शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय शिंदे यांचे निधन

By admin | Updated: September 12, 2015 00:50 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीजी यांच्याबरोबर दत्तात्रय शिंदे यांचा लढ्यात सहभाग

कोल्हापूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते दत्तात्रय ऊर्फ दत्ता अनंत शिंदे (वय ९६) यांचे शुक्रवारी सकाळी गोवा येथे वृद्धापकाळाने निधन झाले. सायंकाळी त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी माणिक, मुलगे प्रकाश, किरण, मुलगी सरिता चव्हाण व सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शिंदे हे गेल्या महिन्याभरापासून मुलगी सरिता अजित चव्हाण यांच्याकडे गोवा येथे राहत होते. तेथेच शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांचे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव सायंकाळी येथील टाकाळ्यातील ताराराणी विद्यापीठाशेजारील निवासस्थानी आणण्यात आले. या ठिकाणी त्यांच्या कुटुंबीयांसह मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने नायब तहसीलदार अनंत गुरव यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.शिंदे यांचा जन्म रविवार पेठेत झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीजींच्या बरोबर लढ्यात सहभाग घेतला. स्वातंत्र्याच्या विविध आंदोलनांत सहभाग घेऊन ब्रिटिशांविरोधात रान उठविले. त्यांना १९४३ ते १९४६ या कालावधीत ३ वर्षे ६ महिने तुुरुंगवास भोगावा लागला. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र सत्याग्रहाच्या पहिल्या तुकडीचे त्यांनी नेतृत्व केले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण करून विक्रम हायस्कूल येथे शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. या ठिकाणी ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. ते कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा शासनासह विविध संस्था व संघटनांकडून अनेक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. त्यांनी सामाजिक, राजकीय, कामगार क्षेत्रात भरीव काम केले आहे. कुष्ठरोग निवारण, रॉकेलवाल्यांसाठी संघ स्थापन, महापालिका कामगारांची संघटना अशा ठळक बाबींचा यामध्ये समावेश आहे. शिवाजी विद्यापीठाने त्यांना विशेष पेन्शन सुरू केली होती; परंतु ती नाकारून त्यांनी त्याबदल्यात गांधी अध्यासन सुरू करण्याची विनंती केली. त्यांच्यामुळे आताचे अध्यासन सुरू झाले. या माध्यमातून त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत गांधी विचारांच्या प्रसाराचे कार्य केले. महात्मा गांधी, विनोबा भावे, हरिभाऊ लिमये, जयप्रकाश नारायण, नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, चंद्रकांत पाटगांवकर, जयवंत मटकर, आदी थोर व्यक्तींचा त्यांना सहवास लाभला. (प्रतिनिधी)स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधीजी यांच्याबरोबर दत्तात्रय शिंदे यांचा लढ्यात सहभागशिंदे यांना १९४३ ते १९४६ दरम्यान ३ वर्षे ६ महिने तुरुंगवास भोगावा लागला.संयुक्त महाराष्ट्र सत्याग्रहाच्या पहिल्या तुकडीचे त्यांनी नेतृत्व केले