शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

कोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार निधीअभावी रखडला

By admin | Updated: April 27, 2015 00:15 IST

बहिरेश्वर गावचे ग्रामदैवत : १६ वर्षे काम प्रलंबित, ग्रामस्थांतून नाराजी

शिवराज लोंढे -सावरवाडी पांडवकालीन प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अन् राज्य शासनाने तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा दिलेल्या बहिरेश्वर (ता. करवीर) गावच्या प्राचीन कोटेश्वर ग्रामदैवत मंदिराचा निधीअभावी गेली १६ वर्षे जीर्णोद्धार रखडलेला आहे. बहिरेश्वर गावच्या मध्यवर्ती ठिकाणी हे प्राचीन कोटेश्वर मंदिर आहे. अकराव्या शतकाची साक्ष देणाऱ्या या मंदिराचे बांधकाम दगडी आहे. दगडी पाषाणावर कोरीव लेण्यांच्या देवदेवतांच्या मूर्ती आहेत. प्राचीन कालखंडातील एक पवित्र स्थान म्हणून या मंदिराची ख्याती आहे. राज्य शासनाने कोटेश्वर मंदिरास तीर्थक्षेत्र ‘क’ दर्जा दिला असून, मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम मात्र शासकीय निधीअभावी रखडले गेले. ग्रामपंचायतीतर्फे अनेकवेळा निवेदन देऊनही दुर्लक्ष झाले आहे. नव्या बदलत्या काळात नव्या पिढीला प्राचीन ऐतिहासिक वास्तुचा ठेवा जपून ठेवण्यासाठी या मंदिराचे नव्याने बांधकाम होणे गरजेचे आहे. मंदिराच्या सभोवती दगडी संरक्षण भिंती असून, त्यामध्ये दगडी कोरीव लेण्यांच्या मूर्ती दुरवस्थेत सापडल्या आहेत. संरक्षण भिंतीच्या झालेल्या पडझडीमुळे पाळीव जनावरांचा मंदिरात वावर होत आहे.मंदिरात प्राचीन ऐतिहासिक मूर्ती असून, त्यांची जपणूक होत नाही. अनेक मूर्ती चोरीस गेल्या आहेत. बहिरेश्वर गावात गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक सांस्कृतीचा वारसा जपलेला आहे. श्रावण महिन्यात श्रीकृष्ण यात्रा, दसरा महोत्सव व भव्य हरिनाम सप्ताह सोहळा या मंदिर परिसरात साजरे होतात. पालखी सोहळ्यावेळी अनेक समस्यांना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागते. ग्रामपंचायतीतर्फे कोटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचा ४० लाख रुपयांचा आराखडा तयार आहे. मात्र, निधीअभावी जीर्णोद्धार थंडावला आहे. कोटेश्वर ग्राममंदिर अकराव्या शतकातील असून, लोकप्रतिनिधींकडून शासकीय निधीसाठी पाठपुरावा केला जात नाही. निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करावेत. - संभाजी बचाटे, सामाजिक कार्यकर्ते