शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

पाचवी ते सातवीतील पुस्तकांचा तुटवडा

By admin | Updated: July 27, 2016 00:38 IST

शिक्षकांसह विद्यार्थ्यांची गोची : शाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी पुरवठा नाहीच

प्रकाश पाटील --कोपार्डे --मोफत व सक्तीचा शिक्षण कायदा २0१0 ने आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पुस्तके देण्यात येतील, अशी घोषणा शिक्षकमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. मात्र, शाळा सुरू होऊन सव्वा महिना झाला, तरी पाचवी ते सातवीच्या वर्गांतील हिंदी विषयासह अन्य काही पुस्तकेच उपलब्ध झालेली नाहीत. यामुळे शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांसमोर पुस्तकाविना अभ्यास करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला स्थान दिले गेले आहे. मराठी, इंग्रजी व हिंदी या तीन भाषांना अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, नेमके राष्ट्रभाषा असलेल्या हिंदी विषयालाच दुय्यम स्थान खुद्द शासनाकडून दिले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून नवीन चकचकीत पाठ्यपुस्तके देण्याचा उपक्रम आघाडी सरकारने सुरू केला. तोच उपक्रम भाजप-सेना युती शासनानेही सुरू ठेवला आहे. राज्यात सर्व शाळांमध्ये शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी आठवी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जातील, अशी घोषणा खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. यासाठी आपल्या शाळेत असणाऱ्या संभाव्य पटसंख्येची माहिती वेळेत देण्याच्या सूचनाही शाळांना देण्यात आल्या होत्या.या सूचनेप्रमाणे शाळांनी आपल्याकडे असणाऱ्या विद्यार्थ्यांची संभाव्य पटसंख्या वर्गवार एप्रिल महिन्यातच सादर केली आहे. तरीही शिक्षण विभागाला या विद्यार्थी संख्येचा मेळ घालता आलेला दिसत नाही. बहुतांश शाळांमध्ये पटसंख्येपेक्षा कमी पाठ्यपुस्तके आली आहेत, तर काही पुस्तके उपलब्धच झालेली नाहीत. एक महिना शाळा सुरू होऊन झाला तरी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषयाचे पुस्तकच मिळालेले नाही. सहावीच्या सेमी इंग्रजी विभागाचे सायन्सचे पुस्तकही विद्यार्थ्यांना अद्याप मिळालेले नाही.पाचवीच्या ‘परिसर अभ्यास’ या विषयाची पुस्तकेही मागणीच्या ५0 टक्केच उपलब्ध झाली आहेत, तर सहावीच्या वर्गासाठी हीच अवस्था झाली आहे. सर्व विषयांच्या पुस्तकांबाबत अशी अवस्था झाली आहे. सातवीच्या वर्गासाठी इंग्रजी, गणित, इतिहास, नागरिकशास्त्र या पुस्तकांचीही पूर्ण पटसंख्येप्रमाणे उपलब्धता नाही. दरवर्षी स्वाध्याय पुस्तिका मिळत होती, ती यावर्षी मिळालेलीच नाही. वास्तविक १५ जूनला शाळा सुरू झाली असताना, जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही पुस्तके उपलब्ध व्हायला हवी होती; पण तसे न झाल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांची गोची झाली आहे. सहावीचा अभ्यासक्रम बदललायावर्षी सहावीचा अभ्यासक्रम बदलला असून, आता मागील वर्षाची पुस्तके वापरणेही कठीण झाले आहे. काही शाळांनी शाळा सुरू होताच पाचवी व सातवीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांकडून ही पुस्तके गोळा करून काम चालविले असले, तरी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत.दरवर्षी पुस्तके वेळेवर देण्याचा उपक्रम राबविला जायचा. यामुळे अभ्यासक्रम वेळेत सुरू व्हायचे. मात्र, यावर्षी काही पुस्तके मुलांना न मिळाल्याने मुले शिक्षकांना भंडावून सोडत आहेत. बाजारातून खरेदी करावीत आणि शासनाने दिल्यास पालकांना त्याचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. तसेच यावर शिक्षकही पुस्तके कधी मिळणार, हे सांगायला तयार नाहीत. त्यामुळे या विभागाचा भोंगळ कारभारच पाहायला मिळत आहे.- कृष्णात कुंभार, पालक, खुपिरे, ता. करवीर