शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

खरेदीसाठी रस्ते, दुकाने, मॉल फुल्ल : गर्दीमुळे नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:23 IST

कोल्हापूर : आगामी पंधरा दिवस राज्यात संचारबंदी राहणार असल्याने शहराच्या विविध बाजारपेठा, भाजी मंडई तसेच दुकाने, माॅलमध्ये बुधवारी दिवसभर ...

कोल्हापूर : आगामी पंधरा दिवस राज्यात संचारबंदी राहणार असल्याने शहराच्या विविध बाजारपेठा, भाजी मंडई तसेच दुकाने, माॅलमध्ये बुधवारी दिवसभर खरेदीसाठी जनसागर लोटला होता. लोकांनी अक्षरश: रांगा लावून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. मॉलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी तर चक्क तासभर प्रतीक्षा करावी लागली.

राज्यात आगामी पंधरा दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून सुरू झाली. गतवर्षी सलग दोन महिने झालेल्या संचारबंदीचा अनुभव असल्यामुळे, यावेळी गैरसोय होऊ नये म्हणून पंधरा दिवस पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य, भाजीपाला, कडधान्ये खरेदी करून ठेवण्याचा आटापिटा नागरिकांनी केला.

मंगळवारी रात्री संचारबंदीची घोषणा झाली, त्यामुळे बुधवारचा दिवस उजाडताच शहरातील बाजारपेठेत सकाळी नऊ वाजल्यापासूनच गर्दी व्हायला लागली. धान्य बाजार, मिरची बाजार, शिवाजी मार्केटमधील दुकानगाळे, शहरातील सर्वच भाजी मंडई गर्दीने फुलून गेल्या. पुढील पंधरा दिवस घरात बसून करता येणाऱ्या कामांच्या अनुषंगानेही खरेदी झाली. काहींनी लग्नाच्या निमित्ताने खरेदी केली. प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकडे अधिक कल होता. विविध प्रकारच्या बिस्किटांपासून ते विविध प्रकारचे बेकरी खाद्य, अंडी खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली.

महाद्वाररोड, ताराबाईरोड, कपिलतीर्थ मार्केट, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी पाच बंगला या परिसरात मोठी गर्दी उसळली होती. शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर विक्रेत्यांनी मांडलेल्या फळ बाजारातही खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. उपनगरांतील भाजी मंडईतूनही नागरिकांची गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही मोठ्या दुकानांतून तसेच मॉलमध्ये लोकांनी रांगा लावून खरेदी केली. रंकाळा व ताराबाई पार्क येथील मॉलमध्ये तर प्रवेश मिळविण्यासाठी तासभर प्रतीक्षा करावी लागत होती.

संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत मोडणारे पेट्रोलपंप सुरू राहणार आहेत. परंतु आपणाला बाहेर पडायची अडचण झाली, तर वाहनात पेट्रोल असलेले बरे, म्हणून अनेकांनी पेट्रोलची खरेदीही केली. काही पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या होत्या.

गावी जाण्याची धांदल

कोल्हापूर शहरात हॉटेलमध्ये काम करणारे, वेगवेगळ्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, पंधरा दिवस बसून कसे काढायचे? असे म्हणत आपल्या गावाचा रस्ता धरला. विशेषत: कोकणातून आलेले मजूर, कामगार यांनी त्यांच्या त्यांच्या गावास जाण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे एस.टी. गाड्याही प्रवाशांनी भरून गेल्या. तसेच पुणे, मुंबईसह अन्य शहरात काम करणाऱ्या मूळच्या कोल्हापूरकरांनी आपापल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. नोकरीनिमित्त बाहेरच्या जिल्ह्यात असलेले अनेक नागरिक कोल्हापुरात आपल्या घरी दाखल झाले आहेत.

(बाजारपेठ नावाने फोटो देत आहे)