शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्रचनेत वगळलेल्या गावांचा प्रस्थापितांना झटका

By admin | Updated: September 26, 2014 00:24 IST

शिरोळ तालुक्याचा गठ्ठा वगळला : इचलकरंजीलगतच्या ८५ हजार मतदारांचा समावेश

दत्ता बीडकर --हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून १९५२ ते ६७ पर्यंत एक सर्वसाधारण आणि दुसरा अनु. जाती (राखीव) असे दोन आमदार विधानसभेवर पाठविले जात होते. १९६७च्या पुनर्रचनेत वडगाव (राखीव) मतदारसंघ तयार झाला. या पुनर्रचनेत शिरोळ तालुक्यातील आठ गावांचा समावेश वडगावमध्ये झाला. याचा फायदा नेहमी काँग्रेस पक्षाला झाला. पुन्हा २००९ ला हा मतदारसंघ तालुक्याच्या नावाने पुनर्रचित झाला. हातकणंगले (राखीव) मतदारसंघ तयार होत असताना शिरोळ तालुक्यातील आठ गावे वगळून इचलकरंजी मतदारसंघातील १३ गावांचा समावेश झाला. मात्र, काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फायदा जनसुराज्य आणि शिवसेनेने उठविला.हातकणंगले तालुक्यामध्ये १९५२ला विधानसभा १ आणि २ असे दोन मतदारसंघ होते. सर्वसाधारण गटातून बाबासाहेब खंजिरे, तर राखीव गटातून दत्तात्रय शामराव पवार हे काँग्रेस पक्षाचे आमदार विजयी झाले. १९५७ला मात्र सरकार विरोधी लाटेत या मतदारसंघातून कॉ. संतराम पाटील आणि शेकापचे दादासाहेब शिर्के निवडून आले. १९६२च्या निवडणुकीत तालुक्यात रत्नाप्पाण्णा कुंभार गटाचा उदय झाला आणि या मतदारसंघात मिणचे गावचे मातंग गुरुजी अर्थात केशव नरसिंह घाटगे काँग्रेस पक्षाचे आमदार झाले. १९६७ला वडगाव विधानसभेचा मतदारसंघ पुनर्रचित झाला. यामध्ये शिरोळ तालुक्यातील दानोळी, कोथळी, निमशिरगाव, कवठेसार, तमदलगे, चिप्री, जैनापूर, उमळवाड या आठ गावांचा समावेश झाला. रत्नाप्पाण्णा कुंभार यांना मानणारी आणि पंचगंगा कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या आठ गावांमुळे १९६७ ला या मतदारसंघात चुरस निर्माण झाली. काँग्रेसकडून केशव घाटगे (मातंग गुरुजी) यांना पेठवडगावच्या यादव घराण्याने मोठे आव्हान निर्माण केले. यावेळी दलित कुटुंबातील दत्तकपुत्राचा वाद चांगलाच गाजला. १९८० च्या मध्यावधी निवडणुकीपासून १९९९च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सलग पाचवेळा काँग्रेसच्या जयवंतराव आवळे यांनी या वडगाव (राखीव) मतदारसंघाचे नेतृत्व केले. २००४च्या विधानसभा निवडणुकीत विनय कोरे यांच्या नवख्या जनसुराज्य पक्षाचे राजीव आवळे यांनी वारणा पट्ट्याच्या एकगठ्ठा मतावर पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचा पराभव करत जनसुराज्यचा झेंडा फडकविला. जनसुराज्य पक्षाला लोकनेते खा. बाळासाहेब माने, कल्लाप्पाण्णा आवाडे आणि महादेवराव महाडिक गटाचा छुपा पाठिंबा मिळाला होता. प्रथमच मतदारसंघात काँग्रेसअंतर्गत धुसफुसीचे राजकारण झाले. समाजकल्याण मंत्रिपदावर असतानाही जयवंतराव आवळेंचा पराभव झाला.२००९च्या निवडणुकीत पुन्हा या मतदारसंघाची पुनर्रचना झाली. शिरोळ तालुक्यातील आठ गावे वगळण्यात आली, तर इचलकरंजी मतदारसंघातील माणगाव, माणगाववाडी, साजणी, तिळवणी, रुई, पट्टणकोडोली, इंगळी, हुपरी, तळदंगे, रेंदाळ, रांगोळी आणि जंगमवाडी अशी १३ गावे जोडून हातकणंगले (राखीव) मतदारसंघ तयार झाला. शिरोळ तालुक्यातील आठ गावांतील ४२,४०० मते कमी झाली, तर १३ गावांतील ८० ते ८५ हजार मते वाढली. या मतदासंघात १३ गावे इचलकरंजी शहरालगतची असल्यामुळे प्रकाश आवाडे गटाला मानणारे जैन, लिंगायत आणि बहुजन मतदार मोठ्या संख्येने होते. जयवंतराव आवळे लातूरचे खासदार असल्यामुळे त्यांनी आपले पुत्र राजू आवळे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली. जनसुराज्यने राजीव आवळे यांना पुन्हा रिंगणात उतरविले. ‘स्वाभिमानी’ने दत्ता घाटगेंना उभे केले. कुरघोडीमुळे आवाडे गटाने जनसुराज्यला मदत केली. मिरज दंगलीचा फायदा घेत प्रथमच (राखीव) मतदारसंघात शिवसेनेने सुजित मिणचेकर यांना विजयी करत भगवा फडकविला. हातकणंगले-राजकीयभूगोल