शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाची आरक्षणाची ५० टक्केची अट रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:18 IST

कोल्हापूर : आरक्षणासाठीची ५० टक्केची सर्वोच्च न्यायालयाने घातलेली अटच ९० टक्के कमकुवत वर्गाला आरक्षणाचे लाभ मिळण्यापासून वंचित ठेवत असल्याने ...

कोल्हापूर : आरक्षणासाठीची ५० टक्केची सर्वोच्च न्यायालयाने घातलेली अटच ९० टक्के कमकुवत वर्गाला आरक्षणाचे लाभ मिळण्यापासून वंचित ठेवत असल्याने ही अटच रद्द करावी, अशी मागणी लाल निशाण पक्षाने केली आहे. मराठा आरक्षण लढ्यात खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेचे पक्षाकडून स्वागत करण्यात आले आहे.

लाल निशाण पक्षाचे अतुल दिघे, सुधाकर सावंत, प्रकाश जाधव, सुवर्णा तळेकर, उमेश देसाई, संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकार बैठक घेऊन आरक्षणाच्या बाबतीतील भूमिका मांडली. दिघे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण हा अपवाद असून खुल्या जागा हा नियम आहे, या केलेल्या टिप्पणीवर आमचा आक्षेप आहे. न्यायालयाच्या या भूमिकेने ९० टक्के समाजाचे आरक्षण नाकारले गेले आहे. सामाजिक सांस्कृतिक जडघडण पाहिली तर ९० टक्के समाज हा शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. अशा परिस्थितीत त्यांना आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे.

मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसडणे हे ओबीसी व मराठा समाजावर अन्याय करण्यासारखे आहे. त्यामुळे हा समाज लोकसंख्येच्या ३५ टक्के असल्याने त्याच्या प्रगतीसाठी म्हणून आरक्षण देणे मराठा समाजाला स्वतंत्रच आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी असल्याचेही दिघे यांनी सांगितले. हे आरक्षण सध्याच्या कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याने ५० टक्के आरक्षणाची अट काढण्यासाठी स्वतंत्र कायद्याची तरतूद करावी, अशी सूचनाही दिघे यांनी केली.