शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

ऑक्सिजन प्रकल्प उभारुन बिद्रीने समाजाप्रती उत्तरदायित्व जपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:20 IST

प्रकल्प भेटीवेळी गौरवोद्गार लोकमत न्यूज नेटवर्क सरवडे : कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्य सध्या कोरोनाचा मुकाबला करीत आहे. गंभीर रुग्णांना ...

प्रकल्प भेटीवेळी गौरवोद्गार

लोकमत न्यूज नेटवर्क

सरवडे : कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्य सध्या कोरोनाचा मुकाबला करीत आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत बिद्री साखर कारखान्याने ऑक्सिजन प्रकल्प उभारुन सहकाराला नवी दिशा दिली आणि सामाजिक बांधिलकीतून समाजाचे उत्तरदायित्वही जपले असे गौरवोदगार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काढले.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी टोपे शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी बिद्री साखर कारखान्याने उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व्ही. बी. पाटील होते.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, बिद्री साखर कारखाना साखर उतारा, एफआरपी देण्यात कायम आघाडीवर राहिला आहे. ज्याप्रमाणे सहवीज प्रकल्पातून उत्पन्न सुरु ठेवले त्याच पद्धतीने आता कारखान्याने इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिले पाहिजे. कोरोनाच्या दोन्ही लाटा आपण परतवून लावल्या, तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण ही कवचकुंडले आहेत. सर्व नियमांचे पालन करावे.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील म्हणाले, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कोरोना महामारीचा मुकाबला करत आहे. राज्य शासनाने मोठ्या ऑक्सिजन प्रकल्पांना अनुदान देण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे बिद्री सारख्या लहान प्रकल्पांनाही शासनाने अनुदान देण्याची भूमिका घ्यावी.

यावेळी कारखाना संचालक प्रवीणसिंह पाटील, धनाजीराव देसाई, प्रवीण भोसले, के. ना. पाटील, उमेश भोईटे, राजेंद्र पाटील , श्रीपती पाटील, युवराज वारके, एकनाथ पाटील, विकास पाटील, अशोक कांबळे, आजऱ्याचे सभापती उदय पवार, मुकुंद देसाई, आर. वाय. पाटील, भीमराव किल्लेदार, शिवाजी केसरकर, व्यवस्थापकीय संचालक आर.डी. देसाई, कार्यकारी संचालक के.एस. चौगले, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी आभार मानले.

चौकट

बिद्रीचे टाईमली काम

कोरोना महामारीत ऑक्सिजन अभावी अनेकांनी जीव गमावला, याचे गांभीर्य ओळखून शासनाने ऑक्सिजन निर्मितीला प्रोत्साहन दिले. बिद्री साखर कारखान्याने या प्रकल्पाची काटकसरीने तत्काळ उभारणी केली. ही वेळेची गरज ओळखून टाईमली काम केले आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनमुळे सर्वसामान्य रुग्णांचा जीव वाचणार आहे असे मंत्री टोपे म्हणाले.

.

फोटो : बिद्री साखर कारखान्याने उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पाहणी केली. यावेळी अध्यक्ष के. पी. पाटील, उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे आदी उपस्थित होते.