणून दारोदारी विक्रीची कामे करतात; तर महिला धुणे-भांड्याची घरकामे करून कुटुंबाचा गाडा चालवितात. बहुतांश युवक हे सकाळी फिरून चारचाकी वाहने धुण्याची कामे करतात. त्यामुळे हे गुंड दिवसभर रिकामटेकडे राहून वसाहतीत कारनामे घडवीत असतात.मोलमजुरीच्या मागे लागत अशिक्षित राहिलेला हा समाज अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे. देवाच्या करणीसाठी श्रेष्ठ मानणाऱ्या विठ्ठलाई देवीचा पगडा या वसाहतीवर जाणवतो; त्यामुळे येथे नेहमीच चौकाचौकांत सुया खोवलेल्या लिंबंूचे दर्शन होते. या अशिक्षित, अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्यांचा गैरफायदा घेत येथे गुंडगिरी फोफावत आहे. (पूर्वार्ध)गुंडांचा पोलिसांसमोरही मुजोरपणापल्लवीचा बळी गेल्यानंतर अटकेसाठी ताब्यात घेतलेल्या संशयितांनी पोलिसांसमोरच आपला मुजोरपण दाखवून दिला. हातांत बेड्या घातलेल्या असतानाही या गुंडांनी परिसरातील युवकांनाही ‘आल्यावर बघून घेतो’ अशा उघड-उघड धमक्या दिल्या.त्यांना पोलिसही काही करू शकले नाहीत. त्यामुळे या गुंडांची परिसरात प्रचंड दहशत असल्याचे दिसून येते.‘निकिता’च्या आधारासाठी वाघमोडे यांचा हातकोल्हापूर : धनगर समाज क्रांतिकारी संघाचे संस्थापक विलासराव वाघमोडे (बापू) यांनी निकिताच्या घरातील रेशन, शिक्षणाच्या खर्चासह तिच्या आजीच्या औषधाचा खर्च उचलण्याची तयारी दाखविली आहे. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने बोडेकर कुटुंब अक्षरश: वाऱ्यावर पडले होते. घरात आजी; पण तीही आजारी असल्याने उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी वाघमोडे यांनी बोडेकर कुटुंबीयांना दरमहा ७०० रुपये मदत देण्यास सुरुवात केली. गेली नऊ वर्षे वाघमोडे ही मदत न चुकता देत आहेत. दर महिन्याला निकिताचे चुलते वाघमोडे यांच्या लक्ष्मीपुरी येथील कार्यालयातून ही रक्कम घेऊन जात असल्याने बोडेकर कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला होता.बोंद्रेनगर धनगर वसाहतीत पल्लवीच्या बळीनंतरही गुंडांची दहशत कायम असल्याने काही वयोवृद्धच घराच्या दारात बसून घडल्या प्रकाराची छुप्या आवाजात चर्चा करीत आहेत.