शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या गुन्हेगारीमुळे वस्त्रनगरी हादरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST

अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे वस्त्रनगरी पुन्हा हादरली आहे. एका महिन्यात ३, ...

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे वस्त्रनगरी पुन्हा हादरली आहे. एका महिन्यात ३, तर गेल्या तीन महिन्यांत ५ खून झाले आहेत. त्यामुळे पोलिसांचा व कायद्याचा धाक कमी झाल्याची भावना शहरवासीयांतून व्यक्त होत आहे. या वाढत्या गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे मोठे आव्हान नूतन पोलीस अधिकाऱ्यांसमोर उभे ठाकले आहे, अन्यथा वस्त्रनगरी पुन्हा क्राईम नगरी बनण्यास वेळ लागणार नाही.

वस्त्रोद्योगनगरीत देशभरातील विविध राज्यांतून नागरिक कामानिमित्त येऊन राहिले आहेत. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, हळूहळू गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपले प्रस्थ वाढवत गुन्हेगारी टोळ्या तयार करून दहशत निर्माण करू लागले. त्याचे प्रमाण वाढत जाऊन मागील काही वर्षांत खून, खंडणी, प्राणघातक हल्ला, मारामारी, लूटमार अशा गंभीर घटना घडू लागल्या. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिस्तूल पोहोचवणारे तस्कर, मटकाकिंग, ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार, असे गुन्हेगारी प्रस्थ वाढत गेले. अवैध व्यवसायात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी खून करणे, त्याचा बदला घेण्यासाठी पुन्हा खून, असे सत्र वाढले. बघता-बघता वस्त्रनगरी क्राईम नगरी बनली. त्याचा येथील उद्योगांवरही विपरीत परिणाम होऊ लागला. वस्त्रोद्योगातील विविध कारखाने, त्यातील काम (खाते) घेण्यासाठी दादागिरी, हाणामारी, दहशत असे प्रकार घडू लागले.

या सर्वांवर वचक निर्माण करत यापूर्वीचे आयपीएस अधिकारी एस. चैतन्य व मानसिंह खोचे त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे व पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी उल्लेखनीय कामगिरी करत धाक ठेवला. दोन्ही वेळच्या अधिकाऱ्यांची कामाची पद्धत वेगवेगळी असली तरी शहर व परिसरातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्यात त्यांना यश आले होते. त्यातून शहरातील तब्बल १६ टोळ्यांना मोक्का लावून त्यातून सुमारे ९६ जण तुरुंगात आहेत. प्रमुख गुन्हेगारी टोळ्या व त्यांचे म्होरके आत असल्याने शहरात शांतता प्रस्थापित झाली होती; परंतु अलीकडे पुन्हा दुसऱ्या फळीतील गुन्हेगार आपले वर्चस्व निर्माण करत डोके वर काढत असल्याचा प्रकार सुरू आहे. दत्तनगर परिसरातील एका अल्पवयीनच्या टोळीतील काही सदस्य आजही त्या परिसरात आपली दहशत ठेवून आहेत. त्यामुळे गुन्हेगारांपेक्षा पोलिसांना आपला धाक वाढवावा लागणार आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय व गुन्हेगारी क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी नूतन अधिकाऱ्यांनी वचक निर्माण करण्याची गरज आहे.

चौकट

अधिकारी बदलले आणि गुन्हेगारी वाढली

शहर परिसरात गेल्या तीन महिन्यांत पाच खून झाले. त्यातील एक अद्याप उघडकीस आला नाही. त्याचबरोबर खंडणी, कारखान्यात घुसून मारहाण, चोऱ्या, घरफोड्या याचेही प्रमाण वाढले. मटका व गुटख्यावरही कारवाया सुरू आहेत; परंतु नियंत्रण नाही. या सर्व प्रकारामुळे शहरातील प्रमुख पोलीस अधिकारी बदलले आणि पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले, अशी चर्चा सुरू झाली आहे. याचा गांभीर्याने विचार करून नूतन अधिकाऱ्यांनी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर आपला धाक निर्माण करणे गरजेचे बनले आहे.