शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

राज्यातील २८ लाख शेतकऱ्यांना दिलासा

By admin | Updated: June 17, 2014 01:50 IST

दंड, दंडव्याजही माफ : वीज थकबाकीची निम्मी रक्कम होणार माफ

कोल्हापूर : राज्यातील २८ लाख वीज थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज बिलाची ५० टक्के रक्कम माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर नियमित वीज बिल भरणाऱ्या दहा लाख शेतकऱ्यांना त्यांच्या पुढच्या सहा महिन्यांत येणाऱ्या वीज बिलात पन्नास टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच घेतला असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, राज्यात ३८ लाख कृषिपंपधारक शेतकरी आहेत. त्यातील २८ लाख शेतकरी थकबाकीत आहेत. ११ हजार कोटींची ही थकबाकी आहे. त्यामध्ये पाच हजार कोटी ही केवळ मुद्दल, तर सहा हजार कोटीचा दंड, दंड व्याज आणि सरचार्ज यांचा समावेश आहे. त्यामुळे सहा हजार कोटींची रक्कम ही महावितरण माफ करणार आहे, तर राहिलेली वीज बिलाच्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. त्यासाठी त्यांना हप्तेही ठरवून देण्यात आले आहेत. वीज वितरण व्यवस्थेत यावर्षी खूपच सुधारणा करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना आठ तास पूर्ण दाबाने शेतकऱ्यांना वीजपुरवठा होणार आहे. काही ठिकाणी ती १६ तासही दिली जाईल. जर एखाद्या ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर जळला तर तो तीन दिवसांत दिला पाहिजे, असे आदेशच सरकारने ‘महावितरण’ला दिले आहेत, असे मंत्री पाटील म्हणाले. महावितरणच्या ‘इन्फ्रा २’ या योजनेंतर्गत राज्यात ८६०० कोटींची कामे सुरू झाली आहेत. येत्या दोन महिन्यांत ही सर्व कामे पूर्णत्वास जातील, अशी माहितीही मंत्री पाटील यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)