शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

पुनर्वसनासाठी धरणग्रस्तांचा मोर्चा

By admin | Updated: December 16, 2014 00:40 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने : मागण्या मान्य न झाल्यास २१ पासून पुन्हा ठिय्या आंदोलन

कोल्हापूर : अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली आज, सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जोरदार निदर्शने करून प्रशासनाचे लक्ष वेधले. मागण्या २० डिसेंबरपर्यंत पूर्ण न झाल्यास रविवार (दि. २१) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.जिल्ह्यातील चांदोली अभयारण्यात शेतजमीन गेलेल्या ९० टक्के शेतकऱ्यांचे पुनर्वसन झालेले नाही. याशिवाय उचंगी, आंबेओहळ, सर्फनाला या धरणातही अनेक शेतकऱ्यांची जमीन गेली आहे. मात्र, सर्व धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. वेळोवेळी अर्ज, विनंती, निवेदन देऊन पाठपुरावा केला तरी शासन उदासीन आहे. वाटप झालेली अतिरिक्त जमीन काढून घेऊन धरण व प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात यावे, मौजे तनाळी, सोनोली या गावांच्या भूसंपादनावेळी काही शेतजमिनींचे गटनंबर चुकलेले आहेत. शासनाने २७ आॅगस्ट २०१४ च्या अध्यादेशानुसार नवीन मूल्यांकन पत्रक तयार करून प्रकल्पग्रस्तांना पैशांचे वाटप करावे, नवीन जीआरनुसार घरबांधणी अनुदान एक लाख ६१ हजार तसेच गोठा अनुदान २५ हजार, छोटे उद्योगांना ५० हजार, प्रत्येक बाधित कुटुंबांना वाहतूक खर्च म्हणून ५० हजार रुपये, घर बदलल्यानंतर एकदाच पन्नास हजार रुपये पुनर्स्थापना भत्ता द्यावा, बाधित कुटुंबांना रोजगारासाठी पाच लाख रुपये द्यावे, उखळूवाडी अंबाईवाडीचे ‘खास बाब’ म्हणून पुनर्वसन आराखड्यात तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावे, आदी मागण्यांसाठी टाऊन हॉल बागेपासून श्रमिकचे जिल्हा प्रमुख मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच मोर्चेकऱ्यांनी ठिय्या मारला. ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली.श्रमिक मुक्ती दलाचे डी. के. बोडके, शंकर पाटील, नतू खोत, शंकर पाटील, नजीर चौगले, आनंदा आमकर, पांडुरंग कोठारी, वसंत पाटील यांच्यासह धरणग्रस्त सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप करावेवाटप झालेली अतिरिक्त जमीन काढून घेऊन धरण आणि प्रकल्पग्रस्तांना वाटप करा.नवीन अध्यादेशानुसार १ लाख ६१ हजारांचे घरबांधणी अनुदान, गोठा अनुदान २५ हजार, छोट्या उद्योगांना ५० हजार, बाधित कुटुंबांना ५० हजार रुपये वाहतूक खर्च, ५० हजार पुनर्स्थापना भत्ता द्यावा.बाधित कुटुंबांना रोजगारासाठी ५ लाख रुपये द्यावेत.उखळूवाडी, अंबाईवाडीचे खास बाब म्हणून पुनर्वसन आराखडा तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा.२७ आॅगस्ट २०१४च्या शासनाच्या अध्यादेशानुसार नवीन मूल्यांकन पत्रकानुसार पैशांचे वाटप करा.