शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

सहवीजमधील वीज उत्पादनातही घट

By admin | Updated: March 29, 2017 00:36 IST

जिल्ह्यातील साखर कारखान्यातील चित्र : १०० कोटी रुपयांचा आर्थिक फटका, ऊस उत्पादनात घट झाल्याने परिणाम

प्रकाश पाटील -- कोपार्डे --या हंगामात (२०१६/१७) मध्ये ऊस उत्पादनात प्रचंड घट झाली. यामुळे जेमतेम चारच महिने साखर कारखान्यांचे गाळप हंगाम चालले. याचा फटका जसा साखर उत्पादनावर झाला, तसा सहवीज प्रकल्प राबविणाऱ्या १४ साखर कारखान्यांच्या वीजनिर्मितीवर झाला असून, तब्बल ३५ कोटी युनिट वीजनिर्मिती कमी झाली असून, १०० कोटी रुपयांचा फटका साखर कारखान्यांना बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांपैकी २१ साखर कारखान्यांनी २०१६/१७ मध्ये गाळप हंगाम यशस्वी पूर्ण केले. या २१ पैकी १४ साखर कारखान्यांकडे स्वत: सहवीज प्रकल्प असून, ऊस खरेदीकर व सहवीज निर्मितीसाठी मिळणारे स्वस्त व सहज इंधन असणाऱ्या उसाचा बगॅस असल्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करूनसहवीज प्रकल्प उभारले आहेत. सहवीज प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही पाणी व कोळशाच्या वापरापासून तयार होणाऱ्या विजेपेक्षा चांगली व प्रदूषणाला आळा घालणारी असल्याने शासनाने अपारंपरिक ऊर्जास्रोत म्हणून या सहवीज प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याबरोबर सहा रुपये ६५ पैसे प्रतियुनिटप्रमाणे ही वीज खरेदी करण्याची हमी घेतली आहे.६५ टक्के‘कुंभी’ कारखान्याकडून वीज निर्यातया हंगामात कुंभी-कासारी कारखान्याने कमी कालावधीत चांगले ऊस गाळप करताना सहवीज प्रकल्पातूनही चांगली वीज निर्मिती करताना एकूण उत्पादनाच्या ६५ टक्के विजेची निर्यात करताना केवळ ३५ टक्के विजेचा वापर केला आहे. वीज उत्पादन, विक्रीत वारणा आघाडीवरयावर्षी सहवीज प्रकल्पातून वीज निर्मिती करण्यात वारणा साखर कारखाना आघाडीवर असून, १२ कोटी २४ लाख २७ हजार युनिट वीज निर्मिती करीत आठ कोटी ५४ लाख १५ हजार युनिट वीज विक्री केली आहे. मागील वर्षी वीज उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या दत्त शिरोळच्या वीज निर्मितीमध्ये ४० टक्के घट झाली आहे. मात्र, दत्त दालमिया कारखान्याने नऊ कोटी एक लाख युनिट वीज निर्मिती करून सात कोटी एक लाख युनिट वीज महावितरणला निर्यात केली आहे.