शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

डाव्यांच्या बेइमानीमुळे उजवे माजले : राजन खान

By admin | Updated: January 18, 2016 23:49 IST

नामोल्लेख टाळून टीका

कोल्हापूर : डाव्यांनी वेळोवेळी बेइमानी केल्यानेच उजवे माजलेत. डाव्यांचे वलय नाहीसे झाल्यानेच उजव्यांनी मारलेल्या गोळ्यांनी हत्या होत आहेत, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी रविवारी व्यक्त केले. राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये आयोजित बहुभाषिक राष्ट्रीय परिषदेत ‘अभिव्यक्ती के सारे खतरे उठाने पडेंगे’ या विषयावर ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डाव्या विचारसरणीच्या व्यासपीठावरून खान यांनी डाव्यांच्या चुकीच्या मानसिकतेवर अतिशय जहाल शब्दांत प्रहार केला. खान म्हणाले, बहुतांश समाजवादी आणि डाव्या लोकांत ढोंगीपणा दिसतो. सत्तेच्या आणि खुर्चीच्या लालसेपोटी डावे तत्त्वे गुंडाळून ठेवून उजव्यांच्या वळचणीला गेल्याचा इतिहास आहे. ते विखुरले, विस्कळीत झाले. याउलट उजवे कट्टर राहिले. ते जात, धर्म, लिंग या अजेंड्यावर राजकारण आणि समाजकारण यशस्वी करीत राहिले. अशा टप्प्यात डाव्या विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येऊन चळवळ बळकट करणे गरजेचे होते. आता तरी डाव्यांनी कट्टर राहायला हवे. डावे मीच शहाणा आहे, असे समजत असतात. हे बदलायला हवे. जाहीर व्यासपीठावर बोलायचे एक आणि व्यवहारात वागायचे दुसरे, अशी प्रवृत्ती बंद करायला पाहिले. शाळेच्या दाखल्यात जात नोंद असते. कोणत्या जातीच्या लोकांची संस्था असते, त्यानुसार देवदेवतांच्या प्रतिमा त्या शाळेत लावलेल्या असतात. त्यामुळे सर्वच शाळा आणि शासन जातीयवादी आहेत. माणूस म्हणून नवी समाजव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. सर्व जाती सर्वश्रेष्ठ आहेत, असे म्हटल्यानंतर एक जात दुसऱ्यावर कुरघोडी करीतच राहील. प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, राज्यघटनेनुसार देश चालतो; धर्मसंसदेनुसार नाही, हे सांगण्याची वेळ आली आहे. राज्यकर्त्यांच्या भेकड, कचखाऊ भूमिकेमुळे अ‍ॅड. गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रा. कलबुर्गी अशा पृथ्वीमोलाच्या माणसांची हत्या होऊनही दोषींना कडक शासन होत नाही. अशा प्रकारे हत्या करून विवेकाचा गळा दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. महात्मा फुले यांनी मांडलेल्या समाजव्यवस्थेची अंमलबजावणी झाली पाहिजे. प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डी. सी. तुलशीकट्टी, डॉ. सिंधू आवळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मेघा पानसरे, डॉ. राजू पोतदार, वसंत पाटील, राजा शिरगुप्पे उपस्थित होते. कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे सचिव गणेश ठाकूर, डॉ. टी. एस. पाटील, आदी उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात डॉ. गजानन चव्हाण, राजा शिरगुप्पे, धनाजी गुरव तर तिसऱ्या सत्रात प्राचार्य आनंद मेणसे, डॉ. राजन राव, दादासाहेब सनदी, प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी मार्गदर्शन केले. शेवटी शाहीर आझाद नायकवाडी, गौतम कांबळे, थळेंद्र लोखंडे, बाबासाहेब नदाफ यांचा शाहिरी कार्यक्रम झाला. नामोल्लेख टाळून टीकाआंबेडकरांचा विचार सांगत राजकारण करणारे सत्तेसाठी ‘मातोश्री’वर लोटांगण घालतात. त्यावेळी त्यांच्यातील निष्ठा जाते कोठे, असा सवाल उपस्थित होतो, असा रामदास आठवले यांचा नामोल्लेख टाळून खान यांनी आरोप केला.