शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

पावसाची पुन्हा रिमझीम हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:19 IST

कोल्हापूर : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी पावसाने जिल्हाभर रिमझीम हजेरी लावली. पावसात फारसा जोर नसलातरी दिवसभर हवेत गारवा कायम ...

कोल्हापूर : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी पावसाने जिल्हाभर रिमझीम हजेरी लावली. पावसात फारसा जोर नसलातरी दिवसभर हवेत गारवा कायम होता. दरम्यान पुढील आठवडाभर पावसाच्या अनियमिततेचा अनुभव येणार असून बऱ्यापैकी दडीच मारणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

कोल्हापुरात मागील आठवड्यात अक्षरश: वीट येइपर्यंत पाऊस पडल्यानंतर एकदम कडकडीत ऊन पडू लागल्याने बऱ्यापैकी व्यवहार सुरळीत होत होते. शिवारातही आंतरमशागतीच्या कामांनी वेग घेतला होता. पण बुधवारपासून परत काहीसा वातावरणात बदल जाणवत होता. दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, गुरुवारीदेखील अगदी सकाळपासून पावसाच्या किरकोळ सरींनी हजेरी लावली. त्यानंतर दिवसभर अधूनमधून भूरभूर सुरु राहिली. संध्याकाळपासून मात्र जोरदार सरी आल्या.

दरम्यान धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वेगाने घट होत आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी एका दिवसात तीन फुटांनी उतरली. नदीपात्रातील बंधारेही वेगाने खुले होऊ लागले आहेत. बुधवारी सात बंधारे पाण्याखाली होते. गुरुवारी ही संख्या दोनवर आली. पंचगंगा नदीवरील रुई आणि इचलकरंजी हे दोनच बंधारे पाण्याखाली आहेत, राजाराम बंधारा खुला झाला आहे, पण बंधाऱ्यावरील स्लॅब वाहून गेल्याने वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे.

प्रमुख धरणातील पाणीसाठा

धरण टक्केवारी

राधानगरी ३३

तुळशी ४९

वारणा ४२

काळम्मावाडी ३५