शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

पुनर्रचनेत वगळलेल्या गावांचा प्रस्थापितांना झटका

By admin | Updated: September 26, 2014 00:24 IST

शिरोळ तालुक्याचा गठ्ठा वगळला : इचलकरंजीलगतच्या ८५ हजार मतदारांचा समावेश

दत्ता बीडकर --हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून १९५२ ते ६७ पर्यंत एक सर्वसाधारण आणि दुसरा अनु. जाती (राखीव) असे दोन आमदार विधानसभेवर पाठविले जात होते. १९६७च्या पुनर्रचनेत वडगाव (राखीव) मतदारसंघ तयार झाला. या पुनर्रचनेत शिरोळ तालुक्यातील आठ गावांचा समावेश वडगावमध्ये झाला. याचा फायदा नेहमी काँग्रेस पक्षाला झाला. पुन्हा २००९ ला हा मतदारसंघ तालुक्याच्या नावाने पुनर्रचित झाला. हातकणंगले (राखीव) मतदारसंघ तयार होत असताना शिरोळ तालुक्यातील आठ गावे वगळून इचलकरंजी मतदारसंघातील १३ गावांचा समावेश झाला. मात्र, काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फायदा जनसुराज्य आणि शिवसेनेने उठविला.हातकणंगले तालुक्यामध्ये १९५२ला विधानसभा १ आणि २ असे दोन मतदारसंघ होते. सर्वसाधारण गटातून बाबासाहेब खंजिरे, तर राखीव गटातून दत्तात्रय शामराव पवार हे काँग्रेस पक्षाचे आमदार विजयी झाले. १९५७ला मात्र सरकार विरोधी लाटेत या मतदारसंघातून कॉ. संतराम पाटील आणि शेकापचे दादासाहेब शिर्के निवडून आले. १९६२च्या निवडणुकीत तालुक्यात रत्नाप्पाण्णा कुंभार गटाचा उदय झाला आणि या मतदारसंघात मिणचे गावचे मातंग गुरुजी अर्थात केशव नरसिंह घाटगे काँग्रेस पक्षाचे आमदार झाले. १९६७ला वडगाव विधानसभेचा मतदारसंघ पुनर्रचित झाला. यामध्ये शिरोळ तालुक्यातील दानोळी, कोथळी, निमशिरगाव, कवठेसार, तमदलगे, चिप्री, जैनापूर, उमळवाड या आठ गावांचा समावेश झाला. रत्नाप्पाण्णा कुंभार यांना मानणारी आणि पंचगंगा कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या आठ गावांमुळे १९६७ ला या मतदारसंघात चुरस निर्माण झाली. काँग्रेसकडून केशव घाटगे (मातंग गुरुजी) यांना पेठवडगावच्या यादव घराण्याने मोठे आव्हान निर्माण केले. यावेळी दलित कुटुंबातील दत्तकपुत्राचा वाद चांगलाच गाजला. १९८० च्या मध्यावधी निवडणुकीपासून १९९९च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सलग पाचवेळा काँग्रेसच्या जयवंतराव आवळे यांनी या वडगाव (राखीव) मतदारसंघाचे नेतृत्व केले. २००४च्या विधानसभा निवडणुकीत विनय कोरे यांच्या नवख्या जनसुराज्य पक्षाचे राजीव आवळे यांनी वारणा पट्ट्याच्या एकगठ्ठा मतावर पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचा पराभव करत जनसुराज्यचा झेंडा फडकविला. जनसुराज्य पक्षाला लोकनेते खा. बाळासाहेब माने, कल्लाप्पाण्णा आवाडे आणि महादेवराव महाडिक गटाचा छुपा पाठिंबा मिळाला होता. प्रथमच मतदारसंघात काँग्रेसअंतर्गत धुसफुसीचे राजकारण झाले. समाजकल्याण मंत्रिपदावर असतानाही जयवंतराव आवळेंचा पराभव झाला.२००९च्या निवडणुकीत पुन्हा या मतदारसंघाची पुनर्रचना झाली. शिरोळ तालुक्यातील आठ गावे वगळण्यात आली, तर इचलकरंजी मतदारसंघातील माणगाव, माणगाववाडी, साजणी, तिळवणी, रुई, पट्टणकोडोली, इंगळी, हुपरी, तळदंगे, रेंदाळ, रांगोळी आणि जंगमवाडी अशी १३ गावे जोडून हातकणंगले (राखीव) मतदारसंघ तयार झाला. शिरोळ तालुक्यातील आठ गावांतील ४२,४०० मते कमी झाली, तर १३ गावांतील ८० ते ८५ हजार मते वाढली. या मतदासंघात १३ गावे इचलकरंजी शहरालगतची असल्यामुळे प्रकाश आवाडे गटाला मानणारे जैन, लिंगायत आणि बहुजन मतदार मोठ्या संख्येने होते. जयवंतराव आवळे लातूरचे खासदार असल्यामुळे त्यांनी आपले पुत्र राजू आवळे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली. जनसुराज्यने राजीव आवळे यांना पुन्हा रिंगणात उतरविले. ‘स्वाभिमानी’ने दत्ता घाटगेंना उभे केले. कुरघोडीमुळे आवाडे गटाने जनसुराज्यला मदत केली. मिरज दंगलीचा फायदा घेत प्रथमच (राखीव) मतदारसंघात शिवसेनेने सुजित मिणचेकर यांना विजयी करत भगवा फडकविला. हातकणंगले-राजकीयभूगोल