शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

शर्तभंग झालेल्या जमिनींचे नियमितीकरण थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:21 IST

इंदुमती गणेश, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शर्तभंग झालेल्या जमिनी नियमितीकरण करण्याच्या शासन निर्णयाचा अध्यादेशात रूपांतर न झाल्याने गेली ...

इंदुमती गणेश, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शर्तभंग झालेल्या जमिनी नियमितीकरण करण्याच्या शासन निर्णयाचा अध्यादेशात रूपांतर न झाल्याने गेली सात वर्षे ही प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांचे नाव प्रॉपर्टीकार्डवर लागलेले नाही, वर्षानुवर्षे, पिढ्यान्‌-पिढ्या वापरात असलेल्या जमिनीचा मालकी हक्क मिळालेला नाही. कोल्हापूर शहरात अशा नागरिकांची संख्या ३० हजारांवर असून जिल्हाधिकाऱ्यांनी बी टेन्युअरप्रमाणे या जमिनीबाबतही निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

इनाम म्हणून दिलेल्या ज्या जमिनींची गुंठेवारी झाली आहे अशा जमिनीच्या बाजारभावाच्या २५ टक्के रक्कम महसूल खात्याकडे भरून त्या जमिनीवरचा शर्तभंग संपुष्टात आणता येतो. त्यामुळे मिळकतधारकाराला जागेचा मालकी हक्क मिळतो. प्रॉपर्टीकार्डवर नाव लागते. कोल्हापूर शहरात १ लाख ४२ हजार मिळकतधारकांकडून घरफाळा वसूल केला जातो. त्यापैकी ६० ते ७० हजार मिळकतधारकांकडे प्रॉपर्टीकार्ड आहे. उर्वरित ७२ हजारांपैकी ३० हजारांवर नागरिकांची शर्तभंग नियमितीकरणाची प्रक्रिया थांबली आहे.

नियमितीकरणासंबंधी २०११ वर्षी शासन निर्णय झाला तो २०१४ वर्षापर्यंत सुरू होता. त्यानंतर तो स्थगित झाला. याबाबत पुन्हा ५ ऑगस्ट २०१९ रोजी शासन निर्णय झाला. निर्णयानंतर पुढील सहा महिन्यांपर्यंत अध्यादेश काढण्याची मुदत असते. फेब्रुवारी २०२० पर्यंत याचे अध्यादेशात रूपांतर होणे गरजेचे होते. ते न झाल्याने हजाराे मिळकतधारकांचे जमिनींशी संबंधित सर्व व्यवहार थांबले आहेत. जास्तीची रक्कम भरायला लागू नये यासाठी नागरिक अध्यादेशाची वाट पाहत आहेत. ज्यांना तातडीची गरज आहे, पर्यायच नाही त्यांना मात्र ५० टक्के अतिरिक्त रक्कम भरावी लागत आहे.

--

अशी आहे प्रक्रिया

इनाम जमिनींचा वापर केवळ शेतीसाठी केला जावा असा नियम आहे. मात्र, त्याचा रहिवासी, औद्योगिकसह अन्य कारणासाठी वापर केला जात असेल तर शर्तभंग होतो. या जमिनीच्या रेडिरेकनरच्या ५० टक्के आणि अतिरिक्त दंड २५ टक्के अशी ७५ टक्के रक्कम महसूल खात्याकडे भरून जमीन नियमितीकरण केली जाते म्हणजे, शर्तभंग संपुष्टात आणून प्राॅपर्टीकार्डवर मालकाचे नाव लागते. २०११च्या निर्णयानुसार ही रक्कम केवळ २५ टक्के करण्यात आली आहे.

---------

जिल्हाधिकाऱ्यांनी बी टेन्युअरच्या जमिनीबाबत जसा धाडसी निर्णय घेतला त्याचप्रमाणे शर्तभंग झालेल्या जमिनींबाबतही विचार करावा. २०११ च्या परिपत्रकाप्रमाणे शर्तभंग संपुष्टात आणण्याची प्रक्रिया पुन्हा सुुरू करावी.

चंद्रकांत यादव (नागरी निवारा संघटना)

--