शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
3
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
4
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
5
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
6
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
7
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
9
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
10
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
11
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
12
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
13
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
14
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
16
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
17
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
18
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
19
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
20
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक

न झालेल्या सत्काराची खासदारांना सल

By admin | Updated: June 11, 2016 00:29 IST

राष्ट्रवादीचा वर्धापनदिन : कार्यक्रमात महाडिक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

कोल्हापूर : देशभरात साडेपाचशेहून अधिक खासदारांमध्ये टॉप थ्री क्रमांक पटकाविल्याने दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी आपला गौरव झाला; पण मतदारसंघात साधी दखलही घेतली नसल्याची सल खासदार धनंजय महाडिक यांनी बोलून दाखविली. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पक्षांतर्गत राजकारणावर नाराजी व्यक्त केली; पण सर्वच वक्त्यांनी महाडिक यांच्यावर कौतुकाचा वर्षावच केला. संसदेत उभे राहून प्रश्न उपस्थित करणे एवढे सोपे नसल्याचे सांगत माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, महाडिक यांचे अभ्यासपूर्ण प्रश्न व प्रश्नांविषयीची आपुलकी पाहून पक्षातील कार्यकर्त्यांचा ऊर भरून येतो. बास्केट पूल, कोकण रेल्वेबाबत त्यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. राष्ट्रवादीचे खासदार पहिल्या तीनमध्ये येतात, याचा आम्हाला अभिमान आहे. आगामी काळात केंद्र अथवा राज्य पातळीवरील नेत्यांच्या हस्ते महाडिक यांचा सत्कार करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. बास्केट पूल म्हणजे काय ते समजावून सांगा, असा टोला जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी हाणला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत २५ जून रोजी केशवराव भोसले नाट्यगृह येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंगणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार महाडिक यांनी स्वत: पुढाकार घेऊन पक्षाच्या उमेदवारांना ताकद द्यावी, अशी मागणी प्रदीप पाटील यांनी केली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवानंद माळी यांनी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर टीका केली. जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी स्वागत केले. जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर, राष्ट्रवादीचे खजानिस अरुण इंगवले, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे, युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रोहित पाटील, बी. एन. पाटील-मुगळीकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावरजिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी पक्षाने केली आहे. ऐनवेळी पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्यास मित्रपक्षाशी युतीचा विचार केला जाईल; पण कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर पक्षाचा झेंडा फडकवणारच असा निर्धार ए. वाय. पाटील यांनी केला. चार-पाच महिन्यांत राजकीय भूकंपभाजपचे द्वेषाचे राजकारण सुरू असून मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राज्यात राजकीय भूकंप होईल, असे भाकीत महाडिक यांनी केले.