शहरं
Join us  
Trending Stories
1
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
4
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
5
'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...
6
रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट
7
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले
8
GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या
9
अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी
10
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
11
अभिनेत्रीच्या जुळ्या मुली अन् आईवडील हिमाचलमध्ये अडकले; म्हणाली, "चार दिवसांपासून..."
12
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
13
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
14
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
15
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
16
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
17
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
18
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
19
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
20
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?

पाचवी ते सातवीतील पुस्तकांचा तुटवडा

By admin | Updated: July 27, 2016 00:38 IST

शिक्षकांसह विद्यार्थ्यांची गोची : शाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी पुरवठा नाहीच

प्रकाश पाटील --कोपार्डे --मोफत व सक्तीचा शिक्षण कायदा २0१0 ने आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पुस्तके देण्यात येतील, अशी घोषणा शिक्षकमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. मात्र, शाळा सुरू होऊन सव्वा महिना झाला, तरी पाचवी ते सातवीच्या वर्गांतील हिंदी विषयासह अन्य काही पुस्तकेच उपलब्ध झालेली नाहीत. यामुळे शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांसमोर पुस्तकाविना अभ्यास करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला स्थान दिले गेले आहे. मराठी, इंग्रजी व हिंदी या तीन भाषांना अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, नेमके राष्ट्रभाषा असलेल्या हिंदी विषयालाच दुय्यम स्थान खुद्द शासनाकडून दिले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून नवीन चकचकीत पाठ्यपुस्तके देण्याचा उपक्रम आघाडी सरकारने सुरू केला. तोच उपक्रम भाजप-सेना युती शासनानेही सुरू ठेवला आहे. राज्यात सर्व शाळांमध्ये शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी आठवी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जातील, अशी घोषणा खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. यासाठी आपल्या शाळेत असणाऱ्या संभाव्य पटसंख्येची माहिती वेळेत देण्याच्या सूचनाही शाळांना देण्यात आल्या होत्या.या सूचनेप्रमाणे शाळांनी आपल्याकडे असणाऱ्या विद्यार्थ्यांची संभाव्य पटसंख्या वर्गवार एप्रिल महिन्यातच सादर केली आहे. तरीही शिक्षण विभागाला या विद्यार्थी संख्येचा मेळ घालता आलेला दिसत नाही. बहुतांश शाळांमध्ये पटसंख्येपेक्षा कमी पाठ्यपुस्तके आली आहेत, तर काही पुस्तके उपलब्धच झालेली नाहीत. एक महिना शाळा सुरू होऊन झाला तरी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषयाचे पुस्तकच मिळालेले नाही. सहावीच्या सेमी इंग्रजी विभागाचे सायन्सचे पुस्तकही विद्यार्थ्यांना अद्याप मिळालेले नाही.पाचवीच्या ‘परिसर अभ्यास’ या विषयाची पुस्तकेही मागणीच्या ५0 टक्केच उपलब्ध झाली आहेत, तर सहावीच्या वर्गासाठी हीच अवस्था झाली आहे. सर्व विषयांच्या पुस्तकांबाबत अशी अवस्था झाली आहे. सातवीच्या वर्गासाठी इंग्रजी, गणित, इतिहास, नागरिकशास्त्र या पुस्तकांचीही पूर्ण पटसंख्येप्रमाणे उपलब्धता नाही. दरवर्षी स्वाध्याय पुस्तिका मिळत होती, ती यावर्षी मिळालेलीच नाही. वास्तविक १५ जूनला शाळा सुरू झाली असताना, जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही पुस्तके उपलब्ध व्हायला हवी होती; पण तसे न झाल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांची गोची झाली आहे. सहावीचा अभ्यासक्रम बदललायावर्षी सहावीचा अभ्यासक्रम बदलला असून, आता मागील वर्षाची पुस्तके वापरणेही कठीण झाले आहे. काही शाळांनी शाळा सुरू होताच पाचवी व सातवीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांकडून ही पुस्तके गोळा करून काम चालविले असले, तरी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत.दरवर्षी पुस्तके वेळेवर देण्याचा उपक्रम राबविला जायचा. यामुळे अभ्यासक्रम वेळेत सुरू व्हायचे. मात्र, यावर्षी काही पुस्तके मुलांना न मिळाल्याने मुले शिक्षकांना भंडावून सोडत आहेत. बाजारातून खरेदी करावीत आणि शासनाने दिल्यास पालकांना त्याचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. तसेच यावर शिक्षकही पुस्तके कधी मिळणार, हे सांगायला तयार नाहीत. त्यामुळे या विभागाचा भोंगळ कारभारच पाहायला मिळत आहे.- कृष्णात कुंभार, पालक, खुपिरे, ता. करवीर