शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

रस्ते मूल्यांकनाचा अहवाल बुधवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2015 01:13 IST

काम अंतिम टप्प्यात : नोबेल कंपनी देणार ४९ कि़मी. रस्त्याच्या खर्चाचा ठोकताळा

कोल्हापूर : शहरातील रस्ते विकास प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या ४९ किलोमीटर्स रस्त्यांवर नेमका किती खर्च झाला आहे, याचा ठोकताळा असलेला अहवाल येत्या बुधवारी (२० मे) नोबेल कंपनी राज्य रस्ते विकास महामंडळाने नियुक्त केलेल्या मूल्यांकन समितीकडे सादर करणार आहे. रस्त्यांच्या मूल्यांकनाचे काम अंतिम टप्प्यात असून, अहवाल तयार करण्याचे काम रात्रं-दिवस सुरू असल्याचे सांगण्यात आले. टोलविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार कोल्हापूरचा टोल रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यासाठी फेरमूल्यांकनाचा निर्णय घेऊन रस्ते विकास महामंडळाचे सह. व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यांकन समिती नियुक्त केली आहे. या समितीने मूल्यांकन करण्यासाठी नोबेल कंपनीची नेमणूक केली आहे. २१ एप्रिलपासून ही कंपनी मूल्यांकनाचे काम करीत आहे. कंपनीला एक महिन्याची मुदत देण्यात आली असून, मूल्यांकनातील काही त्रूटी निदर्शनास आल्याने त्या दूर करण्यास सांगण्यात आल्या आहेत. मूल्यांकनाच्या कामात महानगरपालिका, आर्किटेक्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही मदत केली आहे. गेले महिनाभर रात्रं-दिवस मूल्यांकनाचे काम सुरू असून, ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. २० मे रोजी मूल्यांकनाचा ठोकताळा असलेला अहवाल मूल्यांकन समितीकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर तो रस्ते विकास महामंडळाकडे पाठविला जाईल. राज्य सरकारने ३१ मेपर्यंत कोल्हापूरचा टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)