शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समीर सहभागी होणार

By admin | Updated: February 10, 2016 01:13 IST

न्यायालयाची परवानगी : खटला लवकर चालवा; आरोपीच्या वकिलांची मागणी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड याला न्यायालयातील खटल्यामध्ये सुरक्षिततेच्या कारणांवरून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीत सहभागी होण्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. बी. बिले यांनी मंगळवारी परवानगी दिली. पोलिसांनीच तसा अर्ज न्यायालयासमोर सादर केला होता. त्याला आरोपीच्या वकिलांनी आक्षेप घेतला; परंतु त्यावर न्यायाधीश बिले यांनी पोलिसांच्या अर्जाला मंजुरी देत, सुनावणीला साक्षीदार हजर होतील त्या-त्या वेळेस गरज वाटल्यास समीरला प्रत्यक्ष बोलावून घेतले जाईल, असे स्पष्ट केले. हा खटला लवकर चालवा, अशी विनंती गायकवाड याच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली.कसबा बावडा येथील ‘न्यायसंकुला’मध्ये ही सुनावणी झाली. सुरुवातीला पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी समीरच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याला येथून (पान १० वर)समीरला अंडा बराकीमधून बाहेर काढासमीर याची कारागृहात भेट घेतली असता त्याने आपण मानसिक दडपणाखाली आहोत. अंडा बराकीमधून आपणाला बाहेर काढावे, इतर कैद्यांशी आपणाला बोलू द्यावे, अशी त्याची मागणी आहे. त्यामुळे त्याला अंडा बराकीमधून बाहेर काढावे, अशी विनंती अ‍ॅड. पटवर्धन यांनी न्यायालयास केली. त्यावर अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी समीरच्या सुरक्षेबाबत त्याचेच वकील पुनाळेकर यांनी पोलिसांना पत्र दिले आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेसाठी ही व्यवस्था केली असल्याचे मत व्यक्त केले. यावर न्यायाधीश बिले यांनी कारागृह अधीक्षकांचे मत घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. पुढच्या न्यायालयीन सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करावे, असा विनंती अर्ज केला. त्याला आक्षेप घेत समीरचे वकील एस. व्ही. पटवर्धन यांनी समीरविरोधात खटला चालत असेल तर स्वत: त्याला हजर राहण्यासाठी राज्यघटनेमध्ये अधिकार आहेत. पोलीस त्याच्या हक्कांवर गदा आणत आहेत. संविधानाच्या हक्कांची एकप्रकारे ते पायमल्ली करीत असल्याचे मत व्यक्त केले. अ‍ॅड. पटवर्धन यांनी हा खटला लवकर चालवा, आरोपपत्र निश्चित करा, अशी विनंती न्यायालयाला केली. त्यावर अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी समीरच्या विरोधातील खटला कोल्हापूर, सांगली व सातारा येथील न्यायालये वगळून सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी व मुंबई या ठिकाणी वर्ग करावा, अशी याचिका त्याच्या वकिलांनीच मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे आणि आज हेच वकील खटला लवकर चालवा, असे म्हणत आहेत. समीरच्या जामीन अर्जावर युक्तिवाद मांडण्यासाठी सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांची तात्पुरती नियुक्ती केली होती. या संपूर्ण खटल्यासाठी त्यांची नियुक्ती केल्याचा निर्णय शासनाने अद्याप दिलेला नाही. या निर्णयासह तपास प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. फॉरेन्सिक रिपोर्टसह पोलिसांचा पुरवणी तपास अहवाल अद्याप न्यायालयास सादर केलेला नाही. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा खटला कोल्हापुरात की अन्यत्र, या अर्जावरील सुनावणीचा निर्णय होईल, असे मत मांडले. त्यावर न्यायाधीशांनी पुढील सुनावणी २३ तारखेला ठेवली. यावेळी मेघा पानसरे, विशेष सरकारी वकील चंद्रकांत बुधले, अ‍ॅड. विवेक घाटगे, प्रकाश मोरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)