शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्रचनेत वगळलेल्या गावांचा प्रस्थापितांना झटका

By admin | Updated: September 26, 2014 00:24 IST

शिरोळ तालुक्याचा गठ्ठा वगळला : इचलकरंजीलगतच्या ८५ हजार मतदारांचा समावेश

दत्ता बीडकर --हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून १९५२ ते ६७ पर्यंत एक सर्वसाधारण आणि दुसरा अनु. जाती (राखीव) असे दोन आमदार विधानसभेवर पाठविले जात होते. १९६७च्या पुनर्रचनेत वडगाव (राखीव) मतदारसंघ तयार झाला. या पुनर्रचनेत शिरोळ तालुक्यातील आठ गावांचा समावेश वडगावमध्ये झाला. याचा फायदा नेहमी काँग्रेस पक्षाला झाला. पुन्हा २००९ ला हा मतदारसंघ तालुक्याच्या नावाने पुनर्रचित झाला. हातकणंगले (राखीव) मतदारसंघ तयार होत असताना शिरोळ तालुक्यातील आठ गावे वगळून इचलकरंजी मतदारसंघातील १३ गावांचा समावेश झाला. मात्र, काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फायदा जनसुराज्य आणि शिवसेनेने उठविला.हातकणंगले तालुक्यामध्ये १९५२ला विधानसभा १ आणि २ असे दोन मतदारसंघ होते. सर्वसाधारण गटातून बाबासाहेब खंजिरे, तर राखीव गटातून दत्तात्रय शामराव पवार हे काँग्रेस पक्षाचे आमदार विजयी झाले. १९५७ला मात्र सरकार विरोधी लाटेत या मतदारसंघातून कॉ. संतराम पाटील आणि शेकापचे दादासाहेब शिर्के निवडून आले. १९६२च्या निवडणुकीत तालुक्यात रत्नाप्पाण्णा कुंभार गटाचा उदय झाला आणि या मतदारसंघात मिणचे गावचे मातंग गुरुजी अर्थात केशव नरसिंह घाटगे काँग्रेस पक्षाचे आमदार झाले. १९६७ला वडगाव विधानसभेचा मतदारसंघ पुनर्रचित झाला. यामध्ये शिरोळ तालुक्यातील दानोळी, कोथळी, निमशिरगाव, कवठेसार, तमदलगे, चिप्री, जैनापूर, उमळवाड या आठ गावांचा समावेश झाला. रत्नाप्पाण्णा कुंभार यांना मानणारी आणि पंचगंगा कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या आठ गावांमुळे १९६७ ला या मतदारसंघात चुरस निर्माण झाली. काँग्रेसकडून केशव घाटगे (मातंग गुरुजी) यांना पेठवडगावच्या यादव घराण्याने मोठे आव्हान निर्माण केले. यावेळी दलित कुटुंबातील दत्तकपुत्राचा वाद चांगलाच गाजला. १९८० च्या मध्यावधी निवडणुकीपासून १९९९च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सलग पाचवेळा काँग्रेसच्या जयवंतराव आवळे यांनी या वडगाव (राखीव) मतदारसंघाचे नेतृत्व केले. २००४च्या विधानसभा निवडणुकीत विनय कोरे यांच्या नवख्या जनसुराज्य पक्षाचे राजीव आवळे यांनी वारणा पट्ट्याच्या एकगठ्ठा मतावर पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचा पराभव करत जनसुराज्यचा झेंडा फडकविला. जनसुराज्य पक्षाला लोकनेते खा. बाळासाहेब माने, कल्लाप्पाण्णा आवाडे आणि महादेवराव महाडिक गटाचा छुपा पाठिंबा मिळाला होता. प्रथमच मतदारसंघात काँग्रेसअंतर्गत धुसफुसीचे राजकारण झाले. समाजकल्याण मंत्रिपदावर असतानाही जयवंतराव आवळेंचा पराभव झाला.२००९च्या निवडणुकीत पुन्हा या मतदारसंघाची पुनर्रचना झाली. शिरोळ तालुक्यातील आठ गावे वगळण्यात आली, तर इचलकरंजी मतदारसंघातील माणगाव, माणगाववाडी, साजणी, तिळवणी, रुई, पट्टणकोडोली, इंगळी, हुपरी, तळदंगे, रेंदाळ, रांगोळी आणि जंगमवाडी अशी १३ गावे जोडून हातकणंगले (राखीव) मतदारसंघ तयार झाला. शिरोळ तालुक्यातील आठ गावांतील ४२,४०० मते कमी झाली, तर १३ गावांतील ८० ते ८५ हजार मते वाढली. या मतदासंघात १३ गावे इचलकरंजी शहरालगतची असल्यामुळे प्रकाश आवाडे गटाला मानणारे जैन, लिंगायत आणि बहुजन मतदार मोठ्या संख्येने होते. जयवंतराव आवळे लातूरचे खासदार असल्यामुळे त्यांनी आपले पुत्र राजू आवळे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली. जनसुराज्यने राजीव आवळे यांना पुन्हा रिंगणात उतरविले. ‘स्वाभिमानी’ने दत्ता घाटगेंना उभे केले. कुरघोडीमुळे आवाडे गटाने जनसुराज्यला मदत केली. मिरज दंगलीचा फायदा घेत प्रथमच (राखीव) मतदारसंघात शिवसेनेने सुजित मिणचेकर यांना विजयी करत भगवा फडकविला. हातकणंगले-राजकीयभूगोल