शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बहिष्काराचा अहवाल तातडीने पाठवा

By admin | Updated: June 11, 2015 00:20 IST

तहसीलदारांचे आदेश : कसबा सांगाव येथील प्रकरणाचा तपास दोन दिवसांत करणार

कागल : कसबा सांगाव (ता. कागल) येथील धनगर समाजअंतर्गत सात कुटुंबीयांवर टाकण्यात आलेल्या सामाजिक बहिष्काराची चौकशी करून तसा अहवाल तत्काळ पाठविण्याचे आदेश तहसीलदार शांताराम सांगडे यांनी कागलचे पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ यांना दिले आहेत. दरम्यान, मंडल अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या वृत्ताने गावात खळबळ उडाली. विविध संघटनांनी या प्रकरणी विचारपूस केली आणि माहिती घेतली. मल्हार सेनेचे अध्यक्ष बबन रानगे यांनी असा काही प्रकार होत असेल तर तो चुकीचा आहे; मात्र दोन्ही बाजंूच्या लोकांना एकत्र घेऊन लवकरच वाद मिटविला जाईल, असे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.कसबा सांगावमधील सात कुटुंबांनी आपल्यावर समाजाअंतर्गत बहिष्कार टाकल्याची तक्रार तहसीलदारांकडे तसेच माध्यमांकडे केली होती. तहसीलदारांनीही याची दखल घेतली नाही, असा आरोप केला होता. याबाबत तहसीलदार शांताराम सांगडे म्हणाले की, हे लोक माझ्याकडे आले होते. त्यांनी तत्काळ कारवाई करा अशी मागणी केली. मात्र, मला आधी माहिती घेऊ द्या, नंतर योग्य ती कारवाई करतो, असे सांगितले आहे. सामाजिक बहिष्कारासारखा प्रकार चुकीचा असून, पोलिसांच्या वतीने तसेच मंडळ अधिकाऱ्यांमार्फत येत्या दोन दिवसांत चौकशी करून निश्चितपणे कारवाई केली जाईल. तसेच प्रशासन पातळीवर हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जाईल. बुधवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बहिष्कार टाकण्यात आलेल्या कुटुंबीयांची बैठक होऊन, आम्ही या बहिष्काराचे पुरावे कधीही सादर करू शकतो, असे स्पष्ट केले. तर ज्यांच्यावर आरोप झाले आहेत, त्यांनीही समाजाच्या व्यापक बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीनंतर पुढील निर्णय घेऊ, असेही स्पष्ट केले. मल्हार सेनेचे अध्यक्ष बबन रानगे यांनी या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली. ते म्हणाले की, मी दोन्ही बाजूंच्या लोकांशी संपर्क साधला आहे. दोन्ही बाजूंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. समाजातील एकोपा कायम ठेवण्यासाठी लवकरच बैठक घेऊन हा वाद मिटविला जाईल. कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. (प्रतिनिधी)