शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

दहावी, बारावीचा आणखी २५ टक्के अभ्यासक्रम कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहेत. मात्र, आतापर्यंत दिलेल्या ऑनलाईन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहेत. मात्र, आतापर्यंत दिलेल्या ऑनलाईन शिक्षणाच्या आकलनातील मर्यादा, अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झाले नसलेले वर्ग, बारावीच्या प्रश्नपत्रिकांचे बदललेले स्वरूप यामुळे विद्यार्थी, पालकांची घालमेल सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचा अभ्यासक्रम आणखी २५ टक्क्यांनी कमी करावा. प्रश्नपत्रिकांची काठिण्यपातळी कमी करण्याचा विचार राज्य सरकार आणि शिक्षण विभागाने गांभीर्यपूर्वक करावा. त्यादृष्टीने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जूनपासून दहावी, बारावीचे ऑनलाईन, तर दोन महिन्यांपासून ऑफलाईन वर्ग सुरू झाले आहेत. दर महिन्याच्या वेळापत्रकानुसार आतापर्यंत ऑनलाईन पध्दतीने ७० टक्के, तर ऑफलाईन स्वरूपात २० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. मोबाईल, नेटवर्कची उपलब्धता या तांत्रिक तसेच अन्य अडचणींमुळे सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचे आकलन बहुतांश विद्यार्थ्यांना समजलेले नाही. प्रत्यक्षात वर्ग सुरू झाल्यानंतर हे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांच्या मागणीनुसार पुन्हा पहिल्यापासून अभ्यासक्रम अनेक शाळांनी सुरू केला आहे. कोरोनामुळे शिक्षण विभागाने गेल्या पाच महिन्यांपूर्वी इयत्ता पहिली ते बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला. शिक्षणाबाबतची सद्यस्थिती आणि अडीच महिन्यांवर आलेली परीक्षा लक्षात घेता, दहावी, बारावीचा अभ्यासक्रम आणखी २५ टक्क्यांनी कमी करावा. प्रश्नपत्रिकांची काठिण्यपातळी घटवावी, अशी मागणी विद्यार्थी, पालकांची आहे.

प्रतिक्रिया...

ऑनलाईन शिक्षण अपेक्षित प्रमाणात परिणामकारक झाले नसल्याचे चित्र आहे. अभ्यासक्रम निर्धारित वेळेत पूर्ण झाला, तरी तो विद्यार्थ्यांना कितपत समजेल याबाबत शंका आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकांची काठिण्यपातळी यंदा थोडी कमी करण्याबाबत विचार व्हावा.

- बी. एच. शिंदे, पालक, सम्राटनगर.

गेल्या सात महिन्यांपासून आमचे ऑनलाईन वर्ग सुरू असले, तरी विविध अडचणींमुळे सर्वच विद्यार्थी या वर्गांना उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रम आणखी कमी करावा. गणित, विज्ञानमधील काठिण्यपातळी अधिक असलेले प्रश्न कमी करण्याचा विचार व्हावा.

- ऋग्वेद कराळे, विद्यार्थी, दहावी.

ऑनलाईन शिक्षण घेण्यात काही मर्यादा होत्या. आता प्रत्यक्षात वर्ग सुरू झाल्याने अभ्यासक्रमांतील काही संकल्पना समजून घेणे अधिक सोपे झाले आहे. प्रश्नपत्रिकांची काठिण्यपातळी कमी झाल्यास ते आम्हा विद्यार्थ्यांसाठी हितकारक ठरणार आहे.

- साक्षी डोईफोडे, विद्यार्थिनी, बारावी.

परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या, तरी अद्याप कोणता २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे, त्याबाबतची स्पष्टता शासनाकडून मिळालेली नाही. ही माहिती लवकर शाळा, शिक्षकांना मिळणे आवश्यक आहे.

- राजेश वरक, माध्यमिक शिक्षक

चौकट

आतापर्यंत अडीच लाख विद्यार्थ्यांचे अर्ज

दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी आतापर्यंत कोल्हापूर विभागामधील एकूण २,४४,२०२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यात दहावीचे १,२६,६३४, तर बारावीचे १,१७,५६८ विद्यार्थी आहेत. अर्ज करण्याची मुदत २८ जानेवारीपर्यंत आहे.