शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

ग्रामीण कामगारांना चांगल्या सुविधा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:20 IST

जयसिंगपूर : श्रमिक कामगार वर्ग हा राज्याच्या विकासामधील महत्त्वाचा घटक असून, त्यांचे आरोग्य चांगले असेल तर राज्याचे आरोग्य चांगले ...

जयसिंगपूर : श्रमिक कामगार वर्ग हा राज्याच्या विकासामधील महत्त्वाचा घटक असून, त्यांचे आरोग्य चांगले असेल तर राज्याचे आरोग्य चांगले राहील. त्यामुळेच राज्यातील कामगारांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी सेवा रुग्णालयांच्या माध्यमातून महानगरांप्रमाणे ग्रामीण कामगारांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळायला हव्यात, अशा सूचना आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिल्या.

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी सेवा रुग्णालय इचलकरंजी येथे वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करण्यासह अन्य प्रमुख मागण्यांबाबत सर्व श्रमिक संघाने मंत्री यड्रावकर यांची भेट घेतली होती. यावेळी इचलकरंजी येथील महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी सेवा रुग्णालय स्थलांतरित न करणे, जयसिंगपूर व शिरोळ येथे नवीन सेवा दवाखाना कार्यान्वित करणे, कन्सल्टिंग स्पेशालिस्टची नियुक्ती करून अतिरिक्त रुग्णालयांशी टायअप करणे, पुरेसा औषधसाठा व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करणे, यासह विविध प्रश्न मांडत यावर तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार याबाबत आपण सकारात्मक असून लवकरच हे प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन मंत्री यड्रावकर यांनी यावेळी दिले.

मंत्री यड्रावकर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कोल्हापूरसह राज्यभरातील ग्रामीण कामगारांना राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयांच्या माध्यमातून चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत.