शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

निर्यात अनुदानाला कात्री; साखरेची किमान किंमत अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारने बुधवारी साखरेचा निर्यात कोटा निश्चित करून त्याला अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्र सरकारने बुधवारी साखरेचा निर्यात कोटा निश्चित करून त्याला अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र गतवर्षीपेक्षा निर्यात अनुदानाला कात्री लावली असून, प्रतिकिलो सहा रुपये अनुदान मिळणार आहे. निर्यातीचा निर्णय घेतला असला तरी साखर कारखान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला साखरेच्या किमान किमतीचा निर्णय मात्र अधांतरीच राहिला आहे.

गेली दोन वर्षे साखर उद्योग विविध अडचणींतून जात आहे. उसाची वाढलेली एफआरपी आणि बाजारातील साखरेच्या दरामुळे कारखान्यांचे अर्थकारण बिघडले आहे. केंद्र सरकारने मागील गळीत हंगामात साखर निर्यातीचे धोरण घेतले होते. त्यासाठी कारखान्यांना टनाला एक हजार ४४८ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील बहुतांश कारखान्यांनी आपला कोटा पूर्ण केला. यंदा हंगाम सुरू होण्यापूर्वीच निर्यातीबाबत निर्णय घ्यावा, अशी साखर कारखानदारांची मागणी होती. दोन महिने उशिरा का होईना, केंद्र सरकारने निर्यातीबाबतचा निर्णय घेतला. मात्र निर्यात अनुदानात मोठ्या प्रमाणात कपात केली. गतवर्षी प्रतिकिलो १० रुपये ४५ पैसे अनुदान होते; मात्र यंदा सहा रुपये दिले जाणार आहे. कमी का असेना, अनुदान देऊन सरकारने साखर उद्योगाला दिलासा दिला. मात्र साखरेच्या किमान दराबाबत निर्णय अपेक्षित होता. याबाबत केंद्राने अपेक्षाभंग केल्याची कारखानदारांची भावना आहे.

कोल्हापूर विभागाला सहा लाख टनांचा कोटा

देशातील कारखान्यांना ६० लाख टन निर्यात कोटा दिला आहे. राज्यात होणारे उसाचे गाळप पाहता, राज्याच्या वाट्याला २० लाख टन कोटा येऊ शकतो. त्यातील सहा लाख टन कोटा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांच्या वाटणीला येऊ शकतो.

बँकांचा कारखान्यांच्या मागे तगादा

निर्यात अनुदानावर अनेक कारखान्यांनी बँकांकडून कर्ज उचल केली आहे. मात्र गेली दोन वर्षे हे अनुदान मिळालेले नाही. त्यातच बफर स्टॉकची रक्कमही न मिळाल्याने बँकांकडून घेतलेली उचल परत गेलेली नाही. त्यामुळे बँकांनी वसुलीसाठी तगादा लावला आहे.

कोट-

केंद्राने दोन महिने उशिरा का असेना, मात्र निर्यातीचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे; परंतु साखरेच्या किमान किमतीचा निर्णय अपेक्षित होते. आता टनाला ६०० रुपये कमी पडतात. किमान दराचा निर्णय घेतला नाही तर शेवटच्या दोन महिन्यांतील गाळप झालेल्या उसाला पैसे देणे मुश्कील आहे.

- पी. जी. मेढे (साखर उद्योगातील तज्ज्ञ)

- राजाराम लोंढे