शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पाचगावमध्ये पाण्यासाठी धावाधाव

By admin | Updated: July 15, 2017 00:48 IST

पाचगावमध्ये पाण्यासाठी धावाधाव

ज्योती पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कपाचगाव : पाचगावमध्ये पावसाळ्याच्या दिवसात देखील पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. जोरदार पावसाच्या अभावी परिसरातील कूपनलिकेच्या पाणीपातळीत घट झाली आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी खासगी पुरवठ्यावर अवलंबून रहावे लागत आहे.उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी लोकांनी खासगी कूपनलिका, विहिरी व टँकरचा आधार घेतलाच; परंतु आता देखील याच गोष्टींचा आधार पाचगावकरांना घ्यावा लागत आहे. पाचगाव हे कोल्हापूर शहरालगत जरी असले तरीसुद्धा पाणीप्रश्न अजूनही सुटलेला नाही. जनावरांना मुबलक पाणी मिळत नसल्याने खासगी कूपनलिका, विहिरींमधून शेतकऱ्यांना दिवसाकाठी हजारो लीटर पाणी उपसा करून सायकल, गाडी व कावड करून आणावे लागत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नळ पाणीपुरवठा योजनेतून मिळणारे पाणी चार-पाच दिवसांतून एकदा लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यावर लोकांची तहान भागत नाही. त्यामुळे लोकांना टँकरचाच आधार घ्यावा लागतो. २००० लिटरच्या टँकरला ३०० रुपये मोजावे लागतात. पाचगावची वाढती लोकसंख्या व कॉलन्यांचे विस्तारीकरण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला पाण्याचे नियोजन करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. प्रशासनाकडून अद्यापही कायमस्वरूपी पाणीप्रश्न मिटेल, अशी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.पाचगावमधील शेतकरी शिवाजी पौंडकर, संभाजी गाडगीळ, युवराज जाधव यांनी स्वत:च्या विहिरीतून व कूपनलिकेतून लोकांना पाण्याची उपलब्धता करून दिली आहे. गावच्या पााण्याच्या टाकीत विहिरीतील पाणी सोडून गावाची तहान भागविली आहे; परंतु तुटपुंज्या पाण्यावर सर्वांचीच तहान भागत नाही. त्यामुळे पाणीप्रश्नासाठी नेमके लोकांनी विचारायचे कोणाला? हा प्रश्न पाचगावकरांना सतावत आहे.सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची लगबग सुरू आहे. निवडणुकीच्या निमित्ताने नेतेमंडळी पाणीप्रश्न सोडवणुकीचे आश्वासन देतात, टँकरने पाणीपुरवठा करतात. मात्र, निवडणूक झाली की, इथला पाणीप्रश्न सोडविणारे नेते या गावाकडे दुर्लक्ष करतात. पाचगावची तहान मात्र कायम राहते. त्यामुळे पाचगावचा पाणीप्रश्न कधी सुटणार? असा प्रश्न कायमचाच पाचगावकरांच्या पाचवीलाच पुजला आहे.