शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

पाचगावमध्ये पाण्यासाठी धावाधाव

By admin | Updated: July 15, 2017 00:48 IST

पाचगावमध्ये पाण्यासाठी धावाधाव

ज्योती पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कपाचगाव : पाचगावमध्ये पावसाळ्याच्या दिवसात देखील पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. जोरदार पावसाच्या अभावी परिसरातील कूपनलिकेच्या पाणीपातळीत घट झाली आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी खासगी पुरवठ्यावर अवलंबून रहावे लागत आहे.उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी लोकांनी खासगी कूपनलिका, विहिरी व टँकरचा आधार घेतलाच; परंतु आता देखील याच गोष्टींचा आधार पाचगावकरांना घ्यावा लागत आहे. पाचगाव हे कोल्हापूर शहरालगत जरी असले तरीसुद्धा पाणीप्रश्न अजूनही सुटलेला नाही. जनावरांना मुबलक पाणी मिळत नसल्याने खासगी कूपनलिका, विहिरींमधून शेतकऱ्यांना दिवसाकाठी हजारो लीटर पाणी उपसा करून सायकल, गाडी व कावड करून आणावे लागत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नळ पाणीपुरवठा योजनेतून मिळणारे पाणी चार-पाच दिवसांतून एकदा लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यावर लोकांची तहान भागत नाही. त्यामुळे लोकांना टँकरचाच आधार घ्यावा लागतो. २००० लिटरच्या टँकरला ३०० रुपये मोजावे लागतात. पाचगावची वाढती लोकसंख्या व कॉलन्यांचे विस्तारीकरण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला पाण्याचे नियोजन करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. प्रशासनाकडून अद्यापही कायमस्वरूपी पाणीप्रश्न मिटेल, अशी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.पाचगावमधील शेतकरी शिवाजी पौंडकर, संभाजी गाडगीळ, युवराज जाधव यांनी स्वत:च्या विहिरीतून व कूपनलिकेतून लोकांना पाण्याची उपलब्धता करून दिली आहे. गावच्या पााण्याच्या टाकीत विहिरीतील पाणी सोडून गावाची तहान भागविली आहे; परंतु तुटपुंज्या पाण्यावर सर्वांचीच तहान भागत नाही. त्यामुळे पाणीप्रश्नासाठी नेमके लोकांनी विचारायचे कोणाला? हा प्रश्न पाचगावकरांना सतावत आहे.सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची लगबग सुरू आहे. निवडणुकीच्या निमित्ताने नेतेमंडळी पाणीप्रश्न सोडवणुकीचे आश्वासन देतात, टँकरने पाणीपुरवठा करतात. मात्र, निवडणूक झाली की, इथला पाणीप्रश्न सोडविणारे नेते या गावाकडे दुर्लक्ष करतात. पाचगावची तहान मात्र कायम राहते. त्यामुळे पाचगावचा पाणीप्रश्न कधी सुटणार? असा प्रश्न कायमचाच पाचगावकरांच्या पाचवीलाच पुजला आहे.