शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

वाढत्या गुन्हेगारीमुळे वस्त्रनगरी हादरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST

अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे वस्त्रनगरी पुन्हा हादरली आहे. एका महिन्यात ३, ...

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे वस्त्रनगरी पुन्हा हादरली आहे. एका महिन्यात ३, तर गेल्या तीन महिन्यांत ५ खून झाले आहेत. त्यामुळे पोलिसांचा व कायद्याचा धाक कमी झाल्याची भावना शहरवासीयांतून व्यक्त होत आहे. या वाढत्या गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे मोठे आव्हान नूतन पोलीस अधिकाऱ्यांसमोर उभे ठाकले आहे, अन्यथा वस्त्रनगरी पुन्हा क्राईम नगरी बनण्यास वेळ लागणार नाही.

वस्त्रोद्योगनगरीत देशभरातील विविध राज्यांतून नागरिक कामानिमित्त येऊन राहिले आहेत. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, हळूहळू गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपले प्रस्थ वाढवत गुन्हेगारी टोळ्या तयार करून दहशत निर्माण करू लागले. त्याचे प्रमाण वाढत जाऊन मागील काही वर्षांत खून, खंडणी, प्राणघातक हल्ला, मारामारी, लूटमार अशा गंभीर घटना घडू लागल्या. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिस्तूल पोहोचवणारे तस्कर, मटकाकिंग, ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार, असे गुन्हेगारी प्रस्थ वाढत गेले. अवैध व्यवसायात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी खून करणे, त्याचा बदला घेण्यासाठी पुन्हा खून, असे सत्र वाढले. बघता-बघता वस्त्रनगरी क्राईम नगरी बनली. त्याचा येथील उद्योगांवरही विपरीत परिणाम होऊ लागला. वस्त्रोद्योगातील विविध कारखाने, त्यातील काम (खाते) घेण्यासाठी दादागिरी, हाणामारी, दहशत असे प्रकार घडू लागले.

या सर्वांवर वचक निर्माण करत यापूर्वीचे आयपीएस अधिकारी एस. चैतन्य व मानसिंह खोचे त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे व पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी उल्लेखनीय कामगिरी करत धाक ठेवला. दोन्ही वेळच्या अधिकाऱ्यांची कामाची पद्धत वेगवेगळी असली तरी शहर व परिसरातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्यात त्यांना यश आले होते. त्यातून शहरातील तब्बल १६ टोळ्यांना मोक्का लावून त्यातून सुमारे ९६ जण तुरुंगात आहेत. प्रमुख गुन्हेगारी टोळ्या व त्यांचे म्होरके आत असल्याने शहरात शांतता प्रस्थापित झाली होती; परंतु अलीकडे पुन्हा दुसऱ्या फळीतील गुन्हेगार आपले वर्चस्व निर्माण करत डोके वर काढत असल्याचा प्रकार सुरू आहे. दत्तनगर परिसरातील एका अल्पवयीनच्या टोळीतील काही सदस्य आजही त्या परिसरात आपली दहशत ठेवून आहेत. त्यामुळे गुन्हेगारांपेक्षा पोलिसांना आपला धाक वाढवावा लागणार आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय व गुन्हेगारी क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी नूतन अधिकाऱ्यांनी वचक निर्माण करण्याची गरज आहे.

चौकट

अधिकारी बदलले आणि गुन्हेगारी वाढली

शहर परिसरात गेल्या तीन महिन्यांत पाच खून झाले. त्यातील एक अद्याप उघडकीस आला नाही. त्याचबरोबर खंडणी, कारखान्यात घुसून मारहाण, चोऱ्या, घरफोड्या याचेही प्रमाण वाढले. मटका व गुटख्यावरही कारवाया सुरू आहेत; परंतु नियंत्रण नाही. या सर्व प्रकारामुळे शहरातील प्रमुख पोलीस अधिकारी बदलले आणि पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले, अशी चर्चा सुरू झाली आहे. याचा गांभीर्याने विचार करून नूतन अधिकाऱ्यांनी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर आपला धाक निर्माण करणे गरजेचे बनले आहे.