शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

धर्मनिरपेक्षता ही माणुसकी, नीती ठरावी

By admin | Updated: December 2, 2015 01:07 IST

सुरेश द्वादशीवार यांचे प्रतिपादन : गांधींचा खून हा पराभूत मनोवृत्तीतून : भालचंद्र कांगो अविनाश पानसरे व्याख्यानमाला

कोल्हापूर : धर्म आणि नीती यांची गल्लत झाली तर, सामाजिक संघर्ष होतो. सध्या देशात अशीच स्थिती दिसत आहे. ती बदलण्यासाठी धर्मनिरपेक्षता ही माणुसकी, नीती ठरली पाहिजे, असे प्रतिपादन ‘लोकमत’ नागपूरचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी मंगळवारी येथे केले.येथील श्रमिक प्रतिष्ठानतर्फे ‘लोकशाहीला धर्मांधतेचे आव्हान’ या विषयावरील आयोजित कॉम्रेड अविनाश पानसरे व्याख्यानमालेतील पहिले पुष्प संपादक द्वादशीवार यांनी गुुंफले. त्यांचा विषय ‘सेक्युलर’ असा होता. राजर्षी शाहू स्मारक भवनमधील या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो होते.द्वादशीवार म्हणाले, घटनेच्या उद्देशपत्रिकेतील धर्मनिरपेक्षतेला ‘आजार’ म्हणण्याचे धाडस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी केले आहे. त्यावर संसदेत देशातील एकाही खासदाराने सरकारला सुनावले नाही, ही दहशतच आहे. घटना, कायद्यानुसारच्या आणीबाणीद्वारे इंदिरा गांधी यांनी आम्हाला तुरुंगात टाकले पण, त्यांनी आम्हाला मारले नाही. सध्याची आणीबाणी ही धर्मांधांच्या टोळ्यांनी आणली आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे नीतिधर्म. धर्मात नीती आहे पण, सर्व धर्म नीतीवर आधारित नसतात. नीती हे सर्व धर्माला चालणारे मूल्य आहे. मात्र, आपले दुर्दैव म्हणजे धर्माच्या नीतीची दुसरी बाजू घेऊन टोळ्या उभारल्या आहेत. धर्म आणि नीती यांची गल्लत झाल्यास सामाजिक संघर्ष होतो शिवाय धर्म आणि राजकारण या गोष्टी एकत्र आल्यास ते हिंसक होते. त्यात धर्मातील कडवे हे उदारमतवादींना मारतात. अशाच पद्धतीने पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी यांची हत्या झाली. हे रोखण्यासाठी धर्मनिरपेक्षता आवश्यक आहे. देशात धर्मनिरपेक्षता ही जात सोडून दिली तरच होणार आहे. डॉ. कांगो म्हणाले, महात्मा गांधींची हत्या ही पराभूत मनोवृतीतून तर, पानसरे, दाभोलकर आणि कलबुर्गी यांची हत्या विजयाच्या उन्मादातून झाला आहे. ही पराभूत मनोवृती विजयाच्या उन्मादाकडे कुणी, कशी नेली याचे उत्तर घेतल्याशिवाय आज धर्मनिरपेक्षता व लोकशाही धोक्यात का? आहे याचे उत्तर मिळणार नाही; पण, याचे उत्तर अपघाताने का होईना नव्या सरकारने २६ जानेवारीनिमित्तच्या जाहिरातींतून ‘धर्मनिरपेक्षतता’ हा शब्द वगळून दिले. प्रारंभी ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रा. विलास रणसुभे यांनी प्रतिष्ठानची माहिती दिली. पानसरे, दाभोलकर हे अभिमानबिंदूनरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांची हत्या झाल्यानंतर मी दु:खी आणि अस्वस्थ झालो; पण, काही दिवसांनंतर मी पूर्ववत झालो. ज्या मूल्यांसाठी आयुष्य वेचले त्यांच्या रूजवणुकीच्या कार्यात पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी हे शहीद झाले. ही माणसे अभिमान बिंदू झाली पाहिजेत. त्यातून माणुसकीचे राज्य निर्माण होईल, असे द्वादशीवार यांनी सांगितले.गोळीने माणूस मरतो;विचार नाही...व्याख्यानमालेत व्यासपीठाद्वारे एक सामाजिक संदेश, वास्तवाचे दर्शन घडविले जाते. यावेळी नथुरामाने गोळी घातली आणि मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस मेला. महात्मा गांधी नव्हे. कारण महात्मा गांधी हा एक विचार आहे. गोळीने माणूस मरतो; विचार नाही, असा संदेश हा जगभरातील काही दहशतवादी हल्ल्यांची छायाचित्रे, ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या छायाचित्रांद्वारे दिला आहे.आजचे व्याख्यान : वक्ते : राजकीय विश्लेषक किशोर बेडकीहाळ. विषय : सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि लोकशाही. वेळ : सायंकाळी सहा वाजता. स्थळ : राजर्षी शाहू स्मारक भवन.