शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

पाचवी ते सातवीतील पुस्तकांचा तुटवडा

By admin | Updated: July 27, 2016 00:38 IST

शिक्षकांसह विद्यार्थ्यांची गोची : शाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी पुरवठा नाहीच

प्रकाश पाटील --कोपार्डे --मोफत व सक्तीचा शिक्षण कायदा २0१0 ने आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पुस्तके देण्यात येतील, अशी घोषणा शिक्षकमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. मात्र, शाळा सुरू होऊन सव्वा महिना झाला, तरी पाचवी ते सातवीच्या वर्गांतील हिंदी विषयासह अन्य काही पुस्तकेच उपलब्ध झालेली नाहीत. यामुळे शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांसमोर पुस्तकाविना अभ्यास करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला स्थान दिले गेले आहे. मराठी, इंग्रजी व हिंदी या तीन भाषांना अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, नेमके राष्ट्रभाषा असलेल्या हिंदी विषयालाच दुय्यम स्थान खुद्द शासनाकडून दिले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून नवीन चकचकीत पाठ्यपुस्तके देण्याचा उपक्रम आघाडी सरकारने सुरू केला. तोच उपक्रम भाजप-सेना युती शासनानेही सुरू ठेवला आहे. राज्यात सर्व शाळांमध्ये शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी आठवी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जातील, अशी घोषणा खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. यासाठी आपल्या शाळेत असणाऱ्या संभाव्य पटसंख्येची माहिती वेळेत देण्याच्या सूचनाही शाळांना देण्यात आल्या होत्या.या सूचनेप्रमाणे शाळांनी आपल्याकडे असणाऱ्या विद्यार्थ्यांची संभाव्य पटसंख्या वर्गवार एप्रिल महिन्यातच सादर केली आहे. तरीही शिक्षण विभागाला या विद्यार्थी संख्येचा मेळ घालता आलेला दिसत नाही. बहुतांश शाळांमध्ये पटसंख्येपेक्षा कमी पाठ्यपुस्तके आली आहेत, तर काही पुस्तके उपलब्धच झालेली नाहीत. एक महिना शाळा सुरू होऊन झाला तरी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषयाचे पुस्तकच मिळालेले नाही. सहावीच्या सेमी इंग्रजी विभागाचे सायन्सचे पुस्तकही विद्यार्थ्यांना अद्याप मिळालेले नाही.पाचवीच्या ‘परिसर अभ्यास’ या विषयाची पुस्तकेही मागणीच्या ५0 टक्केच उपलब्ध झाली आहेत, तर सहावीच्या वर्गासाठी हीच अवस्था झाली आहे. सर्व विषयांच्या पुस्तकांबाबत अशी अवस्था झाली आहे. सातवीच्या वर्गासाठी इंग्रजी, गणित, इतिहास, नागरिकशास्त्र या पुस्तकांचीही पूर्ण पटसंख्येप्रमाणे उपलब्धता नाही. दरवर्षी स्वाध्याय पुस्तिका मिळत होती, ती यावर्षी मिळालेलीच नाही. वास्तविक १५ जूनला शाळा सुरू झाली असताना, जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही पुस्तके उपलब्ध व्हायला हवी होती; पण तसे न झाल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांची गोची झाली आहे. सहावीचा अभ्यासक्रम बदललायावर्षी सहावीचा अभ्यासक्रम बदलला असून, आता मागील वर्षाची पुस्तके वापरणेही कठीण झाले आहे. काही शाळांनी शाळा सुरू होताच पाचवी व सातवीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांकडून ही पुस्तके गोळा करून काम चालविले असले, तरी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत.दरवर्षी पुस्तके वेळेवर देण्याचा उपक्रम राबविला जायचा. यामुळे अभ्यासक्रम वेळेत सुरू व्हायचे. मात्र, यावर्षी काही पुस्तके मुलांना न मिळाल्याने मुले शिक्षकांना भंडावून सोडत आहेत. बाजारातून खरेदी करावीत आणि शासनाने दिल्यास पालकांना त्याचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. तसेच यावर शिक्षकही पुस्तके कधी मिळणार, हे सांगायला तयार नाहीत. त्यामुळे या विभागाचा भोंगळ कारभारच पाहायला मिळत आहे.- कृष्णात कुंभार, पालक, खुपिरे, ता. करवीर