शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

सांगली-कोल्हापूर रस्ता टोलमुक्तच हवा

By admin | Updated: June 4, 2015 00:01 IST

जयंत पाटील : सरकारची अवस्था दोलायमान

सांगली : निवडणुकीच्या काळात सवंग लोकप्रियतेसाठी अनेक घोषणा भाजपने केल्या होत्या. संपूर्ण टोलमुक्तीच्या घोषणेची अंमलबजावणी अजून झालेली नाही. सांगली-कोल्हापूरसह राज्यातील सर्वच रस्ते त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे टोलमुक्त करावेत, असे मत माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, सरकारने निवडणुकीत लोकांसमोर सवंग लोकप्रियतेसाठी अनेक प्रकारच्या घोषणा केल्या. घोषणा करणे सोपे असते, त्याची अंमलबजावणी करताना कस लागतो. राज्याची सध्याची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. अशी स्थिती असतानाच सरकारने अनेक घोषणा केल्या. आर्थिक डोलारा सांभाळताना ते आता अडचणीत सापडले आहेत. सरकारची सध्याची अवस्थाच दोलायमान झाली आहे. सध्याचा टोलमुक्तीचा निर्णय हा केवळ छोट्या रस्त्यांपुरता मर्यादित आहे. छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाली असली तरी, प्रत्यक्षात संपूर्ण टोलमुक्तीची घोषणा त्यांनी केल्यामुळे ती त्यांनी पाळली पाहिजे. सांगली-कोल्हापूर रस्ता टोलमुक्तच असला पाहिजे. कोल्हापूरबाबतही आमची तीच स्पष्ट भूमिका आहे. महामार्गांचे ठेके राष्ट्रवादीच्या लोकांकडे आहेत, अशी टीका केली जात आहे. वास्तविक अशा सर्वच ठेक्यांची कागदपत्रे तपासावीत. आम्हालाही कळू द्या, कोणाचे ठेके आहेत ते, असेही ते म्हणाले.आरक्षणाबाबत ते म्हणाले की, सरकारने धनगर समाजाबाबत अन्याय केला आहे. केंद्र शासनाने दिलेल्या प्रस्तावावर अनुकूल निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या एका पत्राला केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने दिलेल्या उत्तरातून या गोष्टी समोर आल्या आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांनी आरक्षणाबाबत दिलेला शब्द पाळलेला नाही. मराठा व अन्य समाजाचे आरक्षणाचे प्रलंबित प्रश्न तसेच आहेत. त्याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. (प्रतिनिधी)भूविकास बँका टिकल्या पाहिजेतराज्यातील भूविकास बँका टिकल्या पाहिजेत, अशी मागणी आता जोर धरत आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या या बॅँका असल्यामुळे सरकारने त्यांना मदत करणे अपेक्षित होते. आर्थिक मदत देऊन भूविकास बॅँका टिकविण्याची गरज आहे. आघाडी सरकारच्या काळात भूविकास बॅँकांबाबत केवळ समिती नियुक्त करून त्याची चर्चा सुरू होती, तेव्हा भाजपच्या लोकांनी सरकारवर टीका केली होती. त्यामुळे या बॅँका टिकविण्याच्या दृष्टीने त्यांनी निर्णय घ्यावा, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.