शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

स्वाभिमानीचा ‘शिरोळ’मध्ये विरोधकांना शह

By admin | Updated: April 5, 2017 00:46 IST

जिल्हा परिषदेत सलग दुसऱ्यांदा सत्तेचे पद : पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीतील राजकारणाची परतफेड

संदीप बावचे -- जयसिंगपूर -पद वाटपाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत मित्र पक्षांना संधी देवून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले असतानाच केवळ दोन जि.प. सदस्यांच्या बळावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सलग दुसऱ्यांदा सत्तेचे पद मिळविले. शिरोळ पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीत दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला घेऊन राजकीय खेळी केली होती. जि.प.चे महिला बालकल्याण सभापतीचे पद घेऊन स्वाभिमानीने दोन्ही काँग्रेस, शिवसेनेसह शिरोळमधील भाजपला शह दिला आहे.शिरोळ तालुक्याच्या राजकीय कुरुक्षेत्रात नेत्यांनी सोयीचे राजकारण सुरु केल्याचे चित्र आहे. शिरोळ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेवून सत्ता स्थापन केली होती. या निवडीत आमदार उल्हास पाटील यांनी भाजप व स्वाभिमानीला रोखून एका दगडात दोन पक्षी मारले होते. दोन्ही काँग्रेसने केलेल्या या खेळीचा डाव स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी काढला होता. थेट भाजपला पाुठिंबा देत स्वाभिमानी सत्तेत सहभागी झाली होती. शिरोळ पंचायत सभापती, उपसभापती निवडीत दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन केल्यामुळे स्वाभिमानीने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत ही भूमिका घेतली होती.दरम्यान, जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महिला बालकल्याण सभापतिपद देण्यात आले. दानोळीच्या जिल्हा परिषद सदस्य शुभांगी शिंदे यांच्या निवडीतून स्वाभिमानीला सलग दुसऱ्यांदा सत्तेचे पद मिळाले. सत्तेचे हे पद मिळवून स्वाभिमानीने शिरोळ तालुक्यातील आगामी राजकारणाचा डाव साधला असला तरी सध्या खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भाजपविरोधी धोरण अवलंबले आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीपर्यंत राजकारण कसे रंगते, यावरच स्वाभिमानीचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. जिल्हा परिषदेत मिळालेल्या सत्तेच्या पदाचे मार्केटिंग स्वाभिमानी कशी करते, याकडे लक्ष लागून राहिले आहे. स्वाभिमानीच ‘बाहुबली’१ जि.प. व पं.स.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राजकीय भूकंप घडवून काँगे्रेस व राष्ट्रवादीमधील मातब्बर नेत्यांना भाजपमध्ये ओढले होते. २ शिरोळ तालुक्यात भाजपने केलेल्या या राजकीय खेळीमुळे स्वाभिमानी नाराज होती. त्यामुळेच जि.प., पं.स.निवडणुकीत स्वबळावर स्वाभिमानी लढल्याचे चित्र होते. या निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार जिल्हा परिषदेवर शिरोळमधून निवडून आले. ३ जि.प.च्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत स्वाभिमानीने भाजपला मदत केली. त्यामुळे विषय समितींच्या निवडीत स्वाभिमानीने सत्तेचे पद मिळवून दोन्ही काँग्रेस, शिवसेना व भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. यांनी भूषविली पदेजिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून शिरोळचे स्व.दिनकरराव यादव यांना संधी मिळाली होती. त्यांच्यानंतर हसूरचे ए.बी.पाटील यांना जि.प.चे उपाध्यक्षपद मिळाले होते. नांदणीच्या नंदा पोळ तर उदगावच्या यशोदा कोळी यांनी जि.प.चे अध्यक्षपद भूषविले होते. दत्तवाडचे बंडा माने यांनीही उपाध्यक्षपद भूषविले असून समाजकल्याण सभापती म्हणून तेरवाडचे विलास कांबळे यांना संधी मिळाली होती. उदगावचे सावकार मादनाईक, तर टाकळीच्या सीमा पाटील यांनाही जि.प.चे बांधकाम सभापतिपद मिळाले होते. त्यांच्यानंतर आता दानोळीच्या शुभांगी शिंदे महिला बालकल्याण सभापतिपदी विराजमान झाल्या आहेत. यांनी भूषविली पदेजिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून शिरोळचे स्व.दिनकरराव यादव यांना संधी मिळाली होती. त्यांच्यानंतर हसूरचे ए.बी.पाटील यांना जि.प.चे उपाध्यक्षपद मिळाले होते. नांदणीच्या नंदा पोळ तर उदगावच्या यशोदा कोळी यांनी जि.प.चे अध्यक्षपद भूषविले होते. दत्तवाडचे बंडा माने यांनीही उपाध्यक्षपद भूषविले असून समाजकल्याण सभापती म्हणून तेरवाडचे विलास कांबळे यांना संधी मिळाली होती. उदगावचे सावकार मादनाईक, तर टाकळीच्या सीमा पाटील यांनाही जि.प.चे बांधकाम सभापतिपद मिळाले होते. त्यांच्यानंतर आता दानोळीच्या शुभांगी शिंदे महिला बालकल्याण सभापतिपदी विराजमान झाल्या आहेत.