शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: November 24, 2015 00:22 IST

कल्पकतेने प्रगती साधण्याची गरज : संधी निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल

घन:शाम कुंभार-- यड्राव --शासनाने कायदा केला की, त्याची अंमलबजावणी किती काटेकोर व प्रामाणिकपणे होते, यावर त्या कायद्याची यशस्वीता अवलंबून असते. या शिक्षण कायद्यात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण न देता कल्पक मार्गाने त्याच्यातील प्रगती साधणे हा कायद्याचा मुख्य हेतू असूनही अप्रगत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यावरच विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलांना शिक्षणाचा मार्ग दाखविला. शाहू महाराजांनी वंचितांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. गोपाळ कृष्ण गोखले यांनी शंभर वर्षांपूर्वीच लेजिसलेटिव्ह असेंब्लीमध्ये भारतीय मुलांना शिक्षणाचा अधिकार देण्याची विनंती केली. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देऊन तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने सामाजिक आणि शैक्षणिक सहभागाविषयीच्या योजना राबविल्या. हे या नेत्यांनी आणि थोर समाजसुधारकांनी आधीच ओळखले होते. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यामुळे मिळाला. परीक्षा नसल्याने मुलांमधील परीक्षेची भीती कमी झाली. त्यामुळे अभ्यास व कष्ट करण्याची प्रवृत्ती मंद झाली. यामुळे वाचन संस्कृती लोप पावू लागली. पाढे पाठांतराचा पत्ताच नाही. शुद्धलेखन म्हणजे काय किंवा लिखाण व हस्ताक्षर याची कलाच माहिती नाही. या ज्ञानाचे विद्यार्थ्यांना महत्त्व वाटत नाही. यासाठी शासन वाचन प्रेरणा दिवस यासारखे उपक्रम राबवत आहे. त्याची अंमलबजावणी करणारे हे शिक्षकच असतात. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय शाळांमधून लावली जात नाही, तोपर्यंत प्रगत, अप्रगत हा विद्यार्थी गट राहणारच आहे. (पूर्वार्ध)+आवड ओळखण्याची गरजप्रत्येक विद्यार्थी गुणवत्ताप्राप्त असावा, अशी अपेक्षा असते. परंतु, ते व्यवहारात कमालीचे यशस्वी झाले आहेत. अप्रगत विद्यार्थ्याला नाउमेद करता कामा नये. विद्यार्थ्यांचा कोणत्या कला-कौशल्याकडे कल आहे, त्याला कशाची आवड आहे, हे त्याला विश्वासात घेऊन शिक्षकांनी शक्य असल्यास संधी निर्माण करण्यास मदत करावी. वेळीच त्याच्या कमी ज्ञान असलेल्या विषयात थोडी काळजी घेतल्यास त्याचे भवितव्य उज्ज्वल होण्यास मदत होईल. अप्रगत विद्यार्थ्यांच्या विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.