शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

‘शेती वाचवा, शेतकरी वाचवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:21 IST

कोल्हापूर : ‘शेती वाचवा, शेतकरी वाचवा’ असा नारा देत कृषीविरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी शेतकरी कामगार पक्षाने जिल्हाधिकारी ...

कोल्हापूर : ‘शेती वाचवा, शेतकरी वाचवा’ असा नारा देत कृषीविरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी शेतकरी कामगार पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भर उन्हात रद्द करा, रद्द करा, कृषी कायदे रद्द करा, इंधन दरवाढ मागे घ्या, अशा घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी शेकापने आंदोलनाची हाक दिली होती. दुपारी एक वाजता बिंदू चौकातून सुरू झालेला मोर्चा लक्ष्मीपुरी, स्टेशन रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आंदोलनाचे नेतृत्व बाबूराव कदम, प्राचार्य टी. एस. पाटील, बाबासाहेब देवकर, भारत पाटील यांनी केले.

यात दिलीप जाधव, संभाजी जगदाळे, अमित कांबळे, उज्वला कदम, संतराम पाटील, भारत पाटील, अशोक पाटील, संग्राम माने, मोहन पाटील, केरबा पाटील, दत्तात्रय पाटील, लता कांदळकर, सरदार पाटील, वसंत कांबळे, राजेंद्र देशमाने, भीमराव देसाई, चंद्रकांत बागडी, पांडुरंग पाटील यांच्यासह शेकापचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले.

मागण्या

शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करा

कामगारविरोधी कायदे रद्द करून कंत्राटीकरण थांबवा

लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची वीजबिले माफ करा

पेट्राेल, डिझेल, गॅस दरवाढ मागे घ्या

नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान द्या

एफआरपीप्रमाणे १४ दिवसांच्या आत एकरकमी बिल द्या

फोटो : ११०२२०२१-कोल-शेतकरी मोर्चा

फोटो ओळ : शेतकरी कामगार पक्षाने गुरुवारी कृषी कायद्यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात महिलांचाही सहभाग मोठा दिसत होता.

(छाया: नसीर अत्तार)