शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

तांबूळवाडी ते लक्कीकट्टे दरम्यानचा रस्ताच गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:21 IST

तांबूळवाडी, बागिलगे, डुक्करवाडी, माणगाव, लक्कीकट्टे गावांच्या दरम्यान असलेल्या रस्त्यात पडलेल्या खड्डयांमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव ...

तांबूळवाडी, बागिलगे, डुक्करवाडी, माणगाव, लक्कीकट्टे गावांच्या दरम्यान असलेल्या रस्त्यात पडलेल्या खड्डयांमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित करण्याची मागणी प्रवासी व वाहनचालकांतून होत आहे. सहा वर्षांपूर्वी हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेतून झाला होता. त्यावेळीही या रस्त्याचे काम तत्कालीन ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केले होते.

नागरिकांच्या तक्रारीमुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात आली होती. पंतप्रधान व मुख्यमंत्री सडक योजनेतून झालेल्या रस्त्याची पाच वर्षे देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असते, असा बांधकाम खात्याचा नियम आहे.

मात्र, तांबूळवाडी ते माणगाव दरम्यानच्या पंतप्रधान सडक योजनेतून झालेल्या या रस्त्यावरील खड्डे त्या ठेकेदाराने एकदाही बुजविले नाहीत. त्यामुळे सद्य:स्थितीत या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरची खडीच गायब झाली आहे. त्यामुळे पूर्वी रस्ता होता का? असा सवाल वाहनधारकांतून होत आहे.

या नादुरुस्त रस्त्यावरून साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

हा रस्ता कायम दुर्लक्षित राहिला आहे. आजपर्यंत फक्त एक वेळ या रस्त्यावर दुरुस्तीचे काम झाले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने नवीन रस्ता होईपर्यंत किमान खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी उपसभापती मनीषा शिवणगेकर, सरपंच संजय पाटील (तांबूळवाडी), सरपंच राजू शिवणगेकर (डूक्करवाडी) यांनी केली आहे.