शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

सचिव शासनाच्या दारात, तर शेतकरी वाऱ्यावर

By admin | Updated: July 16, 2014 23:45 IST

गेले ४१ दिवस गटसचिवांचे कामबंद आंदोलन : ५०० कोटींचे आर्थिक व्यवहार ठप्प

प्रकाश पाटील- कोपार्डे‘समान काम समान दाम’ या मागणीबरोबर संस्थांच्या व्यवस्थापन खर्चासाठी तीन टक्के सानुग्रह अनुदान शासनाने द्यावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील गटसचिवांनी लेखणीबंद आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने सेवा संस्थाद्वारे कृषी कर्जवाटपाचे होणारे ५०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. गेले ४१ दिवस मागण्यांसाठी गटसचिव शासनाच्या दारात डोळे लावून आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पैशांची उपलब्धता होत नसल्याने शेतकरी मात्र वाऱ्यावर सोडला गेला आहे.कृषी कर्जवाटपाची पद्धत त्रिस्तरीय आहे. प्रथम जिल्हा बँक त्यानंतर सेवा संस्था व त्यानंतर शेतकरी असे कृषी कर्जाच्या वाटपाची पद्धत आहे. सध्या एकरी ३४ हजार कृषी कर्ज मर्यादा आहे. शासनाने शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज व्याजमुक्त, तर तीन लाखांवर दोन टक्के व्याज शेतकऱ्याने मुदतीत कर्ज फेडल्यास आकारले जाते. बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक असल्याने त्यांना तीन लाखांच्या आतच रक्कम मिळत असून, ती बिनव्याजी असल्याने सेवा संस्था अडचणीत आल्या आहेत. तीन लाखांवरील कर्जाला दोन टक्के व्याज आकारले जाते. यातून सेवा संस्थांना कोणतीच मिळकत नाही.पूर्वी जिल्हा बँका संस्थांना १२ टक्के व्याज दराने पैसे देत होती. त्यातील तीन टक्के सेवा संस्थांना मार्जिन म्हणून व्याज परतावा करत होती. वैद्यनाथन समितीने ही पद्धतच बंद करून ज्या त्या संस्थेने आपला व्यवस्थापन खर्च उभारावा अशी शिफारस केल्याने संस्था गोत्यात आल्या आहेत. गटसचिवांची लेखणी बंद जिल्ह्यात १७२० सेवा संस्था कार्यरत असून, १३०० गटसचिवांनी आंदोलनात भाग घेतला असून, सेवा संस्थांचे काम ठप्प झाले आहे. खरिपासाठी बी-बियाणे, खते खरेदी व इतर आर्थिक व्यवहार होत नाहीत. तसेच शासनाच्या पीक कर्जाच्या वसुलीची मुदत ३० जूनपर्यंत होती. याला मुदतवाढ न दिल्यास मुदतीत कर्ज न फेडल्याने ६ टक्के व्याज परताव्याला शेतकरी मुकणार आहे.