शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

धर्मनिरपेक्षता ही माणुसकी, नीती ठरावी

By admin | Updated: December 2, 2015 01:07 IST

सुरेश द्वादशीवार यांचे प्रतिपादन : गांधींचा खून हा पराभूत मनोवृत्तीतून : भालचंद्र कांगो अविनाश पानसरे व्याख्यानमाला

कोल्हापूर : धर्म आणि नीती यांची गल्लत झाली तर, सामाजिक संघर्ष होतो. सध्या देशात अशीच स्थिती दिसत आहे. ती बदलण्यासाठी धर्मनिरपेक्षता ही माणुसकी, नीती ठरली पाहिजे, असे प्रतिपादन ‘लोकमत’ नागपूरचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी मंगळवारी येथे केले.येथील श्रमिक प्रतिष्ठानतर्फे ‘लोकशाहीला धर्मांधतेचे आव्हान’ या विषयावरील आयोजित कॉम्रेड अविनाश पानसरे व्याख्यानमालेतील पहिले पुष्प संपादक द्वादशीवार यांनी गुुंफले. त्यांचा विषय ‘सेक्युलर’ असा होता. राजर्षी शाहू स्मारक भवनमधील या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो होते.द्वादशीवार म्हणाले, घटनेच्या उद्देशपत्रिकेतील धर्मनिरपेक्षतेला ‘आजार’ म्हणण्याचे धाडस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी केले आहे. त्यावर संसदेत देशातील एकाही खासदाराने सरकारला सुनावले नाही, ही दहशतच आहे. घटना, कायद्यानुसारच्या आणीबाणीद्वारे इंदिरा गांधी यांनी आम्हाला तुरुंगात टाकले पण, त्यांनी आम्हाला मारले नाही. सध्याची आणीबाणी ही धर्मांधांच्या टोळ्यांनी आणली आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे नीतिधर्म. धर्मात नीती आहे पण, सर्व धर्म नीतीवर आधारित नसतात. नीती हे सर्व धर्माला चालणारे मूल्य आहे. मात्र, आपले दुर्दैव म्हणजे धर्माच्या नीतीची दुसरी बाजू घेऊन टोळ्या उभारल्या आहेत. धर्म आणि नीती यांची गल्लत झाल्यास सामाजिक संघर्ष होतो शिवाय धर्म आणि राजकारण या गोष्टी एकत्र आल्यास ते हिंसक होते. त्यात धर्मातील कडवे हे उदारमतवादींना मारतात. अशाच पद्धतीने पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी यांची हत्या झाली. हे रोखण्यासाठी धर्मनिरपेक्षता आवश्यक आहे. देशात धर्मनिरपेक्षता ही जात सोडून दिली तरच होणार आहे. डॉ. कांगो म्हणाले, महात्मा गांधींची हत्या ही पराभूत मनोवृतीतून तर, पानसरे, दाभोलकर आणि कलबुर्गी यांची हत्या विजयाच्या उन्मादातून झाला आहे. ही पराभूत मनोवृती विजयाच्या उन्मादाकडे कुणी, कशी नेली याचे उत्तर घेतल्याशिवाय आज धर्मनिरपेक्षता व लोकशाही धोक्यात का? आहे याचे उत्तर मिळणार नाही; पण, याचे उत्तर अपघाताने का होईना नव्या सरकारने २६ जानेवारीनिमित्तच्या जाहिरातींतून ‘धर्मनिरपेक्षतता’ हा शब्द वगळून दिले. प्रारंभी ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रा. विलास रणसुभे यांनी प्रतिष्ठानची माहिती दिली. पानसरे, दाभोलकर हे अभिमानबिंदूनरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांची हत्या झाल्यानंतर मी दु:खी आणि अस्वस्थ झालो; पण, काही दिवसांनंतर मी पूर्ववत झालो. ज्या मूल्यांसाठी आयुष्य वेचले त्यांच्या रूजवणुकीच्या कार्यात पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी हे शहीद झाले. ही माणसे अभिमान बिंदू झाली पाहिजेत. त्यातून माणुसकीचे राज्य निर्माण होईल, असे द्वादशीवार यांनी सांगितले.गोळीने माणूस मरतो;विचार नाही...व्याख्यानमालेत व्यासपीठाद्वारे एक सामाजिक संदेश, वास्तवाचे दर्शन घडविले जाते. यावेळी नथुरामाने गोळी घातली आणि मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस मेला. महात्मा गांधी नव्हे. कारण महात्मा गांधी हा एक विचार आहे. गोळीने माणूस मरतो; विचार नाही, असा संदेश हा जगभरातील काही दहशतवादी हल्ल्यांची छायाचित्रे, ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या छायाचित्रांद्वारे दिला आहे.आजचे व्याख्यान : वक्ते : राजकीय विश्लेषक किशोर बेडकीहाळ. विषय : सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि लोकशाही. वेळ : सायंकाळी सहा वाजता. स्थळ : राजर्षी शाहू स्मारक भवन.