शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

साखर कारखान्यांची वाढीव शेअर्स रक्कम कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:16 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांनी सभासद भागाच्या दर्शनी मूल्यामध्ये पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांनी सभासद भागाच्या दर्शनी मूल्यामध्ये पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. कारखान्याचे नक्तमू्ल्य उणे झाल्याने वित्तीय संस्था त्यांना कर्जे देत नसल्याने हा खटाटोप असून हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे करण्यात आली.

एकीकडे उसाच्या एफआरपीचा बेस कमी करून शेतकऱ्यांना आतबट्यात आणले आहे. त्यातच कारखान्यात तयार होणाऱ्या उपपदार्थांचा वाटा शेतकऱ्यांना दिला जात नाही. उसाचा दर कायदेशीररित्या कमी करून उपपदार्थांचे उत्पन्न लपवले जाते. दुसऱ्या बाजूला इथेनॉल, सहवीज प्रकल्प यांतून होणाऱ्या फायद्याचे अर्थशास्त्र सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. अगाेदरच कारखान्यांच्या भागाची रक्कम दहा हजार आहे. त्यातून शेतकऱ्यांना किती फायदा होतो, हे सगळ्यांना माहिती आहे. आता त्यामध्ये पाच हजारांची वाढ करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, हे अन्यायकारक आहे. शेअर्सची रक्कम वाढवून कारखाने फायद्यात येणार आहेत का? शेतकऱ्यांची लूट करण्याचा नवीन मार्ग कारखानदारांनी शोधला असून तो कदापि मान्य करणार नाही. बिनफायद्याची गुंतवणूक शेतकऱ्यांना मान्य नसून त्याचा त्रास दिला तर शेतकरी संघटना सहन करणार नाही. त्यामुळे शासनाने १८ मे २०२१ रोजी शेअर्स रक्कम वाढीबाबत घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे यांनी प्रभारी प्रादेशिक साखर सहसंचालक एस. एन. जाधव यांना दिला.

या वेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. प्रगती जाधव, अशाेक जाधव, राेहन जाधव, राजलक्ष्मी कुलकर्णी, अनिता निकम, प्रतीक कुलकर्णी, ज्ञानदेव पाटील, बाळ नाईक, डी. के. कोपार्डेकर आदी उपस्थित होते.