शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

सचिव शासनाच्या दारात, तर शेतकरी वाऱ्यावर

By admin | Updated: July 16, 2014 23:45 IST

गेले ४१ दिवस गटसचिवांचे कामबंद आंदोलन : ५०० कोटींचे आर्थिक व्यवहार ठप्प

प्रकाश पाटील- कोपार्डे‘समान काम समान दाम’ या मागणीबरोबर संस्थांच्या व्यवस्थापन खर्चासाठी तीन टक्के सानुग्रह अनुदान शासनाने द्यावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील गटसचिवांनी लेखणीबंद आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने सेवा संस्थाद्वारे कृषी कर्जवाटपाचे होणारे ५०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. गेले ४१ दिवस मागण्यांसाठी गटसचिव शासनाच्या दारात डोळे लावून आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पैशांची उपलब्धता होत नसल्याने शेतकरी मात्र वाऱ्यावर सोडला गेला आहे.कृषी कर्जवाटपाची पद्धत त्रिस्तरीय आहे. प्रथम जिल्हा बँक त्यानंतर सेवा संस्था व त्यानंतर शेतकरी असे कृषी कर्जाच्या वाटपाची पद्धत आहे. सध्या एकरी ३४ हजार कृषी कर्ज मर्यादा आहे. शासनाने शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज व्याजमुक्त, तर तीन लाखांवर दोन टक्के व्याज शेतकऱ्याने मुदतीत कर्ज फेडल्यास आकारले जाते. बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक असल्याने त्यांना तीन लाखांच्या आतच रक्कम मिळत असून, ती बिनव्याजी असल्याने सेवा संस्था अडचणीत आल्या आहेत. तीन लाखांवरील कर्जाला दोन टक्के व्याज आकारले जाते. यातून सेवा संस्थांना कोणतीच मिळकत नाही.पूर्वी जिल्हा बँका संस्थांना १२ टक्के व्याज दराने पैसे देत होती. त्यातील तीन टक्के सेवा संस्थांना मार्जिन म्हणून व्याज परतावा करत होती. वैद्यनाथन समितीने ही पद्धतच बंद करून ज्या त्या संस्थेने आपला व्यवस्थापन खर्च उभारावा अशी शिफारस केल्याने संस्था गोत्यात आल्या आहेत. गटसचिवांची लेखणी बंद जिल्ह्यात १७२० सेवा संस्था कार्यरत असून, १३०० गटसचिवांनी आंदोलनात भाग घेतला असून, सेवा संस्थांचे काम ठप्प झाले आहे. खरिपासाठी बी-बियाणे, खते खरेदी व इतर आर्थिक व्यवहार होत नाहीत. तसेच शासनाच्या पीक कर्जाच्या वसुलीची मुदत ३० जूनपर्यंत होती. याला मुदतवाढ न दिल्यास मुदतीत कर्ज न फेडल्याने ६ टक्के व्याज परताव्याला शेतकरी मुकणार आहे.