शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

सांगली, मिरजेतील तिबेटियन, नेपाळी परतले

By admin | Updated: April 27, 2015 00:15 IST

चार पर्यटक सुखरूप : जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष

सांगली : शहरात खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणारे (चायनीज), तिबेटियन स्वेटर विक्रेते कालच नेपाळला रवाना झाले आहेत. त्यामुळे चायनीज विक्रीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, नेपाळमध्ये गेलेले सांगलीतील चार पर्यटक सुखरुप असल्याचे वृत्त असून, त्यांना शिबिरामध्ये ठेवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष सुरु करण्यात आला असून यामध्ये नव्याने नोंदणी मात्र झालेली नाही.सांगली शहरात चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणारे व स्वेटर विक्रेते असे सुमारे शंभरावर आहेत. यामधील सुमारे तीस ते चाळीस जण कालच नेपाळला रवाना झाले आहेत. चायनीज विक्रेत्यांमध्ये तरुणांचा सहभाग अधिक आहे. हे तरुण स्थानिक चायनीज विक्रेत्यांकडे काम करतात. त्याचबरोबर स्वेटर विक्री सध्या बंद असली तरी आजुबाजूच्या यात्रा, उत्सवात ते विक्री करीत असतात. शनिवारी नेपाळमध्ये भूकंप झाल्याचे वृत्त समजताच नेपाळी व तिबेटियन नागरिक तात्काळ परतले आहेत. काही कामगार आपल्या पगाराची रक्कम आगाऊ घेऊन रवाना झाले आहेत. त्यामुळे शहरातील चायनीज विक्री व्यवसायावर परिणाम झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालया- बरोबरच सर्व तहसील कार्यालयात शनिवारपासूनच आपत्ती निवारण कक्ष उघडण्यात आला आहे. या कक्षाकडून ट्रॅव्हल एजन्सीजकडे संपर्क साधण्यात आला आहे. मात्र नव्याने कोणी बेपत्ता किंवा संपर्काविना असल्याचे आढळले नाही. नेपाळमध्ये ट्रेकिंगसाठी सांगलीतील चार पर्यटक गेले होते. त्यांच्याशी संपर्क झाला असून, ते सुखरुप असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये अमोल अप्पासाहेब पाटील (रा. महसूल कॉलनी, शामरावनगर), सचिन उदगावे (वारणाली वसाहत), स्वप्निल कुंभारकर व त्यांची पत्नी मानसी कुंभारकर (रा. गव्हर्मेंट कॉलनी) यांचा समावेश आहे. त्यांना सध्या भारताकडून सुरु केलेल्या निवास शिबिरामध्ये आश्रय देण्यात आला असून, लवकरच त्यांना दिल्लीत आणण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)भूकंपग्रस्तांसाठी मिरजेतील अधिकाऱ्याची सेवानेपाळमधील भूकंपामध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी लष्कराच्या हवाई दलात विंग कमांडर म्हणून कार्यरत असलेले मिरजेचे मनीष मैंदर्गी हे रात्रं-दिवस सेवा देत आहेत. भारत सरकारने नेमलेल्या दहा पथकांतील एका पथकाचे नेतृत्व मैंदर्गी यांच्याकडे आहे. मैंदर्गी हे गेल्या पंधरा वर्षांपासून हवाई दलात आहेत. सध्या ते चंदीगड येथे सेवेत आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी काल दहा लष्कराची पथके नेमण्यात आली. त्यामधील एका पथकाचे नेतृत्व मैंदर्गी यांच्याकडे असून, काल दुपारीच ते ५५० प्रवाशांच्या क्षमतेचे लष्करी विमान घेऊन काठमांडूला रवाना झाले. काल रात्री उशिरापर्यंत त्यांनी काठमांडू ते दिल्ली अशा चार खेपा करून सुमारे दीड हजार भारतीयांची सुटका केली आहे. आणखी चार दिवस ही सेवा सुरू राहणार असल्याचे त्यांनी मिरजेतील आपल्या नातेवाईकांना कळवले आहे.