शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

सर्वोच्च न्यायालयाची आरक्षणाची ५० टक्केची अट रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:18 IST

कोल्हापूर : आरक्षणासाठीची ५० टक्केची सर्वोच्च न्यायालयाने घातलेली अटच ९० टक्के कमकुवत वर्गाला आरक्षणाचे लाभ मिळण्यापासून वंचित ठेवत असल्याने ...

कोल्हापूर : आरक्षणासाठीची ५० टक्केची सर्वोच्च न्यायालयाने घातलेली अटच ९० टक्के कमकुवत वर्गाला आरक्षणाचे लाभ मिळण्यापासून वंचित ठेवत असल्याने ही अटच रद्द करावी, अशी मागणी लाल निशाण पक्षाने केली आहे. मराठा आरक्षण लढ्यात खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेचे पक्षाकडून स्वागत करण्यात आले आहे.

लाल निशाण पक्षाचे अतुल दिघे, सुधाकर सावंत, प्रकाश जाधव, सुवर्णा तळेकर, उमेश देसाई, संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकार बैठक घेऊन आरक्षणाच्या बाबतीतील भूमिका मांडली. दिघे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण हा अपवाद असून खुल्या जागा हा नियम आहे, या केलेल्या टिप्पणीवर आमचा आक्षेप आहे. न्यायालयाच्या या भूमिकेने ९० टक्के समाजाचे आरक्षण नाकारले गेले आहे. सामाजिक सांस्कृतिक जडघडण पाहिली तर ९० टक्के समाज हा शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. अशा परिस्थितीत त्यांना आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे.

मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसडणे हे ओबीसी व मराठा समाजावर अन्याय करण्यासारखे आहे. त्यामुळे हा समाज लोकसंख्येच्या ३५ टक्के असल्याने त्याच्या प्रगतीसाठी म्हणून आरक्षण देणे मराठा समाजाला स्वतंत्रच आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी असल्याचेही दिघे यांनी सांगितले. हे आरक्षण सध्याच्या कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याने ५० टक्के आरक्षणाची अट काढण्यासाठी स्वतंत्र कायद्याची तरतूद करावी, अशी सूचनाही दिघे यांनी केली.