शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

‘त्या’ १९ नगरसेवकांना दिलासा

By admin | Updated: February 14, 2017 00:54 IST

जातवैधता प्रमाणपत्र; उच्च न्यायालयाच्या निकालास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

कोल्हापूर : स्वत:च्या जातीचे वैधता प्रमाणपत्र निवडणूक आयोगास मुदतीत सादर न करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांवर क ारवाई म्हणून त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सोमवारी सर्वोच्च न्यायालयात स्थागिती देण्यात आली. या खटल्यात न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली असून पुढील सुनावणीवेळी म्हणणे मांडण्यास बजावले आहे. या स्थगितीमुळे नगरसेवकांना दिलासा मिळाले आहे. उच्च न्यायालयाच्या निकालास आव्हान देणारी याचिका महापौर हसिना फरास यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ३ फेबु्रवारीला याचिका दाखल करून घेत सोमवारी त्यावर सुनावणी घेतली. फरास यांचे वकील कपिल सिब्बल अन्य एका खटल्याच्या सुनावणीत अडकल्यामुळे त्यांच्या अपरोक्ष अ‍ॅड. मयांक पांडे यांनी न्यायमूर्ती गोगोई व न्यायमूर्ती पंत यांच्यासमोर युक्तिवाद मांडला. अशाच प्रकारच्या एका प्रकरणात न्यायालयाने स्थगिती दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. राज्य सरकारला अद्याप नोटीस देण्यात आलेली नाही, ती द्यावी आणि सरकारचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती न्यायालयाने मान्य केली. सुनावणीवेळी राज्य सरकारला नोटीस काढून त्यांचे म्हणणे सादर करण्यास न्यायालयाने बजावले तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालास स्थागिती दिली. पुढील सुनावणी मार्च महिन्यात होणार असून तारीख निश्चित झालेली नाही. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक १ नोव्हेंबर २०१५ रोजी पार पडली. राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना विजयी झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत त्यांच्या जातीचे वैधता प्रमाणपत्र निवडणूक आयोगास सादर करणे बंधनकारक होते. एकूण ३३ नगरसेवकांपैकी १३ नगरसेवकांनी हे बंधन पाळले; परंतु विद्यमान महापौर हसिना फरास, स्थायी सभापती संदीप नेजदार यांच्यासह १९ नगरसेवकांना हे बंधन पाळता आले नाही. विभागीय जातपडताळणी समितीकडून पडताळणी प्रमाणपत्र देण्यास आठ ते दहा दिवसांचा विलंब झाला. कामाच्या व्यापामुळे मुदतीत असे प्रमाणपत्र देता आले नसल्याचे पत्र समिती सदस्यांनी नगरसेवकांना दिले. एका खटल्यात निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र न देणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द करण्यात याव,े असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडे आणि राज्य सरकारने महानगरपालिकांना आदेश काढून नगरसेवकांवर कारवाई करण्यास बजावले होते. त्यामुळे केवळ कोल्हापूर महानगरपालिकेतीलच नाहीत तर राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आरक्षित जागांवर निवडून आलेले सुमारे चारशेहून अधिक नगरसेवक अडचणीत आले होते. (प्रतिनिधी)