शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २८ लाख शेतकऱ्यांना दिलासा

By admin | Updated: June 17, 2014 01:50 IST

दंड, दंडव्याजही माफ : वीज थकबाकीची निम्मी रक्कम होणार माफ

कोल्हापूर : राज्यातील २८ लाख वीज थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज बिलाची ५० टक्के रक्कम माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर नियमित वीज बिल भरणाऱ्या दहा लाख शेतकऱ्यांना त्यांच्या पुढच्या सहा महिन्यांत येणाऱ्या वीज बिलात पन्नास टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच घेतला असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, राज्यात ३८ लाख कृषिपंपधारक शेतकरी आहेत. त्यातील २८ लाख शेतकरी थकबाकीत आहेत. ११ हजार कोटींची ही थकबाकी आहे. त्यामध्ये पाच हजार कोटी ही केवळ मुद्दल, तर सहा हजार कोटीचा दंड, दंड व्याज आणि सरचार्ज यांचा समावेश आहे. त्यामुळे सहा हजार कोटींची रक्कम ही महावितरण माफ करणार आहे, तर राहिलेली वीज बिलाच्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. त्यासाठी त्यांना हप्तेही ठरवून देण्यात आले आहेत. वीज वितरण व्यवस्थेत यावर्षी खूपच सुधारणा करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना आठ तास पूर्ण दाबाने शेतकऱ्यांना वीजपुरवठा होणार आहे. काही ठिकाणी ती १६ तासही दिली जाईल. जर एखाद्या ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर जळला तर तो तीन दिवसांत दिला पाहिजे, असे आदेशच सरकारने ‘महावितरण’ला दिले आहेत, असे मंत्री पाटील म्हणाले. महावितरणच्या ‘इन्फ्रा २’ या योजनेंतर्गत राज्यात ८६०० कोटींची कामे सुरू झाली आहेत. येत्या दोन महिन्यांत ही सर्व कामे पूर्णत्वास जातील, अशी माहितीही मंत्री पाटील यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)