शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

‘त्या’ १९ नगरसेवकांना दिलासा

By admin | Updated: February 14, 2017 00:54 IST

जातवैधता प्रमाणपत्र; उच्च न्यायालयाच्या निकालास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

कोल्हापूर : स्वत:च्या जातीचे वैधता प्रमाणपत्र निवडणूक आयोगास मुदतीत सादर न करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांवर क ारवाई म्हणून त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सोमवारी सर्वोच्च न्यायालयात स्थागिती देण्यात आली. या खटल्यात न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली असून पुढील सुनावणीवेळी म्हणणे मांडण्यास बजावले आहे. या स्थगितीमुळे नगरसेवकांना दिलासा मिळाले आहे. उच्च न्यायालयाच्या निकालास आव्हान देणारी याचिका महापौर हसिना फरास यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ३ फेबु्रवारीला याचिका दाखल करून घेत सोमवारी त्यावर सुनावणी घेतली. फरास यांचे वकील कपिल सिब्बल अन्य एका खटल्याच्या सुनावणीत अडकल्यामुळे त्यांच्या अपरोक्ष अ‍ॅड. मयांक पांडे यांनी न्यायमूर्ती गोगोई व न्यायमूर्ती पंत यांच्यासमोर युक्तिवाद मांडला. अशाच प्रकारच्या एका प्रकरणात न्यायालयाने स्थगिती दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. राज्य सरकारला अद्याप नोटीस देण्यात आलेली नाही, ती द्यावी आणि सरकारचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती न्यायालयाने मान्य केली. सुनावणीवेळी राज्य सरकारला नोटीस काढून त्यांचे म्हणणे सादर करण्यास न्यायालयाने बजावले तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालास स्थागिती दिली. पुढील सुनावणी मार्च महिन्यात होणार असून तारीख निश्चित झालेली नाही. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक १ नोव्हेंबर २०१५ रोजी पार पडली. राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना विजयी झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत त्यांच्या जातीचे वैधता प्रमाणपत्र निवडणूक आयोगास सादर करणे बंधनकारक होते. एकूण ३३ नगरसेवकांपैकी १३ नगरसेवकांनी हे बंधन पाळले; परंतु विद्यमान महापौर हसिना फरास, स्थायी सभापती संदीप नेजदार यांच्यासह १९ नगरसेवकांना हे बंधन पाळता आले नाही. विभागीय जातपडताळणी समितीकडून पडताळणी प्रमाणपत्र देण्यास आठ ते दहा दिवसांचा विलंब झाला. कामाच्या व्यापामुळे मुदतीत असे प्रमाणपत्र देता आले नसल्याचे पत्र समिती सदस्यांनी नगरसेवकांना दिले. एका खटल्यात निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र न देणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द करण्यात याव,े असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडे आणि राज्य सरकारने महानगरपालिकांना आदेश काढून नगरसेवकांवर कारवाई करण्यास बजावले होते. त्यामुळे केवळ कोल्हापूर महानगरपालिकेतीलच नाहीत तर राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आरक्षित जागांवर निवडून आलेले सुमारे चारशेहून अधिक नगरसेवक अडचणीत आले होते. (प्रतिनिधी)