शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

नवा ‘आयटी पार्क’ करा, पण आधी स्थानिक उद्योजकांना जागा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:21 IST

कोल्हापूर : राज्य सरकारकडून कोल्हापूर जिल्ह्यात नवा आयटी पार्क होणार असेल, तर चांगले आहे. पण, आमच्यासाठी आरक्षित केलेली जागा ...

कोल्हापूर : राज्य सरकारकडून कोल्हापूर जिल्ह्यात नवा आयटी पार्क होणार असेल, तर चांगले आहे. पण, आमच्यासाठी आरक्षित केलेली जागा आधी सरकार आणि महानगरपालिकेने आम्हाला द्यावी, अशी मागणी स्थानिक आयटी उद्योजकांनी केली आहे. जागा हस्तांतरणासाठी गेल्या बारा वर्षांपासून हे उद्योजक प्रतीक्षा करीत आहेत. आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या माध्यमातून त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरात शंभर एकरमध्ये मोठा आयटी पार्क उभारण्याची घोषणा शनिवारी (दि. १३) केली. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील सध्याच्या आयटी उद्योगांची स्थिती ‘लोकमत’ने जाणून घेतली. स्वत:च्या ताकदीवर कोल्हापूरमधील आयटी उद्योग कार्यरत आहे. त्यात बीपीओ, सॉफ्टवेअर्स डेव्हलर्स, हार्डवेअर, कॉम्प्युटर्स डीलर्स आदींचा समावेश आहे. व्यवसायाची क्षमता वाढविण्यासाठी विस्तार आवश्यक असल्याने ‘आयटी असोसिएशन’च्या माध्यमातून या उद्योजकांनी आयटी पार्कच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले. त्याला महानगरपालिकेने सकारात्मक साथ देत टेंबलाईवाडीतील टिंबर मार्केट परिसरातील साडेतीन एकर जागा मंजूर केली. ‘आयटी असोसिएशन’च्या पाठपुराव्यामुळे गेल्या चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेने सव्वातीन एकर जागाही आयटी पार्कसाठी आरक्षित केली. मात्र, अजून ती जागा या असोसिएशनकडे हस्तांतरित झालेली नाही. या जागेतील ४० टक्के जागा स्थानिक उद्योजकांना देण्याचा नवा प्रस्ताव महापालिकेचा आहे. ही जागा असोसिएशनकडे हस्तांतरित केल्यास स्थानिक उद्योजकांना बळ मिळेल. रोजगारवाढीसह जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. कौशल्य असलेले मनुष्यबळ, नैसर्गिक अनुकूलता आणि बंगलोर, गोवा, हैदराबाद यांच्याशी असलेल्या दळणवळणाच्या संलग्नतेमुळे पर्यटन क्षेत्राप्रमाणेच देशातील आयटी इंडस्ट्रीजच्या वाढीसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण आहे. कोल्हापूरमध्ये अँड्रॉईड, डॉटनेट अशा सर्व तंत्रज्ञानांवर काम चालते. स्थानिक आयटी उद्योगामुळे सध्या सुमारे दहा हजारजणांना रोजगार मिळाला आहे. ते लक्षात घेऊन स्थानिक उद्योजकांना लवकर जागा मिळणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया

स्थानिक आयटी उद्योजकांना बळ देण्यासाठी नवा पार्क उभारण्यासाठी असोसिएशनचे गेल्या १२ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. जागा आरक्षित झाली. केपीएमजी या सल्लागार कंपनीने महापालिकेला अहवाल दिला आहे. त्यावर वेगाने कार्यवाही करून महापालिकेने आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी. सरकार करणार असलेल्या नव्या पार्कला आमची हरकत नाही.

- शांताराम सुर्वे, अध्यक्ष, आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर.

प्रतिक्रिया

बाहेरील कंपन्या एखाद्या शहरात जाण्यापूर्वी तेथील स्थानिक उद्योगांचा सेटअप लक्षात घेतात. त्यामुळे स्थानिक आयटी उद्योजकांना पाठबळ देणे आधी महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने महापालिका, राज्य सरकारने वेगाने पाऊले टाकावीत.

-विनय गुप्ते, स्थानिक आयटी उद्योजक