शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

प्रवाशांचे जीव वाचवले, पण आमच्या नोकरीचे काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: चोहोबाजूंनी बस महापुरात वेढलेली असतानाही बसमधील सर्व २५ प्रवाशांना त्यांनी प्रसंगावधान राखत सुखरुप बाहेर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: चोहोबाजूंनी बस महापुरात वेढलेली असतानाही बसमधील सर्व २५ प्रवाशांना त्यांनी प्रसंगावधान राखत सुखरुप बाहेर काढले, पण आता ते स्वत:च अडचणीत सापडले आहेत. गाडी पाण्यात घातली म्हणून कारवाई होण्याची आणि नोकरी जाण्याची भीती महापुरापेक्षाही अधिक छळत आहे. महापुरात पाच दिवस राहून जेवढी वाटली नाही, तेवढी भीती आता नोकरी जाण्याची आणि कुटुंब उघड्यावर पडण्याची वाटत असल्याने ते गलीतगात्र झाले आहेत.

ही घटना आहे, २३ जुलैच्या मध्यरात्रीची. दीडच्या सुमारास चालक श्रीशैल बोळेगाव व वाहक अब्बासअली मुल्ला यांनी विजापूर ते रत्नागिरी ही बस पंचगंगा पुलावरुन मार्गस्थ केली. धो धो पाऊस कोसळत असल्याने पाण्याचा अंदाज आला नाही. आंबेवाडीनजीक रस्त्यावर पाणी आल्याचे पाहून त्यांनी जागेवरच गाडी थांबवत तातडीने १०० नंबरकडे मदतीची याचना केली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी अर्ध्या तासातच तरुणांना मदतीसाठी पाठवले. तोपर्यंत गाडी चोहोबाजूंनी पुराने वेढली होती. अशातच गाडी मागे घेत, रोप लावत यातील २५ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढेपर्यंत पहाटेचे साडेचार वाजले होते. प्रवासी सुखरुप बाहेर पडले मात्र चालक, वाहकांना गाडी सोडता येत नसल्याने तेथेच थांबून राहिले. त्यांनी डेपोशी संपर्क केला पण गाडी तुम्हीच घेऊन या असा निरोप दिल्याने हतबल झालेले हे दोघे तेथे पुलाच्या कठड्यावर बसून राहिले. पुराच्या पाण्यात अडकलेल्या या दोघांनी कोल्हापूरकरांमधील माणुसकीचा अनुभव घेतला. त्यांना अन्न पाणी देण्याबरोबरच कपडेही देऊ केले. हे पाहून त्यांच्याही डोळ्यात अश्रू तरळले.

बुधवारी पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर ही बस संभाजीनगर डेपोमध्ये आणण्यात आली. तातडीने मदत पाठवली आणि जीव वाचवला म्हणून या दोघांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांची भेट घेऊन आभार मानले. पण हे सर्व करत असताना त्यांना भविष्याची चिंता मात्र सतावू लागली आहे. नोकरीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असल्याने ती गेली तर काय या चिंतेने ते गलीतगात्र झाले आहेत. पावसाचा व पाण्याचा अंदाज न आल्याने गाडी पुढे नेली, पण कोणतीही जीवितहानी होऊ दिली नाही, याचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे.

फोटो: २८०७२०२१-कोल-कर्नाटक ड्रायव्हर

फोटो ओळ: कर्नाटक आगाराची बस महापुरात अडकल्यानंतर सर्व प्रवाशांची सुटका केल्यानंतर चालक, वाहक असेच पाण्यात बसून होते.

(छाया: आदित्य वेल्हाळ )