शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

प्रवाशांचे जीव वाचवले, पण आमच्या नोकरीचे काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: चोहोबाजूंनी बस महापुरात वेढलेली असतानाही बसमधील सर्व २५ प्रवाशांना त्यांनी प्रसंगावधान राखत सुखरुप बाहेर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: चोहोबाजूंनी बस महापुरात वेढलेली असतानाही बसमधील सर्व २५ प्रवाशांना त्यांनी प्रसंगावधान राखत सुखरुप बाहेर काढले, पण आता ते स्वत:च अडचणीत सापडले आहेत. गाडी पाण्यात घातली म्हणून कारवाई होण्याची आणि नोकरी जाण्याची भीती महापुरापेक्षाही अधिक छळत आहे. महापुरात पाच दिवस राहून जेवढी वाटली नाही, तेवढी भीती आता नोकरी जाण्याची आणि कुटुंब उघड्यावर पडण्याची वाटत असल्याने ते गलीतगात्र झाले आहेत.

ही घटना आहे, २३ जुलैच्या मध्यरात्रीची. दीडच्या सुमारास चालक श्रीशैल बोळेगाव व वाहक अब्बासअली मुल्ला यांनी विजापूर ते रत्नागिरी ही बस पंचगंगा पुलावरुन मार्गस्थ केली. धो धो पाऊस कोसळत असल्याने पाण्याचा अंदाज आला नाही. आंबेवाडीनजीक रस्त्यावर पाणी आल्याचे पाहून त्यांनी जागेवरच गाडी थांबवत तातडीने १०० नंबरकडे मदतीची याचना केली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी अर्ध्या तासातच तरुणांना मदतीसाठी पाठवले. तोपर्यंत गाडी चोहोबाजूंनी पुराने वेढली होती. अशातच गाडी मागे घेत, रोप लावत यातील २५ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढेपर्यंत पहाटेचे साडेचार वाजले होते. प्रवासी सुखरुप बाहेर पडले मात्र चालक, वाहकांना गाडी सोडता येत नसल्याने तेथेच थांबून राहिले. त्यांनी डेपोशी संपर्क केला पण गाडी तुम्हीच घेऊन या असा निरोप दिल्याने हतबल झालेले हे दोघे तेथे पुलाच्या कठड्यावर बसून राहिले. पुराच्या पाण्यात अडकलेल्या या दोघांनी कोल्हापूरकरांमधील माणुसकीचा अनुभव घेतला. त्यांना अन्न पाणी देण्याबरोबरच कपडेही देऊ केले. हे पाहून त्यांच्याही डोळ्यात अश्रू तरळले.

बुधवारी पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर ही बस संभाजीनगर डेपोमध्ये आणण्यात आली. तातडीने मदत पाठवली आणि जीव वाचवला म्हणून या दोघांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांची भेट घेऊन आभार मानले. पण हे सर्व करत असताना त्यांना भविष्याची चिंता मात्र सतावू लागली आहे. नोकरीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असल्याने ती गेली तर काय या चिंतेने ते गलीतगात्र झाले आहेत. पावसाचा व पाण्याचा अंदाज न आल्याने गाडी पुढे नेली, पण कोणतीही जीवितहानी होऊ दिली नाही, याचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे.

फोटो: २८०७२०२१-कोल-कर्नाटक ड्रायव्हर

फोटो ओळ: कर्नाटक आगाराची बस महापुरात अडकल्यानंतर सर्व प्रवाशांची सुटका केल्यानंतर चालक, वाहक असेच पाण्यात बसून होते.

(छाया: आदित्य वेल्हाळ )