शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाचे स्वागत टंचाईने

By admin | Updated: December 23, 2014 00:41 IST

महापालिका : जानेवारीत आठ दिवस पाणीपुरवठा खंडित राहणार; गळती काढण्याची मोहीम

संतोष पाटील ल्ल कोल्हापूरशहरातील सर्वच वॉर्डांतील गळतींचे प्रमाण वाढले आहे. मुख्य पाईपलाईनला गळती असल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. या सर्व गळती काढण्यासाठी उपसा बंद करून किमान चार ते आठ दिवस शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात गळती काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून यासाठी भाड्याने टॅँकर घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपायुक्त विजय खोराटे यांनी ‘लोकमत’ला दिली.महापालिकेकडून दररोज १२० ते १३० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा पंचगंगेतून उपसा केला जातो. मात्र, यातील २५ टक्के पाणी पाईपलाईनच्या गळतीमुळे वाया जाते. या पाण्याची किंमत महिन्याला एक कोटीपेक्षा अधिक आहे. परिणामी, वर्षाला साधारण १० ते १५ कोटी रुपयांची नासाडी गळक्या पाईपलाईनमुळे होत आहे. थेट पाईपलाईनऐवजी १८ वर्षांपूर्वी गळकी शिंगणापूर योजना महापालिकेने शहरवासीयांच्या माथी मारली. या पाईपलाईनवर दिवसातून सरासरी दोनवेळा गळती काढण्याचे काम सध्या महापालिका करते. पाण्याची गळती, दुरुस्ती व त्यामुळे होणारे रस्त्यांचे नुकसान, असे मिळून किमान महिन्याला कोट्यवधी रुपये पाण्यात जात आहेत.आगामी दहा महिन्यांत महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. यामुळे पाण्यासाठी इच्छुकांकडून होणाऱ्या आंदोलनातही वाढ होणार आहे. मुख्य पाईपलाईनला असणाऱ्या गळतीसह उपवाहिन्यांच्या गळती काढण्यासाठी महापालिकेने गळतीचे महानियोजन केले आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या गळती काढण्यात येणार असल्याने शहरातील सर्वच ए, बी, सी व डी वॉर्डांत किमान चार ते आठ दिवस कमी दाबाने, तसेच अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. यासाठी साडेदहा लाख रुपये खर्चून खासगी टॅँकर भाड्याने घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यासाठी अल्पकाळाची निविदाही काढण्यात आली आहे. २९ डिसेंबरला निविदा खुली केली जाणार असून, १५ दिवसांसाठी भाड्याने टॅँकर घेण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. या मोहिमेमुळे गळतीबाबत ठोस मोहीम जरी होणार असली तरी नववर्षाच्या पहिल्या आठवड्यादरम्यानच पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. ‘आयआरबी’कडून पेनल्टीची मागणीफुलेवाडी रिंगरोड, कळंबा, वाशी नाका, राजारामपुरी, शाहूपुरी, कावळा नाका परिसर, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, आदी परिसरांत पाण्याच्या गळतीचे प्रमाण अधिक आहे. शहरातील रस्ते विकास प्रकल्पांतर्गत झालेल्या ४९ किलोमीटर काँक्रिटच्या रस्त्याखाली अडकलेल्या पाईपलाईनच्या गळतीचे प्रमाणही अधिक आहे. या रस्त्यावरील एका गळतीसाठी ‘आयआरबी’कडून ७० ते ९० हजार रुपयांची पेनल्टीची मागणी महापालिकेकडे केली जाते. आतापर्यंत ४० हून अधिक अशा गळतींच्या पेनल्टींसाठी पत्रे महापालिकेला ‘आयआरबी’ने पाठविल्याचे समजते. यावरून गळतीचे प्रमाण व त्याची आर्थिक दाहकता लक्षात येते.