शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

नवा ‘आयटी पार्क’ करा, पण आधी स्थानिक उद्योजकांना जागा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:21 IST

कोल्हापूर : राज्य सरकारकडून कोल्हापूर जिल्ह्यात नवा आयटी पार्क होणार असेल, तर चांगले आहे. पण, आमच्यासाठी आरक्षित केलेली जागा ...

कोल्हापूर : राज्य सरकारकडून कोल्हापूर जिल्ह्यात नवा आयटी पार्क होणार असेल, तर चांगले आहे. पण, आमच्यासाठी आरक्षित केलेली जागा आधी सरकार आणि महानगरपालिकेने आम्हाला द्यावी, अशी मागणी स्थानिक आयटी उद्योजकांनी केली आहे. जागा हस्तांतरणासाठी गेल्या बारा वर्षांपासून हे उद्योजक प्रतीक्षा करीत आहेत. आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या माध्यमातून त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरात शंभर एकरमध्ये मोठा आयटी पार्क उभारण्याची घोषणा शनिवारी (दि. १३) केली. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील सध्याच्या आयटी उद्योगांची स्थिती ‘लोकमत’ने जाणून घेतली. स्वत:च्या ताकदीवर कोल्हापूरमधील आयटी उद्योग कार्यरत आहे. त्यात बीपीओ, सॉफ्टवेअर्स डेव्हलर्स, हार्डवेअर, कॉम्प्युटर्स डीलर्स आदींचा समावेश आहे. व्यवसायाची क्षमता वाढविण्यासाठी विस्तार आवश्यक असल्याने ‘आयटी असोसिएशन’च्या माध्यमातून या उद्योजकांनी आयटी पार्कच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले. त्याला महानगरपालिकेने सकारात्मक साथ देत टेंबलाईवाडीतील टिंबर मार्केट परिसरातील साडेतीन एकर जागा मंजूर केली. ‘आयटी असोसिएशन’च्या पाठपुराव्यामुळे गेल्या चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेने सव्वातीन एकर जागाही आयटी पार्कसाठी आरक्षित केली. मात्र, अजून ती जागा या असोसिएशनकडे हस्तांतरित झालेली नाही. या जागेतील ४० टक्के जागा स्थानिक उद्योजकांना देण्याचा नवा प्रस्ताव महापालिकेचा आहे. ही जागा असोसिएशनकडे हस्तांतरित केल्यास स्थानिक उद्योजकांना बळ मिळेल. रोजगारवाढीसह जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. कौशल्य असलेले मनुष्यबळ, नैसर्गिक अनुकूलता आणि बंगलोर, गोवा, हैदराबाद यांच्याशी असलेल्या दळणवळणाच्या संलग्नतेमुळे पर्यटन क्षेत्राप्रमाणेच देशातील आयटी इंडस्ट्रीजच्या वाढीसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण आहे. कोल्हापूरमध्ये अँड्रॉईड, डॉटनेट अशा सर्व तंत्रज्ञानांवर काम चालते. स्थानिक आयटी उद्योगामुळे सध्या सुमारे दहा हजारजणांना रोजगार मिळाला आहे. ते लक्षात घेऊन स्थानिक उद्योजकांना लवकर जागा मिळणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया

स्थानिक आयटी उद्योजकांना बळ देण्यासाठी नवा पार्क उभारण्यासाठी असोसिएशनचे गेल्या १२ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. जागा आरक्षित झाली. केपीएमजी या सल्लागार कंपनीने महापालिकेला अहवाल दिला आहे. त्यावर वेगाने कार्यवाही करून महापालिकेने आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी. सरकार करणार असलेल्या नव्या पार्कला आमची हरकत नाही.

- शांताराम सुर्वे, अध्यक्ष, आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर.

प्रतिक्रिया

बाहेरील कंपन्या एखाद्या शहरात जाण्यापूर्वी तेथील स्थानिक उद्योगांचा सेटअप लक्षात घेतात. त्यामुळे स्थानिक आयटी उद्योजकांना पाठबळ देणे आधी महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने महापालिका, राज्य सरकारने वेगाने पाऊले टाकावीत.

-विनय गुप्ते, स्थानिक आयटी उद्योजक