शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

चार तालुक्यांतील १७४ गावांतील सरपंच निवडी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शनिवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पन्हाळा, करवीर, शिरोळ व भुदरगडमधील १७४ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शनिवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पन्हाळा, करवीर, शिरोळ व भुदरगडमधील १७४ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच निवडीच्या सभा स्थगित केल्या. या तालुक्यांमधील सरपंच निवडीबाबत मंगळवारी (दि. ९) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे. उर्वरित आठ तालुक्यांतील २५९ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीच्या सभा ठरल्याप्रमाणे ९ तारखेला पार पाडाव्यात व त्यांचा अहवाल १० तारखेला इतिवृत्तासह सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

कोल्हापूर जिल्ह्यात नुकतीच ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. त्यानंतर २७ जानेवारीला सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत झाली. हे आरक्षण रोटेशननुसार पडलेले नसल्याच्या कारणास्तव त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. त्यावर सुनावणी होऊन शुक्रवारी न्यायालयाने करवीरमधील कोगे, खुपिरे, उंड्री (ता. पन्हाळा), शिरोळमधील शिरटी, मजरेवाडी आणि भुदरगडमधील फणसवाडी या सहा ग्रामपंचायतींची सरपंच निवडीची सभा स्थगित करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी १६ तारखेपर्यंत सुनावणी घेऊन त्यावर निर्णय घ्यावा, असे नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी देसाई यांनी शनिवारी याबाबतचा आदेश काढला. यानुसार वरील चारीही तालुक्यांमधील सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीच्या ९ तारखेच्या सभा स्थगित केल्या आहेत व त्या १६ तारखेपर्यंत रोखून ठेवल्या आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार सहा ग्रामपंचायतींमधील हरकतींवर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होईल. त्यानंतर या चार तालुक्यांतील सरपंच निवडीचा कार्यक्रम नव्याने जाहीर होईल.

आठ तालुक्यांत मंगळवारी निवडी

आजरा, गडहिंग्लज, शाहूवाडी, कागल, हातकणंगले, राधानगरी, चंदगड, गगनबावडा या आठ तालुक्यांतील २५९ गावांतील सरपंच निवडीच्या सभा ठरल्याप्रमाणे ९ तारखेला होतील.

निवडी स्थगित झालेले तालुके : ग्रामपंचायतींची संख्या

करवीर : ५४

भुदरगड : ४५

पन्हाळा : ४२

शिरोळ : ३३

पुन्हा धाकधूक

या सहा गावांमुळे चारही तालुक्यांतील ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेल्या सदस्यांमध्ये पून्हा अस्वस्थता आहे. रोटेशन पद्धतीमुळे एका गावातील सरपंच आरक्षण बदलले की त्याचा परिणाम अन्य गावांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदस्यांना याबाबत निर्णय होईपर्यंत पुन्हा देव पाण्यात घालून बसावे लागणार आहे.

---