शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

निवडणूक आधीच्या लढाईत सतेज पाटील यांची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:44 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : निवडणूक होणार की नाही, या हिंदोळ्यावर राहिलेली ‘गोकुळ’ची निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयाने ...

राजाराम लोंढे,

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : निवडणूक होणार की नाही, या हिंदोळ्यावर राहिलेली ‘गोकुळ’ची निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक पूर्वीच्या लढाईत सतेज पाटील हे सरशी ठरले असले तरी पुढची लढाई तितकीसी सोपी नाही, हेही तितकेच खरे आहे. त्यात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीचा प्रस्ताव पुढे करून ‘हबकी’ डाव टाकल्याने दोन्ही गटात अस्वस्थता पसरली आहे.

ज्येष्ठ संचालकांची नाराजी, मल्टिस्टेट व नोकरभरतीवरून दूध संस्था प्रतिनिधींमध्ये असणाऱ्या अस्वस्थेमुळे सत्तारूढ गटाला कोरोनाच्या आडून निवडणुका लांबणीवर टाकायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी निकराचे प्रयत्न केले. या लढाईत पालकमंत्री सतेज पाटील यांची सरशी झाली असली तरी यापुढची लढाई तितकीसी सोपी नाही. सत्तारूढ गटाने गेल्या पाच वर्षात चारशे संस्थांची नोंदणी करून त्यांना सभासदत्व दिले आहे. त्यातच जुन्या संचालकांकडे दीडशे ते दोनशे मतांचा गठ्ठा आहे. या जमेच्या बाजू असल्या तरी मल्टिस्टेटचा मुद्दा, नोकरभरती हे मुद्देही सत्तारूढ गटाला मारक ठरणार आहेत.

विरोधी गटाने गेल्या पाच वर्षात चुकीच्या कारभारावर बोट ठेवत संचालक मंडळाची कोंडी केली आहे. मल्टिस्टेटच्या मु्द्द्यावरून सत्तारूढ गटाला माघार घेण्यास भाग पाडले. आपल्यामुळेच दूध संघ उत्पादकांच्या मालकीचा राहिला हा मुद्दा प्रचारात रेटला जाणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असली तरी कोण कोणासोबत जाणार या घडामाेडीही महत्त्वाच्या ठरणार आहेत. मागील निवडणुकीत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलीक यांच्यात सामना झाला होता. सत्तारूढ गटाला कोणी पराभूत करूच शकत नाही, असे काहीसे वातावरण गेल्या पंधरा-वीस वर्षात झाले होते. मात्र मागील निवडणुकीत विरोधकांनी निकराची झुंज देत दोन जागा घेतल्या होत्या. पाच वर्षात ‘गोकुळ’ विरोधातील लढाईत मंत्री हसन मुश्रीफ हे मंत्री सतेज पाटील यांच्यासोबत राहिले. त्यात तीन संचालक विरोधकांच्या संपर्कात असल्याने सत्तारूढ गटात अस्वस्थता आहे.

त्यामुळेच जिल्हा बँकेचे राजकारण पुढे करून मंत्री मुश्रीफ यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सत्तारूढ गटाचा आहे. त्यातूनच मुंबईत दोन वेळा बैठका झाल्या, मात्र फलश्रुती झाली नाही. अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर बसण्याचे ठरले आहे. त्यातच शुक्रवारी ‘गोकुळ’सह इतर निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही आणि महाविकास आघाडीत पी.एन. पाटील हेही आहेत. असे सांगून मंत्री मुश्रीफ यांनी ‘हबकी’ डाव टाकला आहे. यामुळे दोन्ही गटात अस्वस्थता पसरली असली तरी यातून मुश्रीफ हेच ‘गोकुळ’च्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.

विनय कोरे यांच्या भूमिकेलाही महत्त्व

‘गोकुळ’च्या राजकारणात मुश्रीफ यांच्याबरोबरच आमदार विनय कोरे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कोरे यांनी अद्याप पत्ते खोललेले नाहीत. सत्तारूढ गटाने त्यांना दोन जागांची ऑफर दिली असली तरी त्या पॅनलमध्ये त्यांचे विरोधक माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर असल्याने त्यांची गोची आहे.

वाढीव चारशे सभासद सत्तारूढ गटाची ताकद

मागील निवडणुकीत ३२४० सभासद होते. गेल्या पाच वर्षात त्यात चारशे सभासदांची वाढ झाली आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सभासद करून घेताना बारीक चाळण लावल्याने शंभर टक्के सत्तारूढ गटाला मानणाऱ्यांना सभासद करून घेतले आहे. वाढीव सभासद सत्तारूढ गटाची ताकद राहणार आहे.