शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

‘सारथी’चे उद्यापासून कामकाज सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST

कोल्हापूर : मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे यांना दिला होता. त्यांच्याच सूचनेनुसार ...

कोल्हापूर : मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे यांना दिला होता. त्यांच्याच सूचनेनुसार केवळ १८ तासांत या इमारतीचे रूप पालटले असून, प्रत्यक्षात उपकेंद्राचे कामकाज उद्या (सोमवार)पासून सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाचपर्यंत सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी दिली.

पालकमंत्री पाटील म्हणाले, मूक आंदोलनानंतर खासदार संभाजीराजे यांचे आंदोलन निष्फळ न होता त्यातून चांगला मार्ग निघाला. त्यांनीही सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळे यापुढेही मराठा आरक्षणासंबंधी चांगले फलित होईल. या उपकेंद्राच्या माध्यमातून कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील मराठा समाजातील मुलांना चांगला फायदा होईल.

शाहू छत्रपती म्हणाले, आज खऱ्या अर्थाने शाहू जयंती साजरी करत आहोत. सारथीचे उपकेंद्र उद्घाटनामुळे सर्वांना आनंद झाला आहे. आरक्षणासंबधी ५८ मोर्चे निघाले. त्यातून तत्कालीन सरकारने सारथीची स्थापना केली. पण विकास काही झाला नाही. त्यामुळे समाजाचाही विकास खुंटला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लावला. या केंद्राला सरकारने जास्तीत जास्त सहकार्य करावे. सरकार बाकीचे निर्णय सकारात्मक घेईल.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, राजकीय भूमिका न घेता सारथीचे उपकेंद्र कोल्हापुरात स्थापण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या केंद्रामुळे समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून शैक्षणिक विकास साधता येईल. आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिकाही दाखल केली आहे. सरकारची न्याय देण्याची भूमिका आहे.

शाहू महाराजांच्या आठवणींसोबत मोठा झालो

माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे ऋणानुबंध होते. शाहूराजांच्या आठवणी बालपणापासून ऐकत आलो आहे. त्यामुळे शाहूंची वेगळी प्रतिमा माझ्या मनात आहे. छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्यासारखी दिशादर्शक दैवतं महाराष्ट्राला लाभली आहेत. त्यांच्या लोकशाहीचा वारसा सांभाळण्याचे काम करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.